शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

वनीकरणच्या मजुरांवर उपासमारीची वेळ

By admin | Updated: July 4, 2017 00:12 IST

रोहयो अंतर्गत बारमाही काम मिळण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : सामाजिक वनीकरणाच्या चिखली परिक्षेत्रात बारमाही मजूर म्हणून कामावर असलेल्या मजुरांची नरेगा उपायुक्तांच्या आदेशामुळे कपात केली जात आहे. परिणामत: या मजुरांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली असल्याने तालुक्यातील सुमारे ६० मजुरांनी याबाबत न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जि.प. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती श्वेता महाले यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नागपूर आयुक्त यांनी एका पत्रानुसार अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी रोपवन संरक्षण व संगोपनाबाबत ३० जून २०११ च्या शासन निर्णयाद्वारे मार्गदर्शक सूचना देऊन बिहार पॅटर्ननुसार एक वर्षातील प्रती कुटुंब मनुष्य दिवस हे १०० दिवसांपेक्षा कमी असणे आवश्यक असल्याने रोपवन संरक्षण व संगोपनाची कार्यवाही कुटुंबांनी चक्रीय पध्दतीने करणे आवश्यक आहे. १०० दिवसांपेक्षा अधिक काळासाठी सलग एकाच कुटुंबांकडून काम करून घेण्यात येणार नाही, याची यापुढे दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना सामाजिक वनीकरणला दिल्याने ज्या मजुराला १०० दिवस पूर्ण झाले आहे, अशा मजुरांची सामाजिक वनीकरण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कपात करणे सुरू केले आहे. त्यामुळे चिखली परिक्षेत्रात गेल्या २० ते २५ वर्षांपासून वृक्ष लागवड व संवर्धनाचे काम करणाऱ्या मजुरांवर बेरोजगारीचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रोजंदारी वन कामगार कृती समितीचे अध्यक्ष परमेश्वर कदम यांच्या नेतृत्वात तालुक्यातील विविध गावातील सुमारे ६० मजुरांनी जि.प.सभापती श्वेता महाले यांना निवेदन दिले असून, मजूर कपातीमुळे आमच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. कुटुंबाचे पालनपोषण व मुलांच्या शिक्षणाचा खर्च मजुरीवरच अवलंबून असल्याने याप्रकरणी न्याय मिळवून द्यावा व बारमाही काम देण्यात यावे, असे साकडे घातले आहे. या निवेदनावर तालुक्यातील विविध गावांतील सुमारे ६० मजुरांच्या स्वाक्षरी आहेत.श्वेता महाले घेणार मंत्र्यांची भेट! केवळ मजुरी हेच उपजीविकेचे साधन असलेल्या या गरीब मजुरांच्या निवेदनाची दखल घेत जि.प.सभापती श्वेता महाले यांनी या मागणीसंदर्भाने लवकरच रोहयो मंत्री ना. जयकुमार रावळ यांची भेट घेऊन मजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती दिली आहे.