लोणार तालुक्यातील प्रकारलोणार : तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामीणभागात नागरिक नदी पात्रात खड्डे खोदून त्यामधील पाणी पित आहेत. हे पाणीदुषित असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या चार वर्षाच्या दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या लोणार तालुक्यातपाणीबाणीची परिस्थिती उदभवली आहे. सरकारी खचार्ने मागील वर्षी टँकरने वविहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरु होता. गेल्या वर्षी समाधानकारकपाऊस झाल्याने तालुका टँकरमुक्त होईल असे दिसत होते. मात्र सध्या तापमानदिवसेंदिवस वाढत असल्याने भूगभार्तील पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळेभीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. गावोगावी पाणीपुरवठा योजनांचाबोजवारा झालेला असल्यामुळे टँकरची मागणी पुढे येत आहे.गेल्या वर्षी सरासरीपेक्षा तालुक्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तरकाही ठिकाणी अल्पस्वरुपाचा पाऊस पडल्याने त्याचा परिणाम शेतीउत्पन्नावरही झाला. तालुक्यातील जनतेला भीषण पाणीटंचाईतून मुक्तकरण्यासाठी विहिरी अधिग्रहण व टँकरची सुविधा करून पाणीपुरवठा मागीलवषार्पासून उन्हाळ्यात होत आहे. मात्र जलस्वराज , महाजल सारख्या ग्रामीणपाणी पुरवठा करण्यासाठी राबविण्यात आलेल्या योजना केवळ कागदोपत्रीचराबविल्याने आणि त्यात करोडो रुपयांचा घोटाळा संबधित अधिकारी आणिगावपातळीवर असलेल्या समितीच्या हातमिळवणी झाल्याने गावकऱ्यांना गेल्या १५वषार्पासून पाण्यासाठी प्रत्येक उन्हाळ्यात भटकंती करावी लागत आहे. ठोसउपाययोजना होत नसल्याने तालुक्यातील जनतेला यावर्षीही भीषण पाणीसंकटालातोंड द्यावे लागत आहे. तालुक्यातील पाण्याचे तलाव कोरडे पडत आहेत.विहिरी, कुपनलिका आदीच्या पाण्याने तळ गाठला आहे. पिण्याच्या पाण्यासाठीजनतेला रणरणत्या उन्हात वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळेतालुक्यातील अनेक गावांचे टँकरसाठीचे व विहिरी अधिग्रहण चे प्रस्तावपंचायत समिती व तहसीलमध्ये दाखल झाले आहेत.
नागरिक पितात झºयातील दुषित पाणी
By admin | Updated: April 27, 2017 13:52 IST