शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

काच नदीवर पुलाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:41 IST

डोणगाव येथील स्मशानभूमीजवळ असलेल्या काच नदीपात्रावर पूल बांधणे अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणावरून काही अंतरावर पाटबंधारे विभागाकडून काही वर्षांपूर्वी ...

डोणगाव येथील स्मशानभूमीजवळ असलेल्या काच नदीपात्रावर पूल बांधणे अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणावरून काही अंतरावर पाटबंधारे विभागाकडून काही वर्षांपूर्वी शेतजमिनीची आणि गावाची वॉटर लेवल वाढावी यासाठी नदीपात्रात भिंत बांधण्यात आली होती. परंतु नको त्या ठिकाणी भिंत बांधल्यामुळे या ठिकाणापासून पाठीमागे पाणी तुंबल्याने कऱ्हाळवाडी, लोणी गवळी, आंध्रुड, शेलगाव इत्यादी शेत शिवारात शेतजमिनी असलेल्या नागरिकांना जाण्यायेण्याचा रस्ता नदीतील पाण्यामुळे बंद झाला आहे. तरीदेखील नागरिक वेळ वाचवण्यासाठी तुंबलेल्या पाण्यातून ये-जा करत आहेत. त्यामुळे तुंबलेल्या पाण्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत असून नागरिकांना पावसाळ्यामध्ये अनेक अडचणीला सामोर जावे लागते. नदीच्या या तिरावरून त्या तिरावर जाण्यासाठी गावातील नागरिक, शेतकरी व मजदूर कंबरेपेक्षा जास्त पाण्यातून ये-जा करत असतात. दुसऱ्या बाजूने जाण्यासाठी नागरिकांना ३ ते ४ किलोमीटर दुरवरून फिरून यावे लागते. त्यामुळे ग्रामस्थ वेळ वाचवण्याकरिता जिवाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून नदी पार करतात.

पूल बांधण्याची मागणी

ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ या मागणीची दखल घेऊन या नदीवर पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी सागर बाजड यांनी निवेदनातून केली आहे. यावेळी भागवतराव बाजड, अरुणराव वडावकर, भाजप शहर अध्यक्ष विलास परमाळे, आकाश बाजड, रोहित डागर, राहुल श्रीनाथ, चंद्रकांत वाघमारे, रोहित गवई, अक्षय काळे, हरीष इंगळे, साजन शाह, हुसेन गवई, सचिन मोरे, अंकुश मोहळे आदी उपस्थित होते.

090921\new doc 2021-09-09 08.33.55_1.jpg

निवेदन देण्यात आले त्यावेळी अर्जुनराव वानखेडे