शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

अखेर स्टेट बँक प्रशासन नमले!

By admin | Updated: October 24, 2016 02:41 IST

स्वाभिमानीच्या आंदोलनाला यश; शेतक-यांच्या खात्यात जमा होणार रक्कम.

चिखली, दि. २३-तालुक्यातील धोत्रा नाईक येथील स्टेट बँकेचा ग्राहक सेवा केंद्र चालक पसार झाल्याने बँकेत अडकलेली रक्कम परत मिळण्यासाठी वारंवार बँक अधिकार्‍याकडे चकरा मारून विनवणी करूनही बँक टाळाटाळ करीत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत उंद्री येथील स्टेट बँकेच्या शाखेत सलग दोन दिवस मुक्काम ठोकण्यासह जिल्हाभरात ठिकठिकाणी केलेल्या आंदोलनामुळे अखेर स्टेट बँक प्रशासन नमले असून २४ ऑक्टोबर रोजी या ग्राहक सेवा केंद्रात अडकलेल्या ८३ शेतकर्‍यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याचे आश्‍वासन दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला यश आले आहे.धोत्रा नाईक येथील स्टेट बँक ग्राहक सेवा केंद्राचा प्रतिनिधी पांडरंग रमेश बिडवे याने पसिरातील ग्राहक व शेतकर्‍यांना चुना लावून फरार झाला आहे. त्यामुळे शेतकरी मोठय़ा प्रमाणात आर्थिक अडचणीत सापडले होते. या ग्राहक सेवा केंद्रात अडकलेल्या सर्वसामान्य शेतकरी व ग्राहकांच्या ठेवी तातडीने परत करण्यात याव्यात या मागणीसाठी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना. रविकांत तुपकर यांनी जिल्हा मुख्यालयी ठिय्या आंदोलन केल्यानंतर बँकेने शेतकर्‍यांची रक्कम परत करण्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र नंतर या आश्‍वासनाला बगल दिल्या जात असल्याने स्वाभिमानीचे राणा चंदन, विनायक सरनाईक, भारत वाघमारे, नितीन राजपूत, राम अंभोरे, सचिन पडघान, नितीन लोखंडे, अनिल चव्हाण, विलास तायडे, शरद राऊत, ज्ञानेश्‍वर मापारी यांच्यासह शेतकर्‍यांनी २0 व २१ ऑक्टोबर रोजी उंद्री येथील स्टेट बँकेच्या शाखेतच मुक्काम ठोकला होता. दरम्यान, स्वाभिमानीच्या पदाधिकार्‍या दुसर्‍या दिवशी जिल्हय़ात ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन छेडले होते तर ना. तुपकर यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, २१ ऑक्टोबरच्या मध्यरात्री बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी स्वाभिमानीच्या या आंदोलनापुढे नमते घेत केंद्र चालक बिडवे फरार असल्याने सर्वांंंची रक्कम तातडीने देणे शक्य नसल्याने २१ खातेदारांना शंभर टक्के तर उर्वरित ६२ खातेदारांना २५ टक्के रक्कम अदा करण्याचे मान्य करून शनिवार व रविवारी सुटी असल्याने सोमवारी २४ ऑक्टोबर रोजी २१ खातेदारांच्या खात्यात ४ लाख १६ हजार ९५0 तर उर्वरित ६२ खातेदारांच्या खात्यात २५ टक्याप्रमाणे ५ लाख १४ हजार ३५0 असे एकूण ९ लाख ३१ हजार ३00 रुपये जमा करण्याचे तसेच ६२ खातेदारांच्या उर्वरित सर्व रकमेची चौकशी करून आठ दिवसांत जमा करणार असल्याचे ग्वाही दिल्याने स्वाभिमानीच्या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर हक्काचे पैसे मिळत नसल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना स्वाभिमानीच्या या आंदोलनाने मोठा दिलासा मिळाला आहे.