शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

काच नदीवर पुलाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:41 IST

डोणगाव येथील स्मशानभूमीजवळ असलेल्या काच नदीपात्रावर पूल बांधणे अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणावरून काही अंतरावर पाटबंधारे विभागाकडून काही वर्षांपूर्वी ...

डोणगाव येथील स्मशानभूमीजवळ असलेल्या काच नदीपात्रावर पूल बांधणे अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणावरून काही अंतरावर पाटबंधारे विभागाकडून काही वर्षांपूर्वी शेतजमिनीची आणि गावाची वॉटर लेवल वाढावी यासाठी नदीपात्रात भिंत बांधण्यात आली होती. परंतु नको त्या ठिकाणी भिंत बांधल्यामुळे या ठिकाणापासून पाठीमागे पाणी तुंबल्याने कऱ्हाळवाडी, लोणी गवळी, आंध्रुड, शेलगाव इत्यादी शेत शिवारात शेतजमिनी असलेल्या नागरिकांना जाण्यायेण्याचा रस्ता नदीतील पाण्यामुळे बंद झाला आहे. तरीदेखील नागरिक वेळ वाचवण्यासाठी तुंबलेल्या पाण्यातून ये-जा करत आहेत. त्यामुळे तुंबलेल्या पाण्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत असून नागरिकांना पावसाळ्यामध्ये अनेक अडचणीला सामोर जावे लागते. नदीच्या या तिरावरून त्या तिरावर जाण्यासाठी गावातील नागरिक, शेतकरी व मजदूर कंबरेपेक्षा जास्त पाण्यातून ये-जा करत असतात. दुसऱ्या बाजूने जाण्यासाठी नागरिकांना ३ ते ४ किलोमीटर दुरवरून फिरून यावे लागते. त्यामुळे ग्रामस्थ वेळ वाचवण्याकरिता जिवाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून नदी पार करतात.

पूल बांधण्याची मागणी

ग्रामपंचायत प्रशासनाने तत्काळ या मागणीची दखल घेऊन या नदीवर पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी सागर बाजड यांनी निवेदनातून केली आहे. यावेळी भागवतराव बाजड, अरुणराव वडावकर, भाजप शहर अध्यक्ष विलास परमाळे, आकाश बाजड, रोहित डागर, राहुल श्रीनाथ, चंद्रकांत वाघमारे, रोहित गवई, अक्षय काळे, हरीष इंगळे, साजन शाह, हुसेन गवई, सचिन मोरे, अंकुश मोहळे आदी उपस्थित होते.

090921\new doc 2021-09-09 08.33.55_1.jpg

निवेदन देण्यात आले त्यावेळी अर्जुनराव वानखेडे