शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सर्वसामान्यांच्या नशिबी 'कॅल्शियम कार्बाइड'ने पिकविलेल्या आंब्यांचा गोडवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:36 IST

सद्यस्थितीत बाजारात मोठ्या प्रमाणावर आंबे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये दशहरी, लालपरी, तोतापुरी, पायरी, लंगडा, हापूस, केशर, बादाम आदी विविध ...

सद्यस्थितीत बाजारात मोठ्या प्रमाणावर आंबे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये दशहरी, लालपरी, तोतापुरी, पायरी, लंगडा, हापूस, केशर, बादाम आदी विविध जातीच्या आंब्यांचा यामध्ये समावेश आहे. शहरातील मुख्य बाजार गल्लीसह सर्व प्रमुख रस्ते व चौका-चौकात आणि हातगाडीवर विक्री सुरू असलेले हे आंबे बहुतांशी कृत्रिमरीत्या पिकविलेली आहेत. त्यातच सध्या लॉकडाऊनमुळे मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने नफा मिळविण्यासाठी झटपट आंबे पिकवून ती बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यावर प्रत्येक व्यापाऱ्याचा भर असून, यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा सर्रास वापर केला जात आहे. अन्न सुरक्षा कायद्यान्वये फळे पिकविण्यासाठी 'कॅल्शिअम कार्बाइड'चा वापर करण्यास मनाई आहे; मात्र नैसर्गिक पद्धतीने फळे पिकविण्यासाठी लागणारा कालावधी व त्या तुलनेत ग्राहकांकडून मिळणारा भाव पाहता तो व्यापाऱ्यांनादेखील परवडणारा नसल्याने अनेक व्यापारी छुप्या पद्धतीने कार्बाइडचा वापर करूनच आंबे पिकवित आहेत.

नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या आंब्यांना अधिक भाव!

शहरात अनेकांकडून सध्या नैसर्गिक पद्धतीने पिकविलेले आंबे घरपोच देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. २५० ते ६०० प्रति किलो रुपयांप्रमाणे हे आंबे विक्री होत आहेत. दुसरीकडे कृत्रिमरीत्या पिकविलेले आंबे १०० ते १२० रुपये प्रति किलो प्रमाणे मिळत आहेत.

खरेदीपूर्वी जागरूकता महत्त्वाची

कॅल्शियम कार्बाइडने पिकविलेल्या आंब्यांमुळे घसा खवखवणे, जीभ व तोंड येणे, कॅन्सर, किडनीचे विकार, अल्सर, डायरिया, जळजळ आदी आजार होण्याची शक्यता असल्याने अन्न सुरक्षा कायदा २००६ नुसार यावर बंदी घातलेली आहे. दरम्यान, सध्याच्या काळात आरोग्यविषयक जागरूक असणे गरजेचे असल्याने नागरिकांनी आंबे खरेदी करताना आपण आजाराला निमंत्रण तर देत नाही ना! याची काळजी घेणे गरजेचे आहे.

असा ओळखा फरक !

नैसर्गिक पद्धतीने आंबे पिकवण्यासाठी किमान आठ दिवस लागतात. ती दिसायला आकर्षक नसली तरी मनमोहक वास व चव चांगली असते. तर कार्बाइडने केवळ १५ तासात आंबे पिकतात, ती दिसायला पिवळे व आकर्षक असतात; मात्र त्यातून लसणासारखा वास येतो व गरम वाफ निघते.