शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

रोज आठ तास अभ्यासातील सातत्य व जिद्द कायम ठेवली - अभिजीत सरकटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 11:56 IST

रोज आठ तास अभ्यास व जिद्द कायम ठेवल्याने यशाला गवसणी घालु शकलो, अशा भावना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशभरातून ७१० व्या रँकमध्ये उत्तीर्ण झालेल्या अभिजीत सरकटे यांनी व्यक्त केल्या.

- अनिल उंबरकारलोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : इलेक्ट्रॉनिक आणी टेलिकम्युनिकेशनमध्ये बीई झाल्यानंतर मोठया कंपन्याद्वारे नोकरीसाठी निवड झाली. परंतु, खाजगी नोकरी न करता समाजाचे ऋण फेडण्यासाठी केंदीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षा देण्याचे ठरवले. रोज आठ तास अभ्यास व जिद्द कायम ठेवल्याने यशाला गवसणी घालु शकलो, अशा भावना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशभरातून ७१० व्या रँकमध्ये उत्तीर्ण झालेल्या अभिजीत सरकटे यांनी व्यक्त केल्या. त्यांच्याशी साधलेला संवाद...

युपीएससी परिक्षेत यश मिळविण्यासाठी काय केले?विद्यार्थी दशेतूनच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा देण्याचा मानस होता. दिवसातून सलग आठ तास अभ्यास करुन स्पर्धा परिक्षेची तयारी केली. अपयश मिळाल्यानंतरही केंद्रीय लोकसेवा आयोगाची परिक्षा देण्याची जिद्द कायम होती. सलग तीन वर्ष दररोज आठ तास अभ्यास करुन यश मिळवले.

कौटुंबिक स्तरावरुन कोणती मदत झाली?वडील विश्वनाथ सरकटे रिसोड येथे राज्य परीवहन महामंडळात वाहक म्हणून कार्यरत आहेत तर आई मीना सरकटे शेगाव पंचायत समिती अंतर्गत लासूरा येथे शाळेत शिक्षिका आहे. शालेय शिक्षण शेगावात हरलालका शालेत व महाविद्यालयीन शिक्षण नगरपालिकेच्या महाविद्यालयात घेतले. कुटुंबासह शैक्षणिक प्रवासात सर्वांची मदत झाली.

स्पर्धा परिक्षेतील यशामध्ये कोणत्या अडचणी येतात?युपीएससीमध्ये दोन वेळा प्रयत्न असफल झाला. जिओग्राफी विषयाने दोन वेळा घात केला. त्यामुळे मानववंश शास्त्र हा विषय घेतला. तो विषयच करीअरमध्ये कलाटणी देणारा ‘गेम चेंजर’ ठरला. अपयशाने विचलित न होता तज्ञांचे मार्गदर्शन हेच यशाचे सूत्र ठरले.

स्पर्धा परिक्षेकडे वळण्यासाठी काय प्रेरक ठरले?इयत्ता दहावीत ९४ टक्के गुण प्राप्त केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती पुरस्कार २०१० मध्ये मिळाला. पुरस्कार घेण्यासाठी कार्यक्रमात गेलो तीथे उत्साहित झालो. तेव्हाही मोठा अधिकारी बनावं, असं मनात आलं.

युपीएससीच्या मुलाखतीचा अनुभव कसा असतो?४० मिनिटाच्या मुलाखतीमध्ये आई-वडील अमरावती जिल्ह्यातील असल्याने पॅनलमधील अधिकाऱ्यांनी अमरावती जिल्ह्यातील विविध प्रश्न विचारले. मेळघाटमध्ये कोण कोणत्या जमाती आहेत, गोंड जमातीमध्ये काय विशेष वाटलं, त्यांच्या लग्नाची परंपरा, तिथले जिल्हाधिकारी काय करतात. त्यानंतर अचानक चीन-डोकलाम बद्दलची माहिती विचारली. हायकिंग व ट्रॅव्हलींग, इकॉनॉमी, राजकीय घडामोडीवर प्रश्न विचारले. प्रारंभी दडपण आलं,. मात्र, नंतर मुलाखत ही संवादासारखी ठरली.

टॅग्स :khamgaonखामगावupscकेंद्रीय लोकसेवा आयोगinterviewमुलाखतShegaonशेगाव