लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: राष्ट्रीय पीक योजनेंतर्गत शेतकºयांना दोन वर्ष पडलेल्या दुष्काळामुळे चांगला फायदा मिळाला होता. त्यामुळे यावर्षीसुद्धा दुष्काळाचे सावट दिसत असल्यामुळे व विमा भरण्यासाठी कमी कालावधी उरल्यामुळे बँकेसमोर ३० जुलैला शेतकºयांच्या रांगा लागल्या होत्या. शासनाच्या आदेशान्वरे सुटीचा दिवस असूनही सर्वच राष्ट्रीयीकृत बँका सुरू ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे शेतकºयांची गर्दी वाढली होती.राष्ट्रीय पीक विमा काढण्यासाठी शासनाने सीएससी केंद्रावर आॅनलाइन विमा भरण्यासाठी २१ जुलै रोजी मान्यता दिली होती; परंतु एका केंद्रावर एका दिवसात २० ते २५ शेतकºयांचा विमा भरण्यात आला. तेथेसुद्धा शेतकºयांची प्रचंड गर्दी झाली होती. २८ जुलै रोजी सदर सेंटरवर विमा भरणे बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला व २९ जुलैपासून राष्ट्रीयीकृत बँकेसह जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेतसुद्धा विमा भरण्याचे आदेश मिळताच बँकेसमोर शेतकºयांच्या रांगा लागल्या होत्या. विमा भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे. त्यामुळे रविवारीसुद्धा विमा भरण्यासाठी बँक उघडी होती, असे बँक व्यवस्थापक रवींद्र चौरपगारे व ई.एस. पवार यांनी सांगितले.अंढेरा येथे तलाठ्याची गैरहजेरीअंढेरा: देऊळगावराजा तालुक्यातील महत्त्वाचे समजल्या जाणाºया अंढेरा येथे तलाठ्याच्या गैरहजेरीमुळे शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे ३० जुलै रोजी तलाठी कार्यालयावर पीक विमा भरण्यासाठी लागणारे ७/१२, ८ अ, पीक पेरा दाखला घेण्यासाठी शेतकºयांनी तलाठी कार्यालयाला बेशरमीचा हार घालून तलाठ्यांचा निषेध व्यक्त केला. पीक विमा भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०१७ असल्याने जिल्हाधिकाºयांनी तलाठ्यांना युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश दिले असून, ३० जुलै (रविवार) ला राष्टÑीयीकृत बँकासुद्धा पीक विमा रक्कम भरण्यासाठी सुरू आहेत; परंतु येथील तलाठी लोखंडे यांनी गेल्या २ दिवसांपासून कार्यालयाकडे पाठ फिरवली आहे. एवढेच नव्हे तर जिल्हाधिकाºयांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली. त्यामुळे येथील शेतकरी सुभाष डोईफोडे यांनी तहसीलदार बाजड, मंडळ अधिकारी टाके यांना फोन करून तलाठी गैरहजर असल्याचे सांगितले. त्यानंतर शेतकºयांना पीक विमा भरण्यासाठी लागणारे दाखले मिळण्यासाठी तत्काळ दखल घेत तहसीलदार बाजड व टाके यांनी अनिकेत नारखडे यांना अंढेरा येथे पाठविले. थोड्याच दिवसांपूर्वी अंढेरा येथील भाग १ चे तलाठी यांचा पदभार तहसीलदार बाजड यांनी काढून कामचुकार तलाठ्यावर कार्यवाही केली होती. याकडे लक्ष देण्याची मागणी सुभाष डोईफोडे, सुभाष गाडे, विठ्ठल देशमुख, राजू तेजनकर, रामप्रसाद देशमुख, वामन सानप, दामू सानप, सुनील दंडे, किशोर सानप यांनी केली आहे.
पीक विमा काढण्यासाठी बँकेसमोर गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:58 IST
सिंदखेडराजा: राष्ट्रीय पीक योजनेंतर्गत शेतकºयांना दोन वर्ष पडलेल्या दुष्काळामुळे चांगला फायदा मिळाला होता. त्यामुळे यावर्षीसुद्धा दुष्काळाचे सावट दिसत असल्यामुळे व विमा भरण्यासाठी कमी कालावधी उरल्यामुळे बँकेसमोर ३० जुलैला शेतकºयांच्या रांगा लागल्या होत्या
पीक विमा काढण्यासाठी बँकेसमोर गर्दी
ठळक मुद्देयावर्षीसुद्धा दुष्काळाचे सावट विमा भरण्यासाठी उरला कमी कालावधी