अकोला : आलेल्या संकटांचा सामना करीत, विपरीत परिस्थितीतही अथक परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर नवीन प्रयोग करून यशस्वीरित्या शेती करणार्या शेतकर्यांचे लोकमतने मंगळवारी कौतुक केले. वर्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील ३६ शेतकर्यांना कृषिरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जगाचा पोशिंदा मानल्या जाणार्या शेतकर्याच्या वाट्याला कौतुकाचे शब्द कमी आणि दु:खच जास्त येते. विपरीत परिस्थितीत शेतकरी त्याचे काम करीत असतो. कशाचीही पर्वा न करता वर्षभर तो शेतात राबत असतो. त्याच्या घामातूनच धान्यरूपी मोती उगवत असतात. अनेक शेतकर्यांनी निराशा झटकून आणि विपरीत परिस्थितीवर मात करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उत्कृष्ट शेती केली. त्यांचे हे कार्य इतर शेतकर्यांसाठीदेखील प्रेरणादायी ठरले. या शेतकर्यांच्या कामाचे कौतुक लोकमतने मंगळवारी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या डॉ. ठाकरे सभागृहात मंगळवारी वर्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील ३६ शेतकर्यांना ह्यकृषिरत्नह्ण पुरस्कार देण्यात आला. लोकमतच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व कृषी क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणार्या धानुका अँग्रीटेक लिमिटेड या कंपनीने स्वीकारले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. पी.जी. इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धानुका अँग्रीटेक लिमिटेडचे जनरल मॅनेजर एच.एम. रावळ होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी, तर प्रमुख अतिथी म्हणून महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. एस.डी. वानखडे, जिल्हा कृषी अधिकारी डॉ. प्रमोद लहाळे, कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. विजय माहोरकर, अकोला-वाशिम जिल्हा कृषी व्यावसायिक संघाचे अध्यक्ष प्रभाकर गावंडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर लोकमत अकोला आवृत्तीचे निवासी संपादक रवी टाले, सहाय्यक महाव्यवस्थापक रमेश डेडवाल हेदेखील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते कृषिरत्न पुरस्कार विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. रवी टाले यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका विषद केली. मान्यवरांनी आपल्या भाषणातून लोकमतच्या स्तुत्य उपक्रमाचे आणि प्रयोगशील शेतकर्यांचे कौतुक केले. ३७ शेतकर्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते ह्यकृषिरत्नह्ण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमादरम्यान नृत्यांगणा राधिका साठे यांच्या कथ्थक नृत्य मंदिरच्या चमुने गणेश वंदना व होळी नृत्य सादर केले. किशोर बळी यांनी एकपात्री विनोदी कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे संचालन राजेश शेगोकार यांनी केले, तर आभार विकल्प ठाकूर यांनी मानले.
अकोल्यात गौरव कृषिरत्नांचा
By admin | Updated: May 28, 2014 01:24 IST