शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

आधुनिक शेतीसाठी ‘इन्फॉर्मेशन कॉर्नर’    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 20:21 IST

हिवरा आश्रम (बुलडाणा) : शेतीच्या समृध्दीसाठी शेतक-यांना शेतीसंबंधी आधुनिक माहिती उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे. त्याकरिता विवेकानंद महाविद्यालयाच्यावतीने ‘इन्फॉर्मेशन कॉर्नर’ सुरू करण्यात आला आहे. याव्दारे शेतकºयांसाठी आधुनिक शेती संबधीत माहिती, शेतकरी यशोगाथा, शेती पुरक व्यवसाय माहिती, कीड व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, बागायती शेती, पशू पालन, फळबाग लागवड यासंबंधी माहिती देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देबळीराजाच्या ज्ञानात पडणार भरआधुनिक शेती संबधीत देण्यात येणार माहिती 

ओमप्रकाश देवकरलोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम (बुलडाणा) : शेतीच्या समृध्दीसाठी शेतक-यांना शेतीसंबंधी आधुनिक माहिती उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे आहे. त्याकरिता विवेकानंद महाविद्यालयाच्यावतीने ‘इन्फॉर्मेशन कॉर्नर’ सुरू करण्यात आला आहे. याव्दारे शेतकºयांसाठी आधुनिक शेती संबधीत माहिती, शेतकरी यशोगाथा, शेती पुरक व्यवसाय माहिती, कीड व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, बागायती शेती, पशू पालन, फळबाग लागवड यासंबंधी माहिती देण्यात येणार आहे.हिवरा आश्रम येथील विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी कार्यानुभवाच्या विद्यार्थींनींनी ग्रामपंचायत कार्यालयात इन्फॉर्मेशन कॉर्नर सुरू केले आहे. याबाबत गुरूवारी हिवराआश्रम येथे शेतकºयांना माहिती देण्यात आली. यावेळी मुंगशीदेव डाखोरे, प्रा.विश्वनाथ गव्हाळे, विशाल घागरे, अजयअवसरमोल, दशरथ साबळे, अमोल अंभोरे, शरद तुपकरी यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. भारत हा देश कृषि प्रधान देश म्हणून ओळखला जातो. देशातीत नागरीक शेती व शेतीशी संबंधी रोजगारावर अवलंबून आहे. शेतकºयांनी आपल्या चाकोरीच्या बाहेर पडून शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीची उत्पादकता व उत्पन्न वाढवावे. शेतीच्या समृध्दीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, पारंपरिक पद्धतीने पीक घेण्याच्या पद्धतीमुळे पिकाचे उत्पन्न कमी येते म्हणून शेतकºयाने नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यास उत्पादनात निश्चित वाढ होते. देशातील साक्षर पिढी शेती व्यवसायात उतरत आहे. त्यामुळे शेती व्यवसायात होत असलेल्या नवनवीन बदलांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. यांत्रिकीकरणाच्या वापरामुळे मनुष्यबळाचा वापर कमी होऊन कामाची गुणवत्ता सुधारते. यामुळे पारंपारिक शेतीमध्ये बदल करून तुषार, ठिबक सिंचनाच्या सहाय्याने बागायती शेती करावी, अशी माहिती यावेळी शेतकरी बांधवांना देण्यात आली. विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या कृषी सृष्टी ग्रुपमध्ये शीतल फुपाटे, सोनम इंगळे, चैताली भालेराव, पुनम आव्हाड, पल्लवी काळे, मनिषा भोरकडे, विपश्यना इंगोले, प्रीती कदम, पूजा कुणबीथोप या विद्यार्थींनींचा समावेश आहे. विवेकानंद कृषी सृष्टी ग्रुपच्या विद्यार्थींनींना प्राचार्य डॉ.सुभाष कालवे, प्रा.मनोज खोडके यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

शेतकरी बांधवांसाठी इन्फॉर्मेशन कॉर्नर अत्यंत महत्वपूर्ण आहे. शेतकरी बांधवांना या फलकाच्या माध्यमातून विविध उपयुक्त माहिती देण्याची व्यवस्था विवेकानंद कृषी सृष्टी ग्रुपच्या विद्यार्थींनींनी केली आहे.- डॉ. सुभाष कालवे, प्राचार्य विवेकानंद कृषी महाविद्यालय, हिवराआश्रम.

इन्फॉर्मेशन कॉर्नरच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी बांधवाच्या ज्ञानात निश्चितच भर पडेल . या फलकावरील   माहिती नियमित अद्यावत करण्यात येणार आहे.- मंजुषा क-हाडे, विद्यार्थीनी, विवेकानंद कृषी, महाविद्यालय.