शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

चिखलीत पुन्हा फुलणार 'कमळ'!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:26 IST

मूळचे खामगाव येथील कलाध्यापक संजय गुरव यांनी 'तलाव जिथे : कमळे तिथे', हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. 'लॉकडाऊन' ...

मूळचे खामगाव येथील कलाध्यापक संजय गुरव यांनी 'तलाव जिथे : कमळे तिथे', हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. 'लॉकडाऊन' काळात घरी बसून न राहता, हा वेळ पर्यावरणासाठी खर्ची घालावा, या उदात्त हेतूने त्यांनी हा उपक्रम हाती घेतला. ते जिल्हाभरातील तलाव व जलाशय असलेल्या ठिकाणांना भेटी देऊन स्थानिक पर्यावरणप्रेमींच्या मदतीने तलावांमध्ये कमळ बिया, ट्यूबर व रोपे लावत आहेत. त्यांच्या या उपक्रमात आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक, मित्रमंडळी तथा पर्यावरणप्रेमी सहभागी होत असून परिसरातील डबकी, तलाव व छोट्या नदीवरील बांध याचा शोध घेऊन वरील ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कमळ फुलविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. परिणामी, राजकीयदृष्ट्या जिल्ह्यात कमळ फुलेल की नाही, याची शाश्वती नसली तरी गुरव यांच्या प्रयत्नाने खरेखुरे कमळ फुलल्यानंतर हा जिल्हा कमळमय होणार, हे मात्र निश्चित.

चिखली तालुक्यातील तलावात राबविला उपक्रम

गुरव यांचा संपूर्ण जिल्ह्यात कमळ फुलविण्याचा मानस आहे. याअंतर्गत चिखली तालुक्यातील गोद्री, माळशेंबा, खोर या ठिकाणच्या तलावात त्यांनी कमळाच्या बिया लावल्या. त्यामध्ये विविध रंगाच्या कमळाचा समावेश असून परिसराचे सौंदर्य वाढविणे, उपलब्ध जलसाठ्याची धूप न होऊ देणे, रोजगार निर्माण करणे हा मुख्य हेतू आहे. यावेळी किशोर भागवत, अमित कुहिरे, रविंद्र खानंदे उपस्थित होते.

रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार!

कमळाची रोपे मोठ्या प्रमाणावर रुजल्यावर संपूर्ण पाण्याचा भाग कमळपानांनी आच्छादित होईल व ज्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची धूप कमी प्रमाणात होऊन परिसराच्या सौंदर्यात भर पडणार आहे. तथापि, कमळपुष्प मोठ्या प्रमाणावर उमलल्यानंतर परिसरातील नागरिकांना यातून निश्चितच रोजगाराच्या संधीदेखील उपलब्ध होणार आहेत.