शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा काढण्यासाठी बँकेसमोर गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:58 IST

सिंदखेडराजा: राष्ट्रीय पीक योजनेंतर्गत शेतकºयांना दोन वर्ष पडलेल्या दुष्काळामुळे चांगला फायदा मिळाला होता. त्यामुळे यावर्षीसुद्धा दुष्काळाचे सावट दिसत असल्यामुळे व विमा भरण्यासाठी कमी कालावधी उरल्यामुळे बँकेसमोर ३० जुलैला शेतकºयांच्या रांगा लागल्या होत्या

ठळक मुद्देयावर्षीसुद्धा दुष्काळाचे सावट विमा भरण्यासाठी उरला कमी कालावधी

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: राष्ट्रीय पीक योजनेंतर्गत शेतकºयांना दोन वर्ष पडलेल्या दुष्काळामुळे चांगला फायदा मिळाला होता. त्यामुळे यावर्षीसुद्धा दुष्काळाचे सावट दिसत असल्यामुळे व विमा भरण्यासाठी कमी कालावधी उरल्यामुळे बँकेसमोर ३० जुलैला शेतकºयांच्या रांगा लागल्या होत्या. शासनाच्या आदेशान्वरे सुटीचा दिवस असूनही सर्वच राष्ट्रीयीकृत बँका सुरू ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे शेतकºयांची गर्दी वाढली होती.राष्ट्रीय पीक विमा काढण्यासाठी शासनाने सीएससी केंद्रावर आॅनलाइन विमा भरण्यासाठी २१ जुलै रोजी मान्यता दिली होती; परंतु एका केंद्रावर एका दिवसात २० ते २५ शेतकºयांचा विमा भरण्यात आला. तेथेसुद्धा शेतकºयांची प्रचंड गर्दी झाली होती. २८ जुलै रोजी सदर सेंटरवर विमा भरणे बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला व २९ जुलैपासून राष्ट्रीयीकृत बँकेसह जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेतसुद्धा विमा भरण्याचे आदेश मिळताच बँकेसमोर शेतकºयांच्या रांगा लागल्या होत्या. विमा भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे. त्यामुळे रविवारीसुद्धा विमा भरण्यासाठी बँक उघडी होती, असे बँक व्यवस्थापक रवींद्र चौरपगारे व ई.एस. पवार यांनी सांगितले.अंढेरा येथे तलाठ्याची गैरहजेरीअंढेरा: देऊळगावराजा तालुक्यातील महत्त्वाचे समजल्या जाणाºया अंढेरा येथे तलाठ्याच्या गैरहजेरीमुळे शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे ३० जुलै रोजी तलाठी कार्यालयावर पीक विमा भरण्यासाठी लागणारे ७/१२, ८ अ, पीक पेरा दाखला घेण्यासाठी शेतकºयांनी तलाठी कार्यालयाला बेशरमीचा हार घालून तलाठ्यांचा निषेध व्यक्त केला. पीक विमा भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०१७ असल्याने जिल्हाधिकाºयांनी तलाठ्यांना युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश दिले असून, ३० जुलै (रविवार) ला राष्टÑीयीकृत बँकासुद्धा पीक विमा रक्कम भरण्यासाठी सुरू आहेत; परंतु येथील तलाठी लोखंडे यांनी गेल्या २ दिवसांपासून कार्यालयाकडे पाठ फिरवली आहे. एवढेच नव्हे तर जिल्हाधिकाºयांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली. त्यामुळे येथील शेतकरी सुभाष डोईफोडे यांनी तहसीलदार बाजड, मंडळ अधिकारी टाके यांना फोन करून तलाठी गैरहजर असल्याचे सांगितले. त्यानंतर शेतकºयांना पीक विमा भरण्यासाठी लागणारे दाखले मिळण्यासाठी तत्काळ दखल घेत तहसीलदार बाजड व टाके यांनी अनिकेत नारखडे यांना अंढेरा येथे पाठविले. थोड्याच दिवसांपूर्वी अंढेरा येथील भाग १ चे तलाठी यांचा पदभार तहसीलदार बाजड यांनी काढून कामचुकार तलाठ्यावर कार्यवाही केली होती. याकडे लक्ष देण्याची मागणी सुभाष डोईफोडे, सुभाष गाडे, विठ्ठल देशमुख, राजू तेजनकर, रामप्रसाद देशमुख, वामन सानप, दामू सानप, सुनील दंडे, किशोर सानप यांनी केली आहे.