शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

जानेफळ बायपास मार्गाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:36 IST

गावातून होणारी लहान-मोठ्या वाहनांची वर्दळ पाहता, संभाव्य अपघाताचा धोका टाळण्याच्या दृष्टीने गावाबाहेरून बायपास मार्ग काढण्यात आला. परंतु, संबंधित विभागाचे ...

गावातून होणारी लहान-मोठ्या वाहनांची वर्दळ पाहता, संभाव्य अपघाताचा धोका टाळण्याच्या दृष्टीने गावाबाहेरून बायपास मार्ग काढण्यात आला. परंतु, संबंधित विभागाचे याकडे नेहमीच दुर्लक्ष झाल्यामुळे आज बायपास मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची अवस्था बघून खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील मुख्य मार्गावरच सर्व दुकाने तसेच शाळा-महाविद्यालयसुद्धा मार्गालगतच आहेत. मुख्य बाजारपेठेमुळे महिला व ग्रामस्थांची नेहमी असणारी गर्दी तसेच शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची होणारी गर्दी आणि त्यातच अरुंद मुख्य रस्त्यावरूनच अवजड वाहतूक सुरू असल्याने अपघाताची भीती वाढली आहे. सध्या दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यातच अल्पवयीन मुलांमध्ये दुचाकी तसेच चारचाकी वाहने चालविण्याची हौस जडली आहे. त्यांच्या वाहनाच्या सुसाट वेगामुळे अपघाताची भीती अधिकच वाढली आहे. त्यामुळे बायपास मार्गाची दुरुस्ती तातडीने होणेेेे अत्यंत गरजेचे आहे.

नवीन रस्ता करण्याची गरज

बायपास मार्गाची दुरवस्था झाल्याने या मार्गाची तात्पुरती मलमपट्टी आजपर्यंत अनेकवेळा करण्यात आली आहे. परंतु, ती अवजड वाहनांमुळे टिकत नसल्याने काही दिवसातच पुन्हा बायपास मार्गाची अवस्था जैसे थे होते. त्यामुळे वेळोवेळी दुरुस्तीवर वारेमाप खर्च करण्यापेक्षा या मार्गाचे काम पुन्हा एकदा नव्याने करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.