शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

पाच दिवसानंतर उघडली शाळा शाळेला

By admin | Updated: July 3, 2014 22:57 IST

पहिल्याच दिवशी ठोकले होते कुलूप

शेलगाव देशमुख : मेहकर तालुक्यातील विश्‍वी येथील जि.प.मराठी पूर्व शाळेला २६ जून रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रलंबीत मागण्यांसाठी कुलूप ठोकण्यात आले होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आज शाळेचे कुलूप तोडले, त्यामुळे तब्बल पाच दिवसानंतर शाळा खुली झाली.प्राप्त माहितीनुसार, विश्‍वी येथील जि.प.मराठी पूर्व माध्यमिक शाळेच्या जमीन हर्रासीची रक्कम जि.प.मध्ये जमा होऊन शाळेच्या विकासासाठी परत मिळत होती. परंतु २00५ पासून जि.प.कडे ३ लाख ६३ हजार १0७ रुपये पडून असल्याने सदर रकमेचा उपयोग शाळेच्या विकासासाठी करण्यात यावा, म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप देशमुख यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन हर्रासी मोबदला परत देण्यात यावा, अशी १२ जून रोजी मागणी केली होती. सदर रक्कम परत न मिळाल्यास शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकून शाळा बंद करण्याचा इशारा दिला होता. परंतु संबंधित अधिकार्‍यांनी या बाबीकडे दुर्लक्ष केल्याने २६ जून रोजी चिमुकल्यांना शाळेत जाता आले नाही. तर चक्क सतत पाच दिवस शाळा ग्रामपंचायतच्या व्हरांड्यामध्ये व सार्वजनिक वाचनालयामध्ये भरविण्यात आली होती. परंतु विद्यार्थ्यांंना शाळेच्या पहिल्याच दिवसाचा आनंद लुटता आला नाही. तसेच घाईघाईत नवागतांचे स्वागत आटोपून शिक्षकांना आपले विद्यार्थी ग्रामपंचायतमध्ये बसवावे लागले. पाच दिवसाच्या कालावधीमध्ये मेहकर तालुका गटशिक्षण अधिकारी अथवा इतर अधिकारी यांनी मुख्याध्यापकांनी माहिती देऊनही साधी भेट सुद्धा दिली नाही. शिक्षण प्रक्रियेत नवनवे प्रयोग करुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण करण्याचे कार्य करणारे गटशिक्षण अधिकारी किशोर पागोरे यांनी शाळेला भेटही दिली नाही, असे दिसून येते. मात्र शेवटी भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांंनी गेटचे कुलूप तोडत असल्याचे निवेदन १ जुलै रोजी प्रशासनाकडे दिले. त्यानंतर भरिप बहुजन महासंघाचे तालुका उपाध्यक्ष रामराव राठोड यांच्या नेतृत्वात सदर शाळा विद्यार्थ्यांंसाठी खुली करण्यात आली. यावेळी त्र्यंबक खंडारे, मुलचंद जाधव, पंजाब सिरसाट, सुरेश जाधव, रामदास मांजरे, संतोष आडे, मानिक राठोड, शेषराव आडे, गणेश जाधव, जितेश जाधव, उमेश चव्हाण, राजू जाधव, मदन अंभोरे, सुनिल राठोड, विष्णू जाधव, शाम वाघमारे, निलेश राठोड, रामराव जाधव व सुभाष जाधव यांचेसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी ५ दिवसापासून आपल्या शाळेपासून वंचित असलेल्या निरागस चिमुकल्यांना आपली शाळा मुक्त झाल्याचा आनंद दाटून आला. मुख्याध्यापक पी.एन.गाढे यांनी गावकर्‍यांचे आभार मानले.