शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

आर्थिक विवंचनेत शेतक-यांची भाऊबीज!

By admin | Updated: October 25, 2014 23:50 IST

सोयाबीन, उडीद, मूग व इतर पिके बुडालीत, कापूस अद्याप न आल्याने शेतक-यांची दिवाळी अंधारातच.

बुलडाणा : दिवसेंदिवस वाढती महागाई पाहता सणाला विशेष महत्त्व राहिले नाही. रोजचीच दिवाळी आणि दसरा असे मोठे मन करून सर्वसामान्य माणूस सणासुदीला सामोरे जात आहे. सोयाबीनचा दाणा घरी नाही, कापसाचे आगमन झाले नाही, अशातच आलेल्या सणाला शेतकरी सामोरे गेले. या दिवाळीत शेतकर्‍यांना आनंद साजरा करता आला नाही. भाऊबीजेला घरी आलेल्या बहिणीची सरबराई करण्याचीही ऐपत शेतकरी भावाजवळ राहिली नाही. उशिरा आलेल्या पावसाने पेरण्या उशिरा झाल्या. त्यातच शेतकर्‍यांना नगदीचे उत्पन्न देणारे सोयाबीन, उडीद, मूग व इतर पिके ऐन भरात असताना पावसाने उघाड दिल्याने कोमेजून उत् पन्नात प्रचंड घट झाली. परिणामी दिवाळी सणाला शेतकर्‍यांच्या हातात पैसा नसल्यामुळे यावर्षीची दिवाळी आर्थिक विवंचनेतच गेली. ग्रामीण भागात बहुतेक व्यवहार उधारीवर केले जातात. यामध्ये किराणा मालापासून तर कापड दुकानदाराचा समावेश असतो. खरिपातील पिकांची काढणी झाल्यानंतर त्यातून मिळणार्‍या उत्पन्नापासून दिवाळीपूर्वी जुनी उधारी चुकती करून नवीन व्यवहाराला सुरुवात केली जाते; मात्र गेल्या काही वर्षांपासून शेतकर्‍यावर सातत्याने अस्मानी व सुलतानी संकट ओढवल्या जात आहे. कधी नापिकी, तर कधी अतवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडी आलेला घास हिसकावल्या जात आहे. त्यामुळे दुकानदार व सावकाराची उधारी शेतकरी चुकता करू शकले नाही. यावर्षी बर्‍यापैकी सोयाबीनने साथ दिली होती; मात्र ऐन शेंगा भरण्याच्यावेळी पावसाने दडी मारल्याने सोयाबीनचे दाणे भरले नाही व झडती कमी झाली. त्यामुळे एकरी उत्पन्नात मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे.