शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

बुलडाणा जिल्ह्यात आठ मंडळामध्ये अतिवृष्टी; शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 14:14 IST

बुलडाणा तालुक्यातील सात पैकी चार मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून तांदुळवाडी, कोलवड परिसरात मोठ्या प्रमाणावर या पावसाने नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: अवर्षणाचा फटका सहन करणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यात जून महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात पहिल्यांदाच सार्वत्रिक स्वरुपाचा झालेला पाऊस खरीप हंगामाच्या दृष्टीने पोषक ठरणारा आहे. दरम्यान, जिल्ह्यात ९० मंडळांपैकी आठ मंडळ आणि खामगाव शहरात अतिवृष्टी झाल्याने अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. प्रामुख्याने बुलडाणा तालुक्यातील सात पैकी चार मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून तांदुळवाडी, कोलवड परिसरात मोठ्या प्रमाणावर या पावसाने नुकसान झाले आहे.बुधवारी रात्री जिल्ह्यात या सार्वत्रिक पावसाने हजेरी लावली. जवळपास दोन तास पावसाची संततधार सुरू होती. गुरूवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ३०.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस हा बुलडाणा तालुक्यात ६१ मिमी तर शेगाव तालुक्यात ५२.२ मिमी पडला. , म्हसला बुद्रूक, धाड, देऊळघाट, साखळी बुद्रूक, डोणगाव, अमडापूर, धोडप, टिटवी या मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरी ६६७.८ मिमी पाऊस पडतो. यंदाच्या पडलेल्या पावसाची त्याच्याशी तुलना करता वार्षिक सरासरीच्या ११.५१ टक्के पाऊस पडला आहे. जून महिन्याच्या सरासरीशी तुलना करता ती ५४.३१ टक्के आहे. दरम्यान पडलेल्या या सार्वत्रिक स्वरुपाच्या पावसामुळे शेतकरी सुखावला असून जिल्ह्यात सर्वत्र पेरण्यांनी वेग घेतला आहे. जवळपास २० दिवस उशिराने का होईना हा पाऊस आला असून एक प्रकारे खरीप हंगामातील पेरणीमध्ये या पावसाने जान आणली आहे. परिणामी कृषी विभागास किमान पक्षी आता आपतकालीन नियोजन करण्याची तुर्तास तरी गरज भासणार नसल्याचे चित्र या पावसामुळे निर्माण झाले आहे. दरम्यान असे असले तरी देऊळगाव राजा तालुक्यात अद्याप अपेक्षीत असा पाऊस पडलेला नाही. या तालुक्यात जून महिन्याच्या सरासरीचा विचार करता अवघा १८.७९ टक्केच पाऊस पडला आहे.अतिवृष्टीमुळे तांदुळवाडी, कोलवडमध्ये नुकसानदेऊळघाट सर्कलमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बुलडाणा तालुक्यातील तांदुळवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर शेत जमीन खरडून गेली आहे. सोबतच गावा लगतच्या ६० ते ७० घरामध्ये पुराचे पाणी घुसून ग्रामस्थांचे गृहोपयोगी साहित्य पुरात वाहून गेले. त्यामुळे गावातील जवळपास २५ कुटुंबांच्या घरात गुरूवारी चुल पेटू शकली नाही. पुरामुळे प्रकाश रिंढे व अन्य एका व्यक्तीचे सुमारे साडेतीनशे पक्षी मृत पावले असून चार बकºयाही दगावल्या आहेत. या व्यतिरिक्त शेतीचे मोठे नुकसान झाले असून नदीकाठच्या शेतात दगडांचा खच निर्माण झाला आहे. तांदुळवाडी परिसरात शेतकऱ्यांच्या जवळपास २६ ते २७ विहीरी खचल्या असून शेतकºयांची मोठी आर्थिक हानी झाली आहे. अशीच काहीशी परिस्थिती ही कोलवड परिसरातही झाली असल्याचे चित्र आहे. दरम्यान, या प्रकरणी तहसिलदारांनी नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवकांना दिले आहे.टिटवी मंडळात सर्वाधिक पाऊस४जिल्ह्यातील आठ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून यामध्ये लोणार तालुक्यातील टिटवी मंडळात तब्बल १०३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल अमडापूर मंडळात १०० मिमी, साखळी बुद्रूक मध्ये ८६, धाड मंडळात ८१ मिमी, डोणगावमध्ये ७८, म्हसला बुद्रूकमध्ये ७१, देऊळघाटमध्ये ७३, धोडपमध्ये ७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या पावसाळ््यातील ही पहिलीच अतिवृष्टी आहे, असे म्हंटल्यास वावगे ठरू नये.दोन जण वाहून गेल्याची अफवा पैनगंगा नदीला बुधवारी मध्यरात्री आलेल्या पुरात दोन जण वाहून गेल्याची अफवा दिवसभर होती. मात्र तथ्य तपासले असता ती अफवाच असलेल्या बुलडाणा तहसिलमधील आपत्ती विभागाशी सबंधित लिपीकाने स्पष्ट केले. मात्र पुराच्या पाण्यात एक चार चाकी वाहन वाहून जाता जाता बचावले. या वाहनातील नागरिक सुरक्षीतपणे बाहेर पडले होते. मात्र ते कोण होते याची माहिती मिळू शकली नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRainपाऊस