शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
2
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
3
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
4
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
5
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
6
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
7
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
8
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
9
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
10
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
11
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
12
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
13
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
14
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
15
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
16
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
17
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
18
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
19
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
20
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?

पंधराशे कोटींच्या खर्चानंतरही जिगाव प्रकल्प अधांतरी

By admin | Updated: November 14, 2015 02:28 IST

नांदुरा तालुक्यात मातीची भिंत व सांडव्याचे काम सुरू होईना.

सुहास वाघमारे /नांदुरा (जि. बुलडाणा): राज्यातील मोठे सिंचन प्रकल्प पूर्ण होण्यासाठी दशकांचा कालावधी लागला. तोच प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी जिगाव प्रकल्पाबाबत घडत आहे. पंधराशे कोटी रुपयांचा आतापर्यंंंत खर्च केल्यानंतरही प्रकल्प अधांतरी असून, मागील वर्षी नगण्य काम झाल्यानंतर यावर्षी शेतकर्‍यांचा विरोध असल्याने मातीची भिंत व सांडव्याचे काम पुन्हा एकदा बंद पडले आहे. प्रकल्पाच्या मातीच्या भिंतीचे काम सुरू करण्यासाठी २00७ मध्ये शेतकर्‍यांनी सरळ खरेदीने शेतजमिनी दिल्या. त्यावेळी त्यांना सरासरी एकरी ९0 हजार रुपये एवढाच मोबदला मिळाला होता; मात्र सद्यस्थितीत धरणाच्या इतर कामांसाठी संपादित केल्या जाणार्‍या शेतीला सात ते आठपट एवढा मोबदला मिळत असल्याने आधी शेतजमिनी देणार्‍या शेतकर्‍यांनी उपोषण केले तसेच धरणाच्या मातीच्या भिंती व सांडव्याच्या कामाला विरोध करून काम बंद पाडले आहे. विजयादशमीला ठेकेदाराने विधिवत पूजन करून कामास प्रारंभ केला; मात्र शेतकर्‍यांनी त्याला विरोध करून आधी उपोषण व आता काम बंद ठेवण्यास यंत्रणेला बाध्य केले आहे. त्यामुळे बंद अवस्थेतील लाखो रुपयांची यंत्रसामग्री, बसून असलेला मजूर वर्ग व आंदोलनातून विरोध करणारे शेतकरी असे चित्र धरणस्थळी आहे. त्यामुळे यावर्षी अद्यापही मातीच्या भींती व सांडव्याचे काम सुरूझाले नाही. अशीच परिस्थिती कायम राहिली, तर प्रकल्प पुन्हा रेंगळणार आहे. जिगाव प्रकल्पाच्या कामाला सुरुवातीला प्रकल्पग्रस्तांचा मोठा विरोध होता. यंत्रसामग्री जाळण्यापासून ते अधिकार्‍यांच्या कपडे फाडण्यापर्यंंंत व वेळोवेळी काम बंद पाडणारी आंदालने झाली; मात्र आता प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या शेतीचा व घरांचा नवीन कायद्यानुसार मोबदला हवा आहे. त्यांची ही मागणी प्रशासनाने तात्काळ व प्राधान्याने पूर्ण केली, तर प्रकल्पाच्या कामाला विरोध होणार नाही; मात्र पुर्नवसनाच्या कामाला व मोबदला वितरित करायला वेळ लागत असल्याने प्रकल्पाच्या कामाला खीळ बसली आहे. पाटबंधारे विभाग व प्रशासन यांनी तत्काळ संपादित जमिनीचा व घरांचा मोबदला द्यावा, ही मागणी प्रकल्पग्रस्तांची आहे, नाही तर लाखो रुपयांची धूळखात गंजून निकामी होत असलेली यंत्रसामग्री व धरणस्थळी बसून असलेले मजूर हे चित्र कायम राहिले व मातीची भिंत तथा सांडव्याच्या कामाला गती मिळणार नाही. पंधराशे कोटी रुपयांच्या खर्चानंतरही प्रकल्प अधांतरीच राहील.