शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

बुलडाणा जिल्ह्यात आठ मंडळामध्ये अतिवृष्टी; शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 14:14 IST

बुलडाणा तालुक्यातील सात पैकी चार मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून तांदुळवाडी, कोलवड परिसरात मोठ्या प्रमाणावर या पावसाने नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: अवर्षणाचा फटका सहन करणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यात जून महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात पहिल्यांदाच सार्वत्रिक स्वरुपाचा झालेला पाऊस खरीप हंगामाच्या दृष्टीने पोषक ठरणारा आहे. दरम्यान, जिल्ह्यात ९० मंडळांपैकी आठ मंडळ आणि खामगाव शहरात अतिवृष्टी झाल्याने अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. प्रामुख्याने बुलडाणा तालुक्यातील सात पैकी चार मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून तांदुळवाडी, कोलवड परिसरात मोठ्या प्रमाणावर या पावसाने नुकसान झाले आहे.बुधवारी रात्री जिल्ह्यात या सार्वत्रिक पावसाने हजेरी लावली. जवळपास दोन तास पावसाची संततधार सुरू होती. गुरूवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ३०.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस हा बुलडाणा तालुक्यात ६१ मिमी तर शेगाव तालुक्यात ५२.२ मिमी पडला. , म्हसला बुद्रूक, धाड, देऊळघाट, साखळी बुद्रूक, डोणगाव, अमडापूर, धोडप, टिटवी या मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरी ६६७.८ मिमी पाऊस पडतो. यंदाच्या पडलेल्या पावसाची त्याच्याशी तुलना करता वार्षिक सरासरीच्या ११.५१ टक्के पाऊस पडला आहे. जून महिन्याच्या सरासरीशी तुलना करता ती ५४.३१ टक्के आहे. दरम्यान पडलेल्या या सार्वत्रिक स्वरुपाच्या पावसामुळे शेतकरी सुखावला असून जिल्ह्यात सर्वत्र पेरण्यांनी वेग घेतला आहे. जवळपास २० दिवस उशिराने का होईना हा पाऊस आला असून एक प्रकारे खरीप हंगामातील पेरणीमध्ये या पावसाने जान आणली आहे. परिणामी कृषी विभागास किमान पक्षी आता आपतकालीन नियोजन करण्याची तुर्तास तरी गरज भासणार नसल्याचे चित्र या पावसामुळे निर्माण झाले आहे. दरम्यान असे असले तरी देऊळगाव राजा तालुक्यात अद्याप अपेक्षीत असा पाऊस पडलेला नाही. या तालुक्यात जून महिन्याच्या सरासरीचा विचार करता अवघा १८.७९ टक्केच पाऊस पडला आहे.अतिवृष्टीमुळे तांदुळवाडी, कोलवडमध्ये नुकसानदेऊळघाट सर्कलमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बुलडाणा तालुक्यातील तांदुळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर शेत जमीन खरडून गेली आहे. सोबतच गावा लगतच्या ६० ते ७० घरामध्ये पुराचे पाणी घुसून ग्रामस्थांचे गृहोपयोगी साहित्य पुरात वाहून गेले. त्यामुळे गावातील जवळपास २५ कुटुंबांच्या घरात गुरूवारी चुल पेटू शकली नाही. पुरामुळे प्रकाश रिंढे व अन्य एका व्यक्तीचे सुमारे साडेतीनशे पक्षी मृत पावले असून चार बकºयाही दगावल्या आहेत. या व्यतिरिक्त शेतीचे मोठे नुकसान झाले असून नदीकाठच्या शेतात दगडांचा खच निर्माण झाला आहे. तांदुळवाडी परिसरात शेतकऱ्यांच्या जवळपास २६ ते २७ विहीरी खचल्या असून शेतकºयांची मोठी आर्थिक हानी झाली आहे. अशीच काहीशी परिस्थिती ही कोलवड परिसरातही झाली असल्याचे चित्र आहे. दरम्यान, या प्रकरणी तहसिलदारांनी नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवकांना दिले आहे.टिटवी मंडळात सर्वाधिक पाऊस४जिल्ह्यातील आठ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून यामध्ये लोणार तालुक्यातील टिटवी मंडळात तब्बल १०३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल अमडापूर मंडळात १०० मिमी, साखळी बुद्रूक मध्ये ८६, धाड मंडळात ८१ मिमी, डोणगावमध्ये ७८, म्हसला बुद्रूकमध्ये ७१, देऊळघाटमध्ये ७३, धोडपमध्ये ७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या पावसाळ््यातील ही पहिलीच अतिवृष्टी आहे, असे म्हंटल्यास वावगे ठरू नये.दोन जण वाहून गेल्याची अफवा पैनगंगा नदीला बुधवारी मध्यरात्री आलेल्या पुरात दोन जण वाहून गेल्याची अफवा दिवसभर होती. मात्र तथ्य तपासले असता ती अफवाच असलेल्या बुलडाणा तहसिलमधील आपत्ती विभागाशी सबंधित लिपीकाने स्पष्ट केले. मात्र पुराच्या पाण्यात एक चार चाकी वाहन वाहून जाता जाता बचावले. या वाहनातील नागरिक सुरक्षीतपणे बाहेर पडले होते. मात्र ते कोण होते याची माहिती मिळू शकली नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस