शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

५७५ गावांमध्ये १७ हजार हेक्टरवर सिंचन

By admin | Updated: September 16, 2016 02:58 IST

बुलडाणा जिल्ह्यातील जलयुक्त शिवारचा आढावा; ३३0 गावांची पहिल्या टप्प्यासाठी निवड.

बुलडाणा, दि. १५जलयुक्त शिवार अभियानात जिल्ह्यात २४५ गावांची निवड करण्यात आली असून, यामुळे १७ हजार ६२0 हेक्टर क्षेत्रावर दोन वेळेच्या संरक्षित सिंचनाची व्यवस्था निर्माण झाली आहे. खा. प्रतापराव जाधव व जिल्हाधिकारी विकास झाडे यांच्या उपस्थितीत जलयुक्तच्या कामांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यात आला. जलयुक्त शिवार अभियानानुसार जलसंधारण व मृदसंधारणाचे काम जिल्ह्यात सुरू आहे. जिल्ह्यातील ३३0 गावांची पहिल्या टप्प्यासाठी निवड करण्यात आली, तसेच दुसर्‍या टप्प्यात २४५ गावे निवडण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील ३३0 गावांमध्ये विविध प्रकारची कामे सुरू असून, ६ हजार ४५४ कामे पूर्ण झाली, तर ४२५ कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांवर आतापयर्ंत ११७ कोटी रुपये खर्च झालेले आहेत. त्याचप्रमाणे दुसर्‍या टप्प्यात ६६ कामे सुरू आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रमुख नद्यांवर मोठ्या प्रमाणावर साखळी सिमेंट नाला बांधण्यात आले. अशाप्रकारे जिल्ह्यात ३६५ साखळी सिमेंट नाला बांधांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे १८२५ टी.सी.एम पाणीसाठा निर्माण झाला आहे. यावर्षीच्या समाधानकारक पावसामुळे सर्व बंधारे भरून वाहत आहेत, तसेच मागील वर्षात जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गाळ काढणे, खोलीकरण व रूंदीकरणाची कामे करण्यात आली. ती सर्व नदी- नाले, बंधारे आता ओसंडून वाहत आहेत. एकंदरीतच या अभियानामुळे जिल्ह्यात ४0 हजार १६७ टी.सी.एम पाणीसाठा निर्माण झाला असून, ३३ हजार २८ हेक्टर क्षेत्रावर एक वेळच्या संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे. तर १७ हजार ६२0 हेक्टर क्षेत्रावर दोन वेळेचे संरक्षित सिंचन होऊ शकणार आहे. जलयुक्त शिवार अभियानातील कामांमुळे भूजल पातळीत कमालीची वाढ झाली आहे. हे अभियान शेतकर्‍यांसाठी वरदान ठरले आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात प्रामुख्याने नाला, ओढा, नदी यामधील गाळ काढणे, खोलीकरण, रुंदीकरण करणे अशी कामे लोकसहभागातून झालेली आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २0१५-१६ मध्ये अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये एकूण १३९६ गावांची निवड करण्यात आली होती. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये एकूण ३३ हजार २५५ कामे पूर्ण झालेली आहेत. जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत सन २0१६ - १७ मध्ये बुलडाणा जिल्ह्यात २४५ गावांची निवड करण्यात आली असून, या गावामध्ये कामे सुरू आहेत. जनमाणसांचा, शेतकर्‍यांचा विकास साधावा, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका येथील अन्नदात्याला सोसावा लागू नये, यासाठी जलयुक्तची संकल्पना महाराष्ट्रात राबविली जात आहे.