शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

मनाविरूध्द घडणाऱ्या गोष्टी विसरणे हा यशाचा राजमार्ग - संतोष तोतरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 11:18 IST

कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता केलेले कर्म हीच खरी सेवा आहे. मनस्थिती बदलली की परिस्थिती आपोआप बदलते.

- अनिल गवई

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: समाजात आणि संसारात सर्वच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. काही गोष्टी ह्या मनाविरूध्द आणि इच्छेविरूध्द घडतात. मनाविरूध्द घडणाºया घटना तात्काळ विसरून जाणे, हाच सुखी होण्याचा आणि यशाचा राजमार्ग होय. जीवनविद्या मिशनचे संतोष तोतरे यांच्याशी यांच्याशी साधलेला संवाद...

जीवनविद्या मिशनचे कार्य कशा पद्धतीने चालतं?

महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये जीवनविद्या मिशनचा प्रसार झाला. महाराष्ट्र आणि गोवा राज्यात लक्षावधी लोकांनी जीवनविद्येचा स्विकार केला असून महाराष्ट्रात जीवन विद्या मिशनच्या ६२ शाखा आहेत. तर मध्यप्रदेश आणि गोवा येथे प्रत्येकी एक शाखा आहे. प्रबोधनाच्या माध्यमातून देशातील ७२ हजारांवर युवकांच्या मनात जीवनविद्येने आमुलाग्र बदल घडविला आहे. संत्सग मार्गाचे आधुनिक शिल्पकारच सदगुरू वामनराव पै होत.

जीवन विद्येच्या संकल्पाबद्दल काय सांगाल ?

हे जग सुखी व्हावे, हे हिंदुस्थान राष्ट्र सर्वार्थाने सर्व राष्ट्राच्या पुढे जावे. हेच दोन प्रमुख सिध्दांत जीवन विद्येचे आहेत. प्रत्येकाच्या मनातील चैतन्य शक्ती जागृत करण्यावरही जीवन विद्येचा नेहमीच भर राहीला आहे.

निकोप आणि सुदृढ समाज निर्मितीसाठी जीवन विद्येचे प्रयत्न काय ?

समाजातील व्यसनाधिता तसेच नैराश्य दूर करण्यासाठी जीवन विद्या मिशनचे मोठ्याप्रमाणावर महाराष्ट्र, गोवा आणि मध्यप्रदेशात कार्य सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने अंधश्रध्दा निर्मुलन, १० हजारापेक्षा जास्त युवकांना व्यसनापासून परावृत्त करण्यात आले. याशिवाय पर्यावरण जागृतीवरही जीवनविद्येचा भर आहे. खर्चिक विवाह पद्धतीला फाटा देण्यासाठी सामुहिक विवाह सोहळे आयोजित केले जातात. गरीब, कष्टकºयांना आधार देण्याचे काम जीवनविद्या मिशन गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहे. सदगुरू वामनराव पै यांच्या ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या सिंध्दाताभोवतीच जीवनविद्येचे तत्वज्ञान फिरते. कोणत्याही मोबदल्याच्या अपेक्षेने केलेले कर्म लौकिकदृष्ट्या कितीही चांगले असले तरी ते ‘सेवा’ या सदराखाली येत नाही. सेवेची पायरीचे स्थान अतिशय मोठे असून सेवा हेच एक फळ आहे.

जीवनविद्या मिशनशी आपण कधीपासून जुळलात ?

समाजाच्या उत्कर्षासाठी झटणाºया जीवन विद्या मिशनशी आपला बालपणापासूनच संपर्क आला आहे. सदगुरू वामनराव पै यांची मुंबईत प्रवचने चालायची. लहानपणापासूनच ही ती ऐकत आलो. जीवनविद्या मिशनमुळे आपल्या आयुष्यात आमुलाग्र बदल झाला. वयाच्या २२ व्या वषी जीवनविद्या मिशनच्या प्रबोधनाच्या वारशाचा साक्षीदार झालो. महाराष्ट्र, गोवा आणि इतर राज्यात सदगुरू वामनराव पै यांचे विज्ञाननिष्ठ विचार पोहोचविण्यासाठी गत २५ वर्षांपासून सेवारत असल्याचा अभिमान आहे.

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत