शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

खोट्या सहय़ा करून अनुदान लाटले

By admin | Updated: April 15, 2015 00:49 IST

मेहकर येथील वसतिगृहाचा कारभार चव्हाट्यावर.

मेहकर (जि. बुलडाणा ) : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुला-मुलींच्या गृहपालाने वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या खोट्या सहय़ा करून तसेच विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणार्‍या अनुदानाचा गैरवापर करून लाखो रुपये हडपल्याचे वास्तव समोर आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहाला १३ एप्रिल रोजी आ.डॉ. संजय रायमुलकर यांनी भेट देऊन पाहणी केली असता, वसतिगृहाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला. स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींच्या शासकीय वसतिगृहामध्ये पिण्याच्या पाण्याची कुठलीच व्यवस्था नाही. अंघोळीसाठी जे पाणी वापरण्यात येते तेच मुलींना पिण्यासाठी देण्यात येते. पाण्याच्या एकाही टाकीवर झाकण नाही. घाणयुक्त पाणी आहे. पाण्याचा प्रत्यक्षात तुटवडा असतानाही रेकॉर्डवर मात्र दररोज दोन टँकर दाखवल्या जातात. मुलींना शासनाकडून येणारे कोणतेही साहित्य व गणवेश देण्यात आले नाहीत. विद्यार्थ्यांना खिचडी देऊ नये, असा सक्त आदेश असतानाही आठवड्यातील दोन वेळा विद्यार्थ्यांना खिचडीच देण्यात येते. मांसाहारी जेवणसुद्धा देण्यात येत नाही. वसतिगृहामध्ये विद्यार्थिनींची संख्या कमी असल्यास रेकॉर्डवर जाणीवपूर्वक जास्त विद्यार्थिनी दाखवून अनुदान हडपल्या जाते. शासनाकडून मिळणार्‍या सुविधा मुलींपर्यंंत पोहचतच नाहीत. गृहपालाची तक्रार केल्यास त्या विद्यार्थिनींवर दबाव आणून त्यांना धमकावण्यात येते. शासनाच्या नियमाचे या वसतिगृहामध्ये उल्लंघन होत असून, विद्यार्थिनींचे हाल होत असल्याचे वास्तव आ.डॉ. संजय रायमुलकर यांनी वसतिगृहाची पाहणी केली असता समोर आले आहे. तसेच तालुक्या तील खंडाळा देवी येथील मुलांच्या वसतिगृहामध्येसुद्धा अशीच परिस्थिती आहे. या ठिकाणी तर विद्यार्थ्यांच्या खोट्या सहय़ा करून विविध योजनांचे अनुदान हडपल्याचा प्रकार समोर आला आहे. या ठिकाणीसुद्धा पाण्याची दयनीय अवस् था आहे. पाण्याचा अभाव असल्यामुळे मुलांना ४ ते ५ दिवस अंघोळीविना राहावे लागत आहे. गृहपालाचे कोणतेच नियंत्रण वसतिगृहावर नसून, शासनाकडून येणारे लाखो रुपये अनुदान लाटण्याचा प्रकार सुरू असल्याचे आ. रायमुलकर यांनी उघडकीस आणले आहे. तरी तत्काळ चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी आ.डॉ. संजय रायमुलकर यांनी सामाजिक न्यायमंत्री व जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे केली आहे. तसेच सदर प्रकरण विधानसभेत मांडणार असल्याचेही सांगितले. दरम्यान, मेहकर येथील वसतिगृहाच्या गृहपाल रजनी वैद्य यांनी वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांंना सर्व सुविधा पुरविल्या जा तात. मध्यंतरी बँका बंद असल्याने थोडी असुविधा झाली होती. शासनाकडून येणार्‍या सर्व सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांंना देण्यात येत असल्याचे सांगीतले.