शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेडराजा येथे नोकरी महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: शैक्षणिक वाटचालीनंतर नोकरीच्या अपेक्षेत असणाºया सुशिक्षित तरुणांसाठी मातृतीर्थ ग्रामीण विकास संस्था सिंदखेडराजा माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या नोकरी मेळाव्यास जवळपास १ हजार ५०० पेक्षा जास्त युवक, युवतींनी हजेरी लावली.जास्तीत जास्त सुशिक्षित तरुणांना नोकरी मिळावी, त्यांच्यापर्यंत योग्य संधीची माहिती पोहोचवली जावी या हेतूने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ...

ठळक मुद्देग्रामीण भागातील तरुणांची हजेरी विविध पदांसाठी मुलाखती

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: शैक्षणिक वाटचालीनंतर नोकरीच्या अपेक्षेत असणाºया सुशिक्षित तरुणांसाठी मातृतीर्थ ग्रामीण विकास संस्था सिंदखेडराजा माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या नोकरी मेळाव्यास जवळपास १ हजार ५०० पेक्षा जास्त युवक, युवतींनी हजेरी लावली.जास्तीत जास्त सुशिक्षित तरुणांना नोकरी मिळावी, त्यांच्यापर्यंत योग्य संधीची माहिती पोहोचवली जावी या हेतूने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ वाजतापासून या मेळावाला सुरुवात झाली होती. नोकरी महोत्सवाचे उद्घाटन माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले. याप्रसंगी आयसीआयसीआय बँक मॅनेजर भूषण मेटकर, नीलेश काळे, पीयूष, आशीष अमकरी, देवेंद्र्र देशमुख, यशस्वी ग्रुप नागपूर आदी उपस्थित होते.आजच्या युवा पिढीसमोर सर्वात मोठी समस्या आहे ती योग्य नोकरीची. अनेकदा पात्रता आणि गुणवत्ता असूनही तरुणांना योग्य नोकरी मिळत नाही. योग्य पर्याय मिळत नसल्याने मिळेल ती नोकरी करणाºया तरुणांची संख्या मोठी आहे. त्याचप्रमाणे विविध कंपन्यांपर्यंत योग्य उमेदवार पोहोचत नसल्याने तिथेही अपेक्षित नोकरदार मिळत नाहीत. त्यामुळे नोकरीची गरज असलेले आणि नोकरी देणाºयांमध्ये एक योग्य दुवा असणे गरजेचे झाले आहे. त्यासाठीच मातृतीर्थ ग्रामीण विकास संस्था सिंदखेडराजाच्या वतीने हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती अ‍ॅड. नाझेर काझी यांनी दिली. या मेळाव्याला दहावी, बारावी उत्तीर्ण तसेच पदवीधर आणि तरुण-तरुणींनी गर्दी केली होती. जवळपास २ हजाराच्यावर बेरोजगारांनी इथे आपल्या नावांची नोंदणी केली. विविध प्रकारची शैक्षणिक पात्रता असलेल्या बेरोजगारांना नोकरीच्या संधी कुठे उपलब्ध आहेत, याची माहिती असलेल्या यशस्वी ग्रुप, नागपूर यानी बेरोजगारांना नोकरीसाठी सविस्तर माहिती दिली. राज्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे यापैकी प्रत्येकाला शासकीय नोकरी मिळेलच, अशी शाश्वती नाही. कारण वाढणारी लोकसंख्या, संगणकीकरण, जागतिकीकरण, यांत्रिकीकरणामुळे शासकीय नोकºयांची संधी अल्प आहे. अशा परिस्थितीमध्ये सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी खासगी क्षेत्रांकडे वळावे, असे आवाहन आयोजनाकडून करण्यात आले होते. मेळाव्यासाठी अगोदर नोंदणी करण्यात आली होती. जवळपास २ हजाराच्यावर युवकांनी नोंदणी केली होती. या नोकरी महोत्सवात विविध पदासाठी परीक्षा व मुलाखती घेऊन पात्र उमेदवाराची निवड करण्यात आली आहे. या नोकरी मेळाव्याला विविध कंपनांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अ‍ॅड. संदीप मेहेत्रे, गजानन चेके, नितीन चौधरी, अभिजित राजे, राहुल चव्हाण, गंगाधर ठाकरे यांच्यासह अनेकांनी यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.