शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

वनीकरणच्या मजुरांवर उपासमारीची वेळ

By admin | Updated: July 4, 2017 00:12 IST

रोहयो अंतर्गत बारमाही काम मिळण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : सामाजिक वनीकरणाच्या चिखली परिक्षेत्रात बारमाही मजूर म्हणून कामावर असलेल्या मजुरांची नरेगा उपायुक्तांच्या आदेशामुळे कपात केली जात आहे. परिणामत: या मजुरांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली असल्याने तालुक्यातील सुमारे ६० मजुरांनी याबाबत न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जि.प. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती श्वेता महाले यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नागपूर आयुक्त यांनी एका पत्रानुसार अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी रोपवन संरक्षण व संगोपनाबाबत ३० जून २०११ च्या शासन निर्णयाद्वारे मार्गदर्शक सूचना देऊन बिहार पॅटर्ननुसार एक वर्षातील प्रती कुटुंब मनुष्य दिवस हे १०० दिवसांपेक्षा कमी असणे आवश्यक असल्याने रोपवन संरक्षण व संगोपनाची कार्यवाही कुटुंबांनी चक्रीय पध्दतीने करणे आवश्यक आहे. १०० दिवसांपेक्षा अधिक काळासाठी सलग एकाच कुटुंबांकडून काम करून घेण्यात येणार नाही, याची यापुढे दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना सामाजिक वनीकरणला दिल्याने ज्या मजुराला १०० दिवस पूर्ण झाले आहे, अशा मजुरांची सामाजिक वनीकरण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कपात करणे सुरू केले आहे. त्यामुळे चिखली परिक्षेत्रात गेल्या २० ते २५ वर्षांपासून वृक्ष लागवड व संवर्धनाचे काम करणाऱ्या मजुरांवर बेरोजगारीचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रोजंदारी वन कामगार कृती समितीचे अध्यक्ष परमेश्वर कदम यांच्या नेतृत्वात तालुक्यातील विविध गावातील सुमारे ६० मजुरांनी जि.प.सभापती श्वेता महाले यांना निवेदन दिले असून, मजूर कपातीमुळे आमच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. कुटुंबाचे पालनपोषण व मुलांच्या शिक्षणाचा खर्च मजुरीवरच अवलंबून असल्याने याप्रकरणी न्याय मिळवून द्यावा व बारमाही काम देण्यात यावे, असे साकडे घातले आहे. या निवेदनावर तालुक्यातील विविध गावांतील सुमारे ६० मजुरांच्या स्वाक्षरी आहेत.श्वेता महाले घेणार मंत्र्यांची भेट! केवळ मजुरी हेच उपजीविकेचे साधन असलेल्या या गरीब मजुरांच्या निवेदनाची दखल घेत जि.प.सभापती श्वेता महाले यांनी या मागणीसंदर्भाने लवकरच रोहयो मंत्री ना. जयकुमार रावळ यांची भेट घेऊन मजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती दिली आहे.