शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधन बाजारात

By admin | Updated: December 19, 2014 01:09 IST

पशुपालक संकटात : संभाव्य चारा व पाणीटंचाईची धास्ती.

नाना हिवराळे / खामगाव (बुलडाणा) यंदा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने पुढील काळात चारा व पाणीटंचाईच्या धास्तीने शेतकर्‍यांनी पशुधन बाजारात विक्रीस काढले आहे. खामगावच्या गुरांच्या आठवडी बाजारात मोठय़ा प्रमाणात जनावरे विक्रीस आली; मात्र जनावरांच्या किमती घसरल्याने पशुपालक संकटात सापडले आहेत.खामगाव येथील गुरुवारच्या बाजारात आठवड्यागणीक जनावरांची विक्रीसाठी गर्दी वाढतच आहे. दुष्काळ व सद्य:स्थितीत पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न पशुपालकांपुढे उभा ठाकला आहे. दुष्काळी परिस्थिती पाहता गुराढोरांच्या चारा व पाण्याची समस्या बिकट होणार असल्याने जनावरे विक्रीस काढली आहेत. खामगावच्या बाजारात बैलजोडीचे भाव अक्षरश: अध्र्यावर आले आहेत. एक लाख किंमत असणार्‍या बैलजोडीस ६0 हजारांपेक्षा जास्त मागणी आलीच नाही. ५0 ते ६0 हजार किंमत असणारी व ३0 ते ४0 हजारापर्यंत बैलजोडीची किंमत पाहून पशुपालक डोक्याला हात लावून बसले होते. ४0 हजार किंमत असणारी बैलजोडीला २0 ते २५ हजारांपेक्षा जास्त भाव मिळत नसल्याचे बाजारात दिसून आले. शेतकरी फक्त बैल विक्रीसाठीच आणत असल्याचे चित्र आहे. खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसाच नसल्याने व्यापारीच खरेदी करीत आहेत. चारा व पाणीटंचाईच्या भीतीपोटी विक्रीस काढलेले पशुधन मातीमोल भावात विकण्याची परिस्थिती शेतकर्‍यांवर ओढवली आहे. *जनावरांचे भाव घसरलेखामगावच्या बाजारात गुरुवारी जनावरांची विक्रीकरिता आवक वाढली. म्हैस १0८, बकरी २९७, तर बैल १४६ विक्रीस आणले होते. बैलांची संख्या वाढली असली तरी भाव मात्र एकदमच घसरले होते. कमीत कमी १0 हजार ते महत्तम ४0 हजार रुपये जोडीचा भाव दिसून आला. दुष्काळाच्या गडद छायेत वृषभराजाला मातीमोल भावात विकावे लागत असल्याची परिस्थिती शेतकर्‍यांसमोर आली आहे.