शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये महागाईचा भडका, सर्वसामान्य त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:26 IST

काेराेनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाने विविध निर्बंध लादले आहेत़ त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेची पिळवणूक सुरू झाली ...

काेराेनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाने विविध निर्बंध लादले आहेत़ त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेची पिळवणूक सुरू झाली आहे़ शेतकऱ्यांना आपला भाजीपाला बाजार बंद झाल्याने विकता येत नसल्याचे चित्र आहे़ दुसरबीड परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये उन्हाळी भाजीपाल्याची लागवड केली़ मात्र, ते विकण्याकरिता कोराेना महामारीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत़ भाजीपाल्याची योग्य वेळेमध्ये विक्री न झाल्यास त्याची नासाडी होत आहे तसेच सर्वसामान्यांना आपल्या दैनंदिन गरजा भागविण्याकरिता लागणारा किराणा महाग झाला आहे़ त्याचप्रमाणे लॉकडाऊन काळामध्ये शेतीकरिता लागणारे साहित्य त्याचप्रमाणे बांधकाम व्यावसायिकांमध्ये सिमेंट, लोखंड, विटांचे भाव भरमसाठ वाढले़ त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहेत़ अनेक लोकांना पावसाचे दिवस जवळ येत असल्यामुळे आपली कच्ची घरे दुरूस्त करण्याकरिता लोखंडी पत्रे, सिमेंट, दरवाजे विकत घ्यावे लागतात परंतु संचारबंदी लागू असल्यामुळे सर्वसामान्यांना या वस्तू घेणे कठीण होऊन बसले़ त्याचप्रमाणे अव्वाच्या सव्वा भाव घेऊन या वस्तू खरेदी करावा लागत आहे़ पेरणी हंगामाचे दिवस समोर येत असून शेतीची कामे शेतकऱ्यांना करावी लागतात परंतु त्याला लागणारे साहित्य महाग झाल्यामुळे अडचणीत वाढ झाली आहे़ एका बाजूला काेराेना महामारीचे संकट उभे असताना वाढत्या महागाईने सर्वसामान्य आर्थिक संकटात सापडले आहेत़