शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेड राजाच्या राजवाड्याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या - काझी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:39 IST

सिंदखेड राजा : जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या ऐतिहासिक सिंदखेड राजा नगरीतील स्मारकांना राष्ट्रीय स्मारकांचा दर्जा दिला जावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे ...

सिंदखेड राजा : जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या ऐतिहासिक सिंदखेड राजा नगरीतील स्मारकांना राष्ट्रीय स्मारकांचा दर्जा दिला जावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी केली आहे. यासंदर्भात काझी यांनी खा. सुप्रिया सुळे यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत शहरातील ऐतिहासिक स्मारकांच्या छायाचित्रांसह दस्तऐवज त्यांनी सुळे यांना दाखविले. त्या लवकरच शहरात येऊन पाहणी करणार असल्याचे काझी म्हणाले.

शनिवारी सिंदखेड राजा येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली. नाझेर काझी, नरेश शेळके यांनी सुप्रिया सुळे यांची मुंबई ९ सप्टेंबर रोजी भेट घेतली होती. त्यात १९८१ मध्ये तत्कालीन म़ुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांनी तत्कालीन खा. बाळकृष्ण वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली सिंदखेड राजा विकासासंदर्भात समिती स्थापन केली होती. या समितीने जो अहवाल सरकार दरबारी दिला होता त्यात त्यावेळी १०० कोटींच्या विकास आराखड्याचा उल्लेख आहे. देशातील अव्दितीय समाधीस्थळांपैकी राजे लखुजीराव जाधव यांची समाधी उल्लेखित केली गेली आहे. १०० कोटींच्या निधीमधून राष्ट्रीय स्मारकांचे संवर्धन व सौर्दयीकरण शहराचा विविध अंगी विकास, असे या अहवालात नमूद करण्यात आले होते, असे ते म्हणाले. शहरातील १३ ऐतिहासिक स्मारकांच्या जतन व संवर्धनाच्या संदर्भात राज्य व केंद्रीय पुरातत्त्व विभागाशी संपर्क साधून योग्य तो मार्ग काढण्याबाबत खा. सुप्रिया सुळे यांनी त्यांना आश्वासित केले आहे. पत्रकार परिषदेस विजय तायडे, शिवाजी राजे जाधव, राजेंद्र अंभोरे, संभाजी पेटकर, जगन सहाने, ॲड. संदीप मेहेत्रे, यासीन शेख प्रामुख्याने उपस्थित होते.

--मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा व्हावी--

१२ जानेवारीच्या जिजाऊ जन्मोत्सवाला राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते जिजाऊंची महापूजा व्हावी. त्याचबरोबर १२ जानेवारी ही शासकीय सुट्टी घोषित करावी, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, जालना-खामगाव-शेगाव हा रेल्वेमार्ग मार्गी लागावा, यासाठी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे स्वत: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ३०० कोटींच्या शहर विकास आराखड्याची चर्चा झाली. सदर अहवालात २५० कोटी रुपये केवळ शहराच्या पुनर्वसनासाठी खर्च केेले जाणार असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे हा अहवाल समाधानकारक नसल्याचे काझी म्हणाले. शहराच्या दक्षिण-पश्चिम भागात वनविभागाचे २९८ हेक्टर विस्तीर्ण जंगल इको टुरिझमसाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.