शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणूक, लढतीचे चित्र आज होणार स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:28 IST

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यात १३ हजार २७७ व्यक्तींनी १३ हजार ६०९ अर्ज दाखल केले होते. छाननीदरम्यान ...

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यात १३ हजार २७७ व्यक्तींनी १३ हजार ६०९ अर्ज दाखल केले होते. छाननीदरम्यान यातील १७९ उमेदवारांचे २१० अर्ज नामंजूर झाले होते. त्यामुळे प्रत्यक्षात निवडणूक रिंगणात १३ हजार ९८ उमेदवार आहेत. यापैकी किती जण ४ जानेवारीला अर्ज मागे घेतात, याकडे सध्या लक्ष लागले आहे.

१० लाख ३४ हजार मतदार

जिल्ह्यातील ६२ टक्के ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, १० लाख ३४ हजार ३३ मतदार या निवडणुकीत ४७५१ उमेदवार १,७७१ प्रभागातून ते निवडून देण्यात येणार आहे. दरम्यान ५ लाख ४३ हजार ५११ पुरुष मतदार तर ४ लाख ९० हजार ५२२ महिला मतदार निवडणुकीत १५ जानेवारी रोजी मतदान करतील.

पक्षीय हस्तक्षेप वाढला

कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपसह अन्य पक्षही यावेळी निवडणुकीत सक्रिय झाले असून, गावपातळीवर आपले सदस्य कसे निवडून येतील, यासाठी अर्ज दाखल केलेल्या अनेकांची माघारीसाठी मनधरणी करत असल्याचे चित्र आहे.

दृष्टीक्षेपात निवडणूक

निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती : ५७०

निवडून द्यावयाचे एकूण सदस्य : ४,७५१

एकूण प्रभाग : १,७७१

उमेदवारी अर्ज दाखल करणारे एकूण उमेदवार:- १३,२७७

छाननीत अर्ज नामंजूर झालेले उमेदवारांचे अर्ज:- १७९

छाननीनंतर शिल्लक असलेले उमेदवार :- १३,०९८

एकूण मतदारांची संख्या:- १०,३४,०३३

महिला मतदारांची संख्या:- ४,९०,५२२

पुरुष मतदार:- ५,४३,५११