शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

अखेर मेहकर बायपासवरुन धावली वाहने

By admin | Updated: May 28, 2014 00:37 IST

कित्येक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर २७ मे रोजी बायपासवरुन वाहनी धावली; मेहकरवासियांनी घेतला सुटकेचा निश्‍वास.

मेहकर : शहरातील रस्त्यांवर तासन -तास खोळंबलेल्या रहदारीला मार्गदेण्यासाठी गत तीन वर्षापुर्वी बायपासचे काम सुरू करण्यात आले होते. ते काम पूर्ण होऊन शिवसेनेने घेतलेल्या पुढाकाराने मंगळवारला नागरिकांच्या सेवेत एका छोटीखानी कार्यक्रमाने बायपास सुरु करण्यात आला. कित्येक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर २७ मे रोजी या बायपासवरुन अखेर वाहनी धावली. त्यामुळे शहरवासियांनी शहरातील वाहतुकीपासून सुटकेचा निश्‍वास घेतला. औरंगाबाद नागपूर जाणारे सर्व वाहने शहरातुनच जात असल्याने वाहतूकीचा प्रश्न गंभीर रुप धारण करत होते. शहरातुन जाणार्‍या अवजड वाहणासाठी पर्यायी रस्त्याची व्यवस्था म्हणुन शासनाच्यावतीने बायपासचे काम के.टी. कंस्ट्रक्शन इंदोर यांच्याकडे २0११ मध्ये सोपविण्यात आले होते. शासन करारानुसार के.टी.कंस्ट्रक्शनने वेळेच्या आत म्हणजे १७ जानेवारी २0१३ मध्येच बायपासचे काम पुर्ण केले. बायपासवरील रस्त्याचे काम पुर्ण झाल्यानंतर पुलाच्या कामाला सुरूवात करण्यात आली. मात्र, काही तांत्रीक अडचणींमुळे तब्बल आठ महिने पुलाचे काम बंद राहिले. शिवसेनेच्यावतीने अनेक वेळ रास्तारोकोसह विविध आंदोलनेही करण्यात आले होते. आज सकाळी नागरिकांच्या सेवेत बायपास खुला झाला.