लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतकऱ्यांना कर्जमुक्त न करता, त्यांची थट्टा करणाऱ्या सरकारच्या कोणत्याही मंत्र्यास ध्वजारोहन करु देणार नाही, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमुद आहे की, शेतकरी बांधवांना संपुर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष व सुकाणु समितीच्या वतीने गेल्या अनेक महिण्यांपासून लढा सुरु आहे. आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आमदार बच्चु कडू यांच्या नेतृत्वात अनेक आंदोलनेही करण्यात आली आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या रास्त मागण्याकडे शासन लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे शासनाच्या कुठल्याही मंत्र्यास ध्वलारोहन करु न देण्याचा निर्णय आमदार बच्चु कडू यांनी घेतला आहे. बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात येते. मात्र यावेळी सदर ध्वजारोहन पालकमंत्रा किंवा शासनाच्या कुठल्याही मंत्र्यांच्या हस्ते न करता जिल्हाधिकारी यांनी स्वत: किंवा शेतकरी बांधवांच्या हस्ते करण्यात यावे, अशी मागणी देखील निवेदनातून करण्यात आली आहे. नव्हे तर मंत्र्यांच्याहस्ते ध्वजारोहन करण्याचा प्रयत्न झाल्यास, उधळून लावू, असा ईशाराही जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते, उपजिल्हाप्रमुख राणा संजय इंगळे, निलेश गुजर, निलेश घोंगे, मलकापूर विधानसभा संपर्कप्रमुख संभाजी शिर्के, बुलडाणा तालुकाप्रमुख प्रदिप टाकसाळ, नांदुरा तालुकाप्रमुख रामेश्वर काटे, महिला आघाडी प्रमुख प्रांजली धोरण, बुलडाणा तालुका उपप्रमुख अनंत उबाळे, शुभम लहाने, समाधान जाधव, युवा आघाडी प्रमुख संदीप गाडेकर यांनी दिला आहे.
पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करण्यापासुन रोखणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 20:27 IST
बुलडाणा : शेतकऱ्यांना कर्जमुक्त न करता, त्यांची थट्टा करणाऱ्या सरकारच्या कोणत्याही मंत्र्यास ध्वजारोहन करु देणार नाही, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.
पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करण्यापासुन रोखणार
ठळक मुद्देप्रहार जनशक्ती पक्षाचा इशाराशेतकरी बांधवांना संपुर्ण कर्जमुक्ती देण्यात यावी ही मागणी