शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

साखरखेर्डा मंडळात पुन्हा मुसळधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:24 IST

साखरखेर्डा : साखरखेर्डा मंडळात मंगळवारी (दि. १३) आिण बुधवारी मुसळधार पाऊस पडल्याने शेतांत पाणी साचले होते. काही ...

साखरखेर्डा : साखरखेर्डा मंडळात मंगळवारी (दि. १३) आिण बुधवारी मुसळधार पाऊस पडल्याने शेतांत पाणी साचले होते. काही ठिकाणी शेतीचे बांध फुटल्याने शेतजमीन खरडून गेल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

साखरखेर्डा मंडळातील राताळी, मोहाडी, सवडद, साखरखेर्डा भागांत मंगळवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. तब्बल एक तास मुसळधार पाऊस पडल्याने शेतांमध्ये पाणी साचल्याने शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते़ गेल्या दीड महिन्यापासून साखरखेर्डा मंडळात पावसाने चांगलीच दमदार हजेरी लावून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे़ त्याचबरोबर अतिवृष्टी होत असल्याने छोटे-मोठे बांध फुटले आहेत. बांध फुटल्यामुळे शेतजमीन आणि पिके खरडून गेली आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. सिंदखेडराजा तालुक्यात काही भागांत अतिवृष्टी, तर काही भागांत जेमतेम पाऊस पडत असल्याचे दिसून येत आहे. साखरखेर्डा परिसरातील अनेक पाझर तलाव गावतलाव ९० टक्के भरले आहेत. नदी-नाले खळाळून वाहत आहेत, असे दिलासादायक चित्र दिसून येत आहे. मलकापूर पांगरा, दुसर बीड, किनगाव राजा, सोनोशी मंडळात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

अनेक शेतकऱ्यांचे नुकसान

मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नंदकिशोर रिंढे यांच्या शेतातील फुटलेल्या बांधामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. मोहाडी ते फाटा या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नाली काढलेल्या नसल्याने पाणी रस्त्यावरच साचते. याची दखल घेऊन जिल्हा परिषोच्या बांधकाम विभागाने नाली काढून पाण्याची वहिवाट मोकळी करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु कनिष्ठ अभियंता यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जाता-येता गुडघाभर पाण्यातून वाट शोधत जावे लागते. याची दखल अधिकाऱ्यांनी घेतली नाही तर आंदोलनाचा इशारा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवदास रिंढे यांनी दिला आहे़