शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

एकात्मिक बालविकास प्रकल्पाला समस्यांचे ग्रहण

By admin | Updated: June 16, 2016 02:16 IST

चिखली तालुक्यातील दोन स्वतंत्र कार्यालयांचा प्रस्ताव धूळ खात पडून

सुधीर चेके पाटील / चिखली (जि. बुलडाणा)मुले हीच राष्ट्राचे भविष्य असल्याने त्यांची जडणघडण, विकास आणि संवर्धन व्हावे म्हणून केंद्र शासनाकडून एकात्मिक बाल विकास सेवा योजना (अंगणवाडी) सुरू आहे; मात्र गेल्या ३0 वर्षांंंपासून प्रत्येक गावात अंगणवाडी कार्यान्वित असूनही बालकांच्या कुपोषणाचे प्रमाण कमी होत नसल्याने त्याचे खापर अंगणवाड्यांवर फोडले जाते. वस्तुत: कुपोषण निर्मूलनासह बालकांची जडणघडण होण्याइतपत अंगणवाड्या सक्षम आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत असून, अपुरे कर्मचारी, उघड्यावरील व जीर्ण इमारतींमध्ये भरणार्‍या अंगणवाड्या, सुमार दर्जाचा पोषण आहार यांसह इतरही अनेक अपुर्‍या सुविधांमुळे तालुक्यातील बालकांचे भवितव्य आजमितीला धोक्यात आल्याचे चित्र आहे.चिखली तालुक्यातील सहा सर्कलमध्ये ३२३ अंगणवाडी केंद्रे व आठ मिनी अंगणवाडी केंद्रे अशा एकूण ३३१ अंगणवाड्या कार्यरत असून, या अंगणवाडी केंद्रांमार्फत पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ आरोग्य सेवा, आरोग्य आणि सकस आहारविषयक शिक्षण आणि अनौपचारिक शालेय पूर्वशिक्षण या सहा महत्त्वाच्या सेवा दिल्या जातात. असे असतानाही कुपोषणाबाबत हा तालुका जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आहे. साहजिकच याचे खापर एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पावर फोडले जाते; मात्र ही जबाबदारी त्यांची असली तरी कुपोषण निर्मूलनासह अंगणवाडीतून बालकांना दिल्या जाणार्‍या सहा महत्त्वपूर्ण सेवा देण्यासाठी तालुक्यातील अंगणवाड्या सक्षम नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. तालुक्यातील एकूण ३३१ अंगणवाड्यांचा संपूर्ण भार येथील ग्रामीण एकात्मिक बालविकास योजना प्रकल्प चिखलीचे बालविकास प्रकल्प अधिकारी गट ब वर्ग-२ यांच्यावर असून, या कार्यालयात कर्मचारी संख्या अपुरी आहे. गेल्या नऊ वर्षांंंपासून प्रकल्पास वाहनही उपलब्ध नाही. त्यातच ३३१ पैकी केवळ ११७ अंगणवाडी केंद्रांनाच इमारत असून, त्यापैकी अनेक इमारतींची पडझड झालेली आहे. अनेक इमारती जीर्णावस्थेत असून, बालकांचे जीव धोक्यात आहे.