शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

लस घेतल्यानंतर घरी जाण्याची घाई पडू शकते महागात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:23 IST

बुलडाणा : कोरोना प्रतिबंधित लस घेतल्यानंतर किमान अर्धा तास लसीकरण केंद्रात थांबण्यासाठी आरोग्य कर्मचारी वारंवार सांगतात. परंतु अनेकांना लस ...

बुलडाणा : कोरोना प्रतिबंधित लस घेतल्यानंतर किमान अर्धा तास लसीकरण केंद्रात थांबण्यासाठी आरोग्य कर्मचारी वारंवार सांगतात. परंतु अनेकांना लस घेतल्यानंतर केंद्रात बसणे जीवावर येते. लसीची ॲलर्जी असलेल्यांसाठी हा अर्धा तास महत्त्वाचा असतो. त्यामुळे लस घेतल्यानंतर घरी जाण्याची घाई महागात पडू शकते. कोरोना प्रतिबंधित लसीकरणाची व्याप्ती आता वाढली आहे. आतापर्यंत केवळ ४५ वयाच्यावरील नागरिकांनाच लस दिली जात होती. परंतु आता पुन्हा ३० ते ४४ वयोगटातील लसीकरणालाही १९ जूनपासून सुरुवात करण्यात आल्याने लस घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या आता झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लसीकरणाचा टक्काही आता पुढील काही दिवसातच वाढणार आहे. येणारा आठवडा लसीकरणाचे लाभार्थी वाढविणारा आहे. परंतु लस घेत असताना आरोग्य विभागाकडून सांगण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणेही आवश्यक आहे. बहुतांश लाभार्थी आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. लस घेतल्यानंतर लसीकरण केंद्रात अर्धा तास थांबणे अत्यंत आवश्यक असताना, काही नागरिक लस घेतल्यानंतर पाच ते दहा मिनिटे थांबतात आणि लगेच निघून जात असल्याचे प्रकार अनेक केंद्राच्या ठिकाणी समोर येत आहेत.

लस घेतली, तरीही नियम आवश्यकच

लस घेतल्यानंतर एखाद्याला त्रास झाला, तर त्याला तातडीने वैद्यकीय मदत त्या केंद्रावर मिळते. त्यामुळे लस घेतल्यानंतर लगेचच घरी जाण्याची घाई कुणीही करू नये. अर्धा तास त्या केंद्रातच बसावे. शिवाय कोरोनाची ही लस कोरोनापासून संरक्षणासाठी आहे. त्यामुळे लस घेतली तरीही प्रत्येकाने नियम पाळलेच पाहिजेत. मास्क लावणे, बाहेर सुरक्षित अंतर ठेवणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यकच आहे.

डॉ. बाळकृष्ण कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

प्रत्येकाला केंद्रात थांबण्याची केली जाते विनंती

आता गावोगावी कोरोना प्रतिबंधित लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. शाळा किंवा ग्रामपंचायतमध्ये लसीकरण शिबिर घेतले, तरी त्या ठिकाणीही लस घेणाऱ्यांना थांबण्याची व्यवस्था केली जाते. लसीकरणानंतर प्रत्येकाला केंद्रात थांबण्याची विनंती आम्ही करतो.

डॉ. प्रवीणकुमार निकस, वैद्यकीय अधिकारी.

काय आहे अर्ध्या तासाचे महत्त्व?

कोरोना प्रतिबंधित लस घेतल्यानंतर लसीमुळे आपल्याला काही दुष्परिणाम जाणवतात का, हे लसीनंतरच्या अर्ध्या तासात समजू शकते. त्यामुळे काही दुष्परिणाम जाणवल्यास तातडीने वैद्यकीय उपचारही घेता येतात. लसीची ॲलर्जी असलेल्यांमध्ये ॲनाफिलॅक्सिस होण्याची शक्यता असते. त्यामुळे पुढील अर्धा तास महत्त्वाचा असतो. परंतु हा त्रास सर्वांनाच होईल, असे नाही, त्यामुळे घाबरून न जाता प्रत्येकाने लस घ्यावी.

एकूल लसीकरण : ५०६७९५

पहिला डोस: ३९५३१०

दुसरा डोस: १११४८५

एकूण लसीकरण केंद्र : ९०

३० ते ४० वयोगटासाठी केंद्र: ०७