शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
4
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
5
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
6
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
7
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
8
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
9
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
10
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
11
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
12
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
13
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
14
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
15
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
16
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
17
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
18
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
19
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
20
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...

जानेफळ बायपास मार्गाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:36 IST

गावातून होणारी लहान-मोठ्या वाहनांची वर्दळ पाहता, संभाव्य अपघाताचा धोका टाळण्याच्या दृष्टीने गावाबाहेरून बायपास मार्ग काढण्यात आला. परंतु, संबंधित विभागाचे ...

गावातून होणारी लहान-मोठ्या वाहनांची वर्दळ पाहता, संभाव्य अपघाताचा धोका टाळण्याच्या दृष्टीने गावाबाहेरून बायपास मार्ग काढण्यात आला. परंतु, संबंधित विभागाचे याकडे नेहमीच दुर्लक्ष झाल्यामुळे आज बायपास मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची अवस्था बघून खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील मुख्य मार्गावरच सर्व दुकाने तसेच शाळा-महाविद्यालयसुद्धा मार्गालगतच आहेत. मुख्य बाजारपेठेमुळे महिला व ग्रामस्थांची नेहमी असणारी गर्दी तसेच शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची होणारी गर्दी आणि त्यातच अरुंद मुख्य रस्त्यावरूनच अवजड वाहतूक सुरू असल्याने अपघाताची भीती वाढली आहे. सध्या दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यातच अल्पवयीन मुलांमध्ये दुचाकी तसेच चारचाकी वाहने चालविण्याची हौस जडली आहे. त्यांच्या वाहनाच्या सुसाट वेगामुळे अपघाताची भीती अधिकच वाढली आहे. त्यामुळे बायपास मार्गाची दुरुस्ती तातडीने होणेेेे अत्यंत गरजेचे आहे.

नवीन रस्ता करण्याची गरज

बायपास मार्गाची दुरवस्था झाल्याने या मार्गाची तात्पुरती मलमपट्टी आजपर्यंत अनेकवेळा करण्यात आली आहे. परंतु, ती अवजड वाहनांमुळे टिकत नसल्याने काही दिवसातच पुन्हा बायपास मार्गाची अवस्था जैसे थे होते. त्यामुळे वेळोवेळी दुरुस्तीवर वारेमाप खर्च करण्यापेक्षा या मार्गाचे काम पुन्हा एकदा नव्याने करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.