शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

डोणगावातील भाजी बाजाराला आग, पावणे दोन लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:31 IST

ही आग २१ मार्च रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास लागली होती. यावेळी गस्तीवर असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल मंगेश खडसे व ...

ही आग २१ मार्च रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास लागली होती. यावेळी गस्तीवर असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल मंगेश खडसे व चालक वाघ यांना भाजी बाजारातून धूर येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तिकडे मोर्चा वळविला असता, चार भाजीपाला विक्रेत्यांच्या दुकानाला आग लागल्याचे समोर आले. त्यामुळे त्वरित त्यांनी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी रोठड यांना माहिती दिली. सोबतच अग्निशमन दलाशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ न शकल्याने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ही आग विझविण्यात आली. मात्र, तोवर भाजीपाला विक्रेत्यांचे १ लाख ७५ हजार रुपयांचे नुकसान झालेले होते.

या आगीत भाजीपाला विक्रेते पवन अरुण काळे कुसूम उत्तम जयवाळ, गोपाल माधव परमाळे भगवान आश्रूजी काळे यांच्या दुकानातील बटाटे, कांदा, लसूण, अडत काटा, प्लेट काटा, कॅरेट, खुर्च्या व इतर साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर तलाठी पल्लवी गुंठेवार, कोतवाल संतोष मानवतकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत पंचनामा केला. त्यात पवन काळे यांचे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले. कुसूम जयवाळ यांचे १९ हजार, गोपाळ परमाळे यांचे ४५ हजार आणि भगवान काळे यांचे ४१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, ही आग अज्ञात व्यक्तीने लावली असण्याची शक्यता भाजीपाला विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.

‘त्या’ आगीचा तपास कधी

गेल्या काही दिवसांपूर्वी डोणगाव येथील एका प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीची दुचाकीही अज्ञात व्यक्तीने जाळली होती. त्याचा अद्याप तपास लागलेला नसतानाच, आता चार भाजीपाला विक्रेत्यांच्या दुकानाला ही आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे येथे जाणीवपूर्वक कोणी अज्ञात व्यक्ती तर आग लावत नाही ना, असा संशय स्थानिक व्यक्त करीत आहेत. ग्रामपंचायतीने लावलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याची रेकॉर्डिंग तपासल्यास या प्रकरणाचा छडा लागण्यास मदत होऊ शकते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.