शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

बुलडाणा जिल्ह्यात आठ मंडळामध्ये अतिवृष्टी; शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 14:14 IST

बुलडाणा तालुक्यातील सात पैकी चार मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून तांदुळवाडी, कोलवड परिसरात मोठ्या प्रमाणावर या पावसाने नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: अवर्षणाचा फटका सहन करणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यात जून महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात पहिल्यांदाच सार्वत्रिक स्वरुपाचा झालेला पाऊस खरीप हंगामाच्या दृष्टीने पोषक ठरणारा आहे. दरम्यान, जिल्ह्यात ९० मंडळांपैकी आठ मंडळ आणि खामगाव शहरात अतिवृष्टी झाल्याने अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. प्रामुख्याने बुलडाणा तालुक्यातील सात पैकी चार मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून तांदुळवाडी, कोलवड परिसरात मोठ्या प्रमाणावर या पावसाने नुकसान झाले आहे.बुधवारी रात्री जिल्ह्यात या सार्वत्रिक पावसाने हजेरी लावली. जवळपास दोन तास पावसाची संततधार सुरू होती. गुरूवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ३०.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस हा बुलडाणा तालुक्यात ६१ मिमी तर शेगाव तालुक्यात ५२.२ मिमी पडला. , म्हसला बुद्रूक, धाड, देऊळघाट, साखळी बुद्रूक, डोणगाव, अमडापूर, धोडप, टिटवी या मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरी ६६७.८ मिमी पाऊस पडतो. यंदाच्या पडलेल्या पावसाची त्याच्याशी तुलना करता वार्षिक सरासरीच्या ११.५१ टक्के पाऊस पडला आहे. जून महिन्याच्या सरासरीशी तुलना करता ती ५४.३१ टक्के आहे. दरम्यान पडलेल्या या सार्वत्रिक स्वरुपाच्या पावसामुळे शेतकरी सुखावला असून जिल्ह्यात सर्वत्र पेरण्यांनी वेग घेतला आहे. जवळपास २० दिवस उशिराने का होईना हा पाऊस आला असून एक प्रकारे खरीप हंगामातील पेरणीमध्ये या पावसाने जान आणली आहे. परिणामी कृषी विभागास किमान पक्षी आता आपतकालीन नियोजन करण्याची तुर्तास तरी गरज भासणार नसल्याचे चित्र या पावसामुळे निर्माण झाले आहे. दरम्यान असे असले तरी देऊळगाव राजा तालुक्यात अद्याप अपेक्षीत असा पाऊस पडलेला नाही. या तालुक्यात जून महिन्याच्या सरासरीचा विचार करता अवघा १८.७९ टक्केच पाऊस पडला आहे.अतिवृष्टीमुळे तांदुळवाडी, कोलवडमध्ये नुकसानदेऊळघाट सर्कलमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बुलडाणा तालुक्यातील तांदुळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर शेत जमीन खरडून गेली आहे. सोबतच गावा लगतच्या ६० ते ७० घरामध्ये पुराचे पाणी घुसून ग्रामस्थांचे गृहोपयोगी साहित्य पुरात वाहून गेले. त्यामुळे गावातील जवळपास २५ कुटुंबांच्या घरात गुरूवारी चुल पेटू शकली नाही. पुरामुळे प्रकाश रिंढे व अन्य एका व्यक्तीचे सुमारे साडेतीनशे पक्षी मृत पावले असून चार बकºयाही दगावल्या आहेत. या व्यतिरिक्त शेतीचे मोठे नुकसान झाले असून नदीकाठच्या शेतात दगडांचा खच निर्माण झाला आहे. तांदुळवाडी परिसरात शेतकऱ्यांच्या जवळपास २६ ते २७ विहीरी खचल्या असून शेतकºयांची मोठी आर्थिक हानी झाली आहे. अशीच काहीशी परिस्थिती ही कोलवड परिसरातही झाली असल्याचे चित्र आहे. दरम्यान, या प्रकरणी तहसिलदारांनी नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवकांना दिले आहे.टिटवी मंडळात सर्वाधिक पाऊस४जिल्ह्यातील आठ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून यामध्ये लोणार तालुक्यातील टिटवी मंडळात तब्बल १०३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल अमडापूर मंडळात १०० मिमी, साखळी बुद्रूक मध्ये ८६, धाड मंडळात ८१ मिमी, डोणगावमध्ये ७८, म्हसला बुद्रूकमध्ये ७१, देऊळघाटमध्ये ७३, धोडपमध्ये ७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या पावसाळ््यातील ही पहिलीच अतिवृष्टी आहे, असे म्हंटल्यास वावगे ठरू नये.दोन जण वाहून गेल्याची अफवा पैनगंगा नदीला बुधवारी मध्यरात्री आलेल्या पुरात दोन जण वाहून गेल्याची अफवा दिवसभर होती. मात्र तथ्य तपासले असता ती अफवाच असलेल्या बुलडाणा तहसिलमधील आपत्ती विभागाशी सबंधित लिपीकाने स्पष्ट केले. मात्र पुराच्या पाण्यात एक चार चाकी वाहन वाहून जाता जाता बचावले. या वाहनातील नागरिक सुरक्षीतपणे बाहेर पडले होते. मात्र ते कोण होते याची माहिती मिळू शकली नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस