शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

एकात्मिक बालविकास प्रकल्पाला समस्यांचे ग्रहण

By admin | Updated: June 16, 2016 02:16 IST

चिखली तालुक्यातील दोन स्वतंत्र कार्यालयांचा प्रस्ताव धूळ खात पडून

सुधीर चेके पाटील / चिखली (जि. बुलडाणा)मुले हीच राष्ट्राचे भविष्य असल्याने त्यांची जडणघडण, विकास आणि संवर्धन व्हावे म्हणून केंद्र शासनाकडून एकात्मिक बाल विकास सेवा योजना (अंगणवाडी) सुरू आहे; मात्र गेल्या ३0 वर्षांंंपासून प्रत्येक गावात अंगणवाडी कार्यान्वित असूनही बालकांच्या कुपोषणाचे प्रमाण कमी होत नसल्याने त्याचे खापर अंगणवाड्यांवर फोडले जाते. वस्तुत: कुपोषण निर्मूलनासह बालकांची जडणघडण होण्याइतपत अंगणवाड्या सक्षम आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत असून, अपुरे कर्मचारी, उघड्यावरील व जीर्ण इमारतींमध्ये भरणार्‍या अंगणवाड्या, सुमार दर्जाचा पोषण आहार यांसह इतरही अनेक अपुर्‍या सुविधांमुळे तालुक्यातील बालकांचे भवितव्य आजमितीला धोक्यात आल्याचे चित्र आहे.चिखली तालुक्यातील सहा सर्कलमध्ये ३२३ अंगणवाडी केंद्रे व आठ मिनी अंगणवाडी केंद्रे अशा एकूण ३३१ अंगणवाड्या कार्यरत असून, या अंगणवाडी केंद्रांमार्फत पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, संदर्भ आरोग्य सेवा, आरोग्य आणि सकस आहारविषयक शिक्षण आणि अनौपचारिक शालेय पूर्वशिक्षण या सहा महत्त्वाच्या सेवा दिल्या जातात. असे असतानाही कुपोषणाबाबत हा तालुका जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आहे. साहजिकच याचे खापर एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पावर फोडले जाते; मात्र ही जबाबदारी त्यांची असली तरी कुपोषण निर्मूलनासह अंगणवाडीतून बालकांना दिल्या जाणार्‍या सहा महत्त्वपूर्ण सेवा देण्यासाठी तालुक्यातील अंगणवाड्या सक्षम नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. तालुक्यातील एकूण ३३१ अंगणवाड्यांचा संपूर्ण भार येथील ग्रामीण एकात्मिक बालविकास योजना प्रकल्प चिखलीचे बालविकास प्रकल्प अधिकारी गट ब वर्ग-२ यांच्यावर असून, या कार्यालयात कर्मचारी संख्या अपुरी आहे. गेल्या नऊ वर्षांंंपासून प्रकल्पास वाहनही उपलब्ध नाही. त्यातच ३३१ पैकी केवळ ११७ अंगणवाडी केंद्रांनाच इमारत असून, त्यापैकी अनेक इमारतींची पडझड झालेली आहे. अनेक इमारती जीर्णावस्थेत असून, बालकांचे जीव धोक्यात आहे.