शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या बलाढ्य सैन्याला, सशस्त्र दलांना, गुप्तचर संस्थांना आणि शास्त्रज्ञांना सलाम- पंतप्रधान मोदी
3
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
4
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
5
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
6
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
7
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
8
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
9
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
10
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
11
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
12
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
13
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
14
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
15
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
16
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
17
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
18
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
19
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
20
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा

५७५ गावांमध्ये १७ हजार हेक्टरवर सिंचन

By admin | Updated: September 16, 2016 02:58 IST

बुलडाणा जिल्ह्यातील जलयुक्त शिवारचा आढावा; ३३0 गावांची पहिल्या टप्प्यासाठी निवड.

बुलडाणा, दि. १५जलयुक्त शिवार अभियानात जिल्ह्यात २४५ गावांची निवड करण्यात आली असून, यामुळे १७ हजार ६२0 हेक्टर क्षेत्रावर दोन वेळेच्या संरक्षित सिंचनाची व्यवस्था निर्माण झाली आहे. खा. प्रतापराव जाधव व जिल्हाधिकारी विकास झाडे यांच्या उपस्थितीत जलयुक्तच्या कामांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यात आला. जलयुक्त शिवार अभियानानुसार जलसंधारण व मृदसंधारणाचे काम जिल्ह्यात सुरू आहे. जिल्ह्यातील ३३0 गावांची पहिल्या टप्प्यासाठी निवड करण्यात आली, तसेच दुसर्‍या टप्प्यात २४५ गावे निवडण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील ३३0 गावांमध्ये विविध प्रकारची कामे सुरू असून, ६ हजार ४५४ कामे पूर्ण झाली, तर ४२५ कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांवर आतापयर्ंत ११७ कोटी रुपये खर्च झालेले आहेत. त्याचप्रमाणे दुसर्‍या टप्प्यात ६६ कामे सुरू आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रमुख नद्यांवर मोठ्या प्रमाणावर साखळी सिमेंट नाला बांधण्यात आले. अशाप्रकारे जिल्ह्यात ३६५ साखळी सिमेंट नाला बांधांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे १८२५ टी.सी.एम पाणीसाठा निर्माण झाला आहे. यावर्षीच्या समाधानकारक पावसामुळे सर्व बंधारे भरून वाहत आहेत, तसेच मागील वर्षात जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गाळ काढणे, खोलीकरण व रूंदीकरणाची कामे करण्यात आली. ती सर्व नदी- नाले, बंधारे आता ओसंडून वाहत आहेत. एकंदरीतच या अभियानामुळे जिल्ह्यात ४0 हजार १६७ टी.सी.एम पाणीसाठा निर्माण झाला असून, ३३ हजार २८ हेक्टर क्षेत्रावर एक वेळच्या संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे. तर १७ हजार ६२0 हेक्टर क्षेत्रावर दोन वेळेचे संरक्षित सिंचन होऊ शकणार आहे. जलयुक्त शिवार अभियानातील कामांमुळे भूजल पातळीत कमालीची वाढ झाली आहे. हे अभियान शेतकर्‍यांसाठी वरदान ठरले आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात प्रामुख्याने नाला, ओढा, नदी यामधील गाळ काढणे, खोलीकरण, रुंदीकरण करणे अशी कामे लोकसहभागातून झालेली आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २0१५-१६ मध्ये अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये एकूण १३९६ गावांची निवड करण्यात आली होती. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये एकूण ३३ हजार २५५ कामे पूर्ण झालेली आहेत. जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत सन २0१६ - १७ मध्ये बुलडाणा जिल्ह्यात २४५ गावांची निवड करण्यात आली असून, या गावामध्ये कामे सुरू आहेत. जनमाणसांचा, शेतकर्‍यांचा विकास साधावा, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका येथील अन्नदात्याला सोसावा लागू नये, यासाठी जलयुक्तची संकल्पना महाराष्ट्रात राबविली जात आहे.