शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

हजारो क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत !

By admin | Updated: April 28, 2017 00:52 IST

उपविभागीय अधिकाऱ्यांनी केंद्रास भेट देऊन केला पंचनामा: नाफेड तूर खरेदी पूर्ववत होण्याची शेतकऱ्यांना आशा

मेहकर : शासनाने तूरीला ५०५० रुपये हमी भाव दिल्याने नाफेड व खरेदी केंद्रावर तूर उत्पादक शेतकऱ्यांची गर्दी पाहता अजूनही मुदत वाढ होईल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांसमक्ष उपविभागीय महसूल अधिकारी डॉ.निलेश अपार यांनी २७ एप्रिल रोजी नाफेड केंद्रास भेट देवून पंचनामा केला. यावेळी अजूनही केंद्रावर जवळपास ३५ हजार क्विंटल तूर मोजणीच्या प्रतिक्षेत असल्याचे निदर्शनास आले आहे. गतवर्षी खरीपाच्या पेरणीपूर्वी तुरीचे भाव दहा हजार रुपये क्विंटल असल्याने शेतकऱ्यांनी सन २०१६-१७ या खरीप हंगामामध्ये तुरीचा पेरा कमालीपेक्षा जास्त वाढविल्याने तुरीचे उत्पन्न देखील पावसाळा समाधानकारक झाल्याने दुपटीने वाढले. मात्र खाजगी बाजार व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीचा भाव ३ ते ४ हजार रुपये प्रति क्विंटल तर नाफेडचा भाव ५०५० रुपये प्रति क्विंटल असल्याने शेतकऱ्यांनी नाफेड केंद्रावर तूर विक्रीस आणली असता १५ ते २० दिवस नंबरच लागत नसल्याने शेतकऱ्यांचे वाहन भाडे हजारो रुपयामध्ये खर्ची होत आहे. शेतकऱ्यांनी १५ ते २२ एप्रिल दरम्यान वाहनांची नोंद करुन वाहन परत आपल्या सोयीच्या ठिकाणी रिकामे केले. यामध्ये अनेक शेतकऱ्यांना आर्थिक, शारीरिक मनस्ताप सहन करावा लागला. या बाबीची दखल घेत २७ एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश अपार, तहसिलदार संतोष काकडे, कृउबासचे सभापती माधवराव जाधव, माजी जि.प.सदस्य दत्ता पाटील शेळके, खरेदी विक्रीचे उपाध्यक्ष देशमुख सह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.