शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

धान्य निवडीतून संख्याज्ञान व एकाग्रता वाढविण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:36 IST

सध्या विद्यार्थ्यांना शाळा ही नवीनच वाटायला लागली आहे. त्यात प्रथमच शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या ...

सध्या विद्यार्थ्यांना शाळा ही नवीनच वाटायला लागली आहे. त्यात प्रथमच शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या आवडीच्या प्रक्रियेतून शिक्षण देण्यासाठी मुख्याध्यापक अनिल चव्हाण हे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित आहेत. ‘एकच ध्यास गुणवत्ता विकास’ या उक्तीप्रमाणे बोराखेडी येथे गरीब, वंचित शेतकरी कुटुंबातील मोबाईलची सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास साधण्यासाठी व लहान मुलांना शाळेची गोडी लावण्यासाठी विद्यार्थ्यांना पाटीवर चवळी व हरभरा असे धान्य एकत्र करून ते वेगवेगळे करण्यासाठी सांगितले जाते. विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढून लक्ष केंद्रित होऊन विद्यार्थी कृती करतात. धान्य वेगवेगळे करताना विद्यार्थी सहज ती मोजतात. म्हणजे सहजपणे मोजण्याचे कौशल्य त्यांना स्वयंअध्ययनातून निर्माण होते. त्यांच्या स्वयंअध्ययनातून विद्यार्थी कुणी ३ पर्यंत, कुणी ५, कुणी १०, तर कुणी १५ पर्यंत संख्या मोजतात. संख्याज्ञान व मोजण्याचे कौशल्य, एकाग्रता व धान्याची ओळख व उपयोग ही उद्दिष्टे या उपक्रमातून आपण साध्य करू शकतो. विशेष म्हणजे यासाठी घरगुती साहित्याचा उपयोग करू शकतो किंवा शालेय पोषण आहारातील धान्याचा उपयोग आपण करू शकतो.

वर्गशिक्षिका अनुप्रीता व्याळेकर या सातत्याने पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अध्यापन करीत असून, आदर्श शाळेतील वर्ग पहिलीला हा पथदर्शी अभ्यासक्रम आहे. तो विद्यार्थ्यांना सहज आकलन व्हावा, आनंददायी वाटावा यासाठी कृतीतून शैक्षणिक अध्यापन देण्यासाठी मनापासून प्रयत्न करीत आहेत. कोविड काळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी असे मनोरंजनात्मक उपक्रम इतर शाळेतही राबविल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी निश्चित उपयोगी पडेल, असे मत मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

मनोरंजनातून अध्ययनाकडे वाटचाल

धान्याची आकृती काढणे, चित्र तयार करणे, फुलांची आकृती करणे, धान्य व फुले. पाने यांच्यापासून त्रिकोण, चौकोन तयार करून संख्याज्ञान होणे, रंगविलेले खडे यांची विभागणी करणे, मोजणे, मनोरंजनात्मक गाणी, गोष्टी असे मनोरंजनात्मक शैक्षणिक अध्यापन करून विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी व शिक्षणात गोडी निर्माण करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे शैक्षणिक कार्य आदर्श जिल्हा परिषद शाळा बोराखेडी येथे सुरू आहे. बोराखेडी येथील शिक्षक अशा मनोरंजनात्मक खेळातून विविध नावीन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांना आनंदाने ज्ञान देत असल्यामुळे सन २०२१-२२ यावर्षी वर्ग १ लीमध्ये ५७ विद्यार्थी दाखल झाले आहेत.