शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 15:06 IST

तीन वर्षात तब्बल ५४४ कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे समोर आली आहेत.

ठळक मुद्देकौटुंबिक हिंसाचाराने ग्रस्त असलेल्या महिला आता त्यांच्या हक्कासाठी समोर येत आहेत. तब्बल ३६७ प्रकरणे थेट न्याय प्रविष्ठ करावी लागली आहे. आतापर्यंत सात महिलांना वनस्टॉप सेंटरचा लाभ झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या काही काळात महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढलेले असल्याचे निदर्शनास येत असतानाच जिल्ह्यात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनामध्येही वाढ झाल्याचे समोर येत आहे. जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालयातंर्गत प्राप्त आकडेवारी पाहता ही संख्या वाढत असून तीन वर्षात तब्बल ५४४ कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे समोर आली आहेत. त्यातील तब्बल ३६७ प्रकरणे थेट न्याय प्रविष्ठ करावी लागली आहे. तीन वर्षांचा तक्रारींचा ओघ पाहता हा आकडा सातत्याने वाढता असल्याचे चित्र आहे.महिलांची सुरक्षा तथा त्यांच्या न्याय हक्काच्या दृष्टीने महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालय (स्टेट) अंतर्गत पीडित महिलांना प्रामुख्याने मदत करण्यात येत आहे. महिला अत्याचारामध्ये वाढ झालेली असतााच कौटुंबिक हिंसाचाराचेही प्रमाण वाढल्याचे एकंदरीत चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालयाचीही जबाबदारी आता वाढली आहे. नाही म्हणायला अलिकडील काळात या विभागाने केलेल्या जनजागृतीचाही दृ्श्यपरिणाम दिसत असून कौटुंबिक हिंसाचारामुळे पीडित महिलाही आता आपल्या न्याय हक्कासाठी पुढे येत आहे ही एक या विषयाची सकारात्मक बाजू म्हणावी लागले. दरम्यान लैंगिक अत्याचार प्रकरणातील महिलांनाही मनोधैर्य योजनेतंर्गत आर्थिक मदत करण्यात येत असते. २०१८ पासून ही मदत आता विधी व न्यायप्राधिकरणातंर्गत करण्यात येत असून यापूर्वी ती जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी कार्यालयातंर्गत करण्यात येत होती.दुसरीकडे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी तथा कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात पीडित महिलांसाठी आता १३ ही तालुकास्तरावर अभय केंद्र संरक्षण अधिकारी कार्यालय स्थापन करण्यात आले असून तेथे पीडित महिलांना त्वरित मदत करण्यात येते. या केंद्रांच्या माध्यमातून झालेल्या जनजागृतीमुळेच कौटुंबिक हिंसाचाराने ग्रस्त असलेल्या महिला आता त्यांच्या हक्कासाठी समोर येत आहेत.दरम्यान, या अभय केंद्राच्यामध्ये तालुकास्तरावर संरक्षण अधिकारीही नियुक्त करण्यात आले असून देऊळगाव राजा, शेगाव आणि जळगाव जामोद आणि मलकापूर येथील संरक्षण अधिकारी हे त्याच्या लगतच्या तालुक्याचा कारभार पाहत आहे.विशेष म्हणजे या संरक्षण अधिकाऱ्यांना समन्स बजावण्यासह पीडित महिलेसाठी न्यायालयाकडून मदत मागण्याचे काही अधिकारही देण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील पीडित महिलांना याचा मोठा लाभ होत आहे. जिल्ह्यात यापूर्वी कौटुंबि हिंसाचाराच्या घटनापैकी जवळपास ७५ ते ८० प्रकरणे ही वर्षाकाठी न्यायालयात दाखल होत होती. त्यात अलिकडील काळात वाढ झाल्याचेही महिला व बालकल्याण अधिकारी कार्यालयातील सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.वनस्टॉप सेंटरचा महिलांना आधारराज्यातील जवळपास २६ जिल्ह्यामध्ये पीडित महिलांना सुरक्षा तथा न्याय हक्क, आरोग्य, पोलिस समुपदेशन, तात्पुरता निवारा आणि विधी सहाय्य पुरविण्यात येत असू बुलडाण्यात दहा सप्टेंबर २०१९ पासून खºया अर्थाने हे केंद्र सुरू झाले आहे. आतापर्यंत सात महिलांना या केंद्राचा लाभ झाला आहे. प्रामुख्याने किमान पाच दिवस पीडित महिलेला येथे सुविधा पुरविण्यात येतात. त्यानंतर स्वाधार केंद्रामध्ये महिलेची रवानगी केली जाते. तेथे तीन वर्षापर्यंत शासकीय खर्चातून पीडित महिलेला सुविधा पुरविण्यात येतात. ५५ वर्षाच्या आसपास महिला असल्यास तीला प्रसंगी पाच वर्षासाठी स्वाधार केंद्रात ठेवता येते असे सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाwomen and child developmentमहिला आणि बालविकास