शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

५७५ गावांमध्ये १७ हजार हेक्टरवर सिंचन

By admin | Updated: September 16, 2016 02:58 IST

बुलडाणा जिल्ह्यातील जलयुक्त शिवारचा आढावा; ३३0 गावांची पहिल्या टप्प्यासाठी निवड.

बुलडाणा, दि. १५जलयुक्त शिवार अभियानात जिल्ह्यात २४५ गावांची निवड करण्यात आली असून, यामुळे १७ हजार ६२0 हेक्टर क्षेत्रावर दोन वेळेच्या संरक्षित सिंचनाची व्यवस्था निर्माण झाली आहे. खा. प्रतापराव जाधव व जिल्हाधिकारी विकास झाडे यांच्या उपस्थितीत जलयुक्तच्या कामांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यात आला. जलयुक्त शिवार अभियानानुसार जलसंधारण व मृदसंधारणाचे काम जिल्ह्यात सुरू आहे. जिल्ह्यातील ३३0 गावांची पहिल्या टप्प्यासाठी निवड करण्यात आली, तसेच दुसर्‍या टप्प्यात २४५ गावे निवडण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील ३३0 गावांमध्ये विविध प्रकारची कामे सुरू असून, ६ हजार ४५४ कामे पूर्ण झाली, तर ४२५ कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांवर आतापयर्ंत ११७ कोटी रुपये खर्च झालेले आहेत. त्याचप्रमाणे दुसर्‍या टप्प्यात ६६ कामे सुरू आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रमुख नद्यांवर मोठ्या प्रमाणावर साखळी सिमेंट नाला बांधण्यात आले. अशाप्रकारे जिल्ह्यात ३६५ साखळी सिमेंट नाला बांधांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे १८२५ टी.सी.एम पाणीसाठा निर्माण झाला आहे. यावर्षीच्या समाधानकारक पावसामुळे सर्व बंधारे भरून वाहत आहेत, तसेच मागील वर्षात जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गाळ काढणे, खोलीकरण व रूंदीकरणाची कामे करण्यात आली. ती सर्व नदी- नाले, बंधारे आता ओसंडून वाहत आहेत. एकंदरीतच या अभियानामुळे जिल्ह्यात ४0 हजार १६७ टी.सी.एम पाणीसाठा निर्माण झाला असून, ३३ हजार २८ हेक्टर क्षेत्रावर एक वेळच्या संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे. तर १७ हजार ६२0 हेक्टर क्षेत्रावर दोन वेळेचे संरक्षित सिंचन होऊ शकणार आहे. जलयुक्त शिवार अभियानातील कामांमुळे भूजल पातळीत कमालीची वाढ झाली आहे. हे अभियान शेतकर्‍यांसाठी वरदान ठरले आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात प्रामुख्याने नाला, ओढा, नदी यामधील गाळ काढणे, खोलीकरण, रुंदीकरण करणे अशी कामे लोकसहभागातून झालेली आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २0१५-१६ मध्ये अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये एकूण १३९६ गावांची निवड करण्यात आली होती. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये एकूण ३३ हजार २५५ कामे पूर्ण झालेली आहेत. जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत सन २0१६ - १७ मध्ये बुलडाणा जिल्ह्यात २४५ गावांची निवड करण्यात आली असून, या गावामध्ये कामे सुरू आहेत. जनमाणसांचा, शेतकर्‍यांचा विकास साधावा, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका येथील अन्नदात्याला सोसावा लागू नये, यासाठी जलयुक्तची संकल्पना महाराष्ट्रात राबविली जात आहे.