शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

शेतकरी संपामुळे बाजार समितीत शुकशुकाट!

By admin | Updated: June 2, 2017 00:56 IST

स्वाभिमानी, शेतकरी संघटना, अडते व्यापारी, हमाल कामगारांसह काँग्रेसचा पाठिंबा

चिखली : शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या पाहता शेतकऱ्यांनी १ जूनपासून संपावर जाण्याची भूमिका घेतली आहे. या संपाला तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या संपामुळे चिखली बाजार समितीत शुकशुकाट पहावयास मिळाला. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवित या संपाला स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना, जिल्हा काँग्रेस कमिटी, व्यापारी व अडत असोसिएशन, हमाल मापारी संचालक यांनी पाठिंबा दर्शविल्याने शहरात शेतकऱ्यांचा संप यशस्वी ठरत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या या संपाचा भाजीपाला मार्केटवरही परिणाम दिसून आला. भाजीपाला बाजारात केवळ शेतकरी संपाविषयी माहिती नसलेले शेतकरीच तुरळक प्रमाणात दाखल झाले होते. शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती पाहता व शेतकरी आत्महत्येचे प्रमाण पाहता त्या समस्या व शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत योग्य कृतीशील उपाययोजना न झाल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी १ जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संपकाळात शहरात विकला जाणारा भाजीपाला, दूध तसेच शेतमाल न विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १ जून रोजी राज्यभरातील शेतकरी हे आंदोलन यशस्वीपणे राबवित आहेत. याच धर्तीवर चिखली शहरात १ जून रोजी कोणत्याही प्रकारचा शेतमाल व दूध दाखल झाले नाही. परिणामी, चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवसभर सर्वत्र शुकशुकाट होता, तर येथील दूध संकलन केंद्रातही नियमितपणे दूध घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्यामुळे दूध संकलन केंद्रसुद्धा बंद होते. दरम्यान, शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झाला पाहिजे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात याव्यात, शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, या मागण्यांसाठी राज्यभरातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या संपाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हा उपाध्यक्ष विनायक सरनाईक, नितीन राजपूत, दीपक सुरडकर, विलास तायडे, भारत वाघमारे, गोपाल ढोरे, भरत जोगदंडे यांनी, शेतकरी संघटनेचे समाधान कणखर, व्यापारी व अडत असोसिएशनच्यावतीने असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, तर हमाल मापारी संचालक गजानन पवार यांनी पत्र देऊन पाठिंबा दिला आहे, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना या संपात सक्रिय सहभागी झाली आहे.

शेतकरी संपाला काँग्रेसचा पाठिंबा - आ. राहुल बोंद्रे राज्यासह जिल्ह्यातील शेतकरी चौफेर संकटाने घेरला असताना त्याला तातडीची आवश्यक मदत देण्याऐवजी पोकळ योजनांचा मारा तथाकथीत संवाद यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर केला जातो आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांशी या यात्रेतून कसलेही सोयरसुतक नसल्याचे शेतकऱ्यांना ढळढळीतपणे दिसत असताना संकटात असलेल्या शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’चे डमरू वाजवून भुलविण्याचा धंदा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे़; मात्र भ्रमनिरास झाल्याने राज्यातील व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कधी नव्हे ते संपाचे हत्यार उपसले आहे. त्याला बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीने जाहीर पाठिंबा दिला असून, शेतकऱ्यांच्या या आंदोलनात जिल्हाभरातील काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संपूर्ण आंदोलनाला सहकार्य करीत उत्स्फूर्त सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांनी केले आहे़ 

दूध व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी सहकार्य करावे - विनायक सरनाईकशेतकऱ्यांची सद्यस्थिती पाहता शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा आहे, तसेच अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्यांची सोडवणूक व्हावी, यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांनी हा संप पुकारला आहे. या संपाची दखल शासनाला घ्यावीच लागणार आहे; परंतु याबाबत अनेक शेतकरी अनभिज्ञ आहेत, तर अनेक विघ्नसंतोषी व शेतकऱ्यांच्या नावावर आपली पोळी भाजून घेणाऱ्यांनी हा संप हाणून पाडण्याचा डाव रचाला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी जागरूक राहावे व या संपात दूध व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनीही सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन स्वाभिमानीचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक सरनाईक यांनी केले आहे.