शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

अखेर स्टेट बँक प्रशासन नमले!

By admin | Updated: October 24, 2016 02:41 IST

स्वाभिमानीच्या आंदोलनाला यश; शेतक-यांच्या खात्यात जमा होणार रक्कम.

चिखली, दि. २३-तालुक्यातील धोत्रा नाईक येथील स्टेट बँकेचा ग्राहक सेवा केंद्र चालक पसार झाल्याने बँकेत अडकलेली रक्कम परत मिळण्यासाठी वारंवार बँक अधिकार्‍याकडे चकरा मारून विनवणी करूनही बँक टाळाटाळ करीत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत उंद्री येथील स्टेट बँकेच्या शाखेत सलग दोन दिवस मुक्काम ठोकण्यासह जिल्हाभरात ठिकठिकाणी केलेल्या आंदोलनामुळे अखेर स्टेट बँक प्रशासन नमले असून २४ ऑक्टोबर रोजी या ग्राहक सेवा केंद्रात अडकलेल्या ८३ शेतकर्‍यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे आश्‍वासन दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश आले आहे.धोत्रा नाईक येथील स्टेट बँक ग्राहक सेवा केंद्राचा प्रतिनिधी पांडरंग रमेश बिडवे याने पसिरातील ग्राहक व शेतकर्‍यांना चुना लावून फरार झाला आहे. त्यामुळे शेतकरी मोठय़ा प्रमाणात आर्थिक अडचणीत सापडले होते. या ग्राहक सेवा केंद्रात अडकलेल्या सर्वसामान्य शेतकरी व ग्राहकांच्या ठेवी तातडीने परत करण्यात याव्यात या मागणीसाठी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना. रविकांत तुपकर यांनी जिल्हा मुख्यालयी ठिय्या आंदोलन केल्यानंतर बँकेने शेतकर्‍यांची रक्कम परत करण्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र नंतर या आश्‍वासनाला बगल दिल्या जात असल्याने स्वाभिमानीचे राणा चंदन, विनायक सरनाईक, भारत वाघमारे, नितीन राजपूत, राम अंभोरे, सचिन पडघान, नितीन लोखंडे, अनिल चव्हाण, विलास तायडे, शरद राऊत, ज्ञानेश्‍वर मापारी यांच्यासह शेतकर्‍यांनी २0 व २१ ऑक्टोबर रोजी उंद्री येथील स्टेट बँकेच्या शाखेतच मुक्काम ठोकला होता. दरम्यान, स्वाभिमानीच्या पदाधिकार्‍या दुसर्‍या दिवशी जिल्हय़ात ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन छेडले होते तर ना. तुपकर यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, २१ ऑक्टोबरच्या मध्यरात्री बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी स्वाभिमानीच्या या आंदोलनापुढे नमते घेत केंद्र चालक बिडवे फरार असल्याने सर्वांंंची रक्कम तातडीने देणे शक्य नसल्याने २१ खातेदारांना शंभर टक्के तर उर्वरित ६२ खातेदारांना २५ टक्के रक्कम अदा करण्याचे मान्य करून शनिवार व रविवारी सुटी असल्याने सोमवारी २४ ऑक्टोबर रोजी २१ खातेदारांच्या खात्यात ४ लाख १६ हजार ९५0 तर उर्वरित ६२ खातेदारांच्या खात्यात २५ टक्याप्रमाणे ५ लाख १४ हजार ३५0 असे एकूण ९ लाख ३१ हजार ३00 रुपये जमा करण्याचे तसेच ६२ खातेदारांच्या उर्वरित सर्व रकमेची चौकशी करून आठ दिवसांत जमा करणार असल्याचे ग्वाही दिल्याने स्वाभिमानीच्या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर हक्काचे पैसे मिळत नसल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना स्वाभिमानीच्या या आंदोलनाने मोठा दिलासा मिळाला आहे.