शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

रेशीम उद्योगाचा वाढतोय विस्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:36 IST

१ सप्टेंबर १९९७ रोजी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, उद्योग संचालनालय व विदर्भ विकास महामंडळ हे तिन्ही विभाग एकत्र ...

१ सप्टेंबर १९९७ रोजी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, उद्योग संचालनालय व विदर्भ विकास महामंडळ हे तिन्ही विभाग एकत्र करून रेशीम विभाग हा स्वतंत्र् रेशीम संचालनालय म्हणून कार्यरत झाला. रेशीम उद्योग आज चांगला नावारूपाला आला आहे. रेशीम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी सहा. संचालक आर. टी. जोगदंड यांनी आर्थिक उन्नती होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना तुती लागवडीचे आवाहन केले. २०२२-२३ मध्ये नवीन तुती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये ठराव घेऊन ग्रामपंचायतीमार्फत कृती आराखड्यात नाव समाविष्ट केल्यानंतर अधिकृत तुती लागवड नोंदणीकरिता जिल्हा रेशीम कार्यालय, बुलडाणा येथे संपर्क करावा, असे आवाहन केले.

एन. जी. साहू, एम. पी. घाटे, बी. एल. कुमावत, अविनाश खरसने, रामदास आटोळे, गुळवे रेशीम शेती सेवा व चॉकी सेंटरचे संचालक जगदिशचंद्र गुळवे व मुकुंंद पारवे यांनी शेतकऱ्यांना तुती लागवडीविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुळवे यांनी केले. आभार एन. जी. साहू यांनी मानले.

तुती लागवडीला चालना

रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी तुती लागवडीचा उपक्रम जिल्हाभर राबविण्यात येत आहे. रेशीम शेतीकडे अनेक शेतकरी वळले असून, हे जिल्हा रेशीम कार्यालयाचे मोठे यश आहे. जिल्ह्यात सध्या तुती लागवडीला चालना मिळत असल्याचे मत तुती लागवड शेतकऱ्यांनी व्यक्त केले.