शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

फळबागेत आंतर पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:42 IST

परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीवर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे आपल्या भागामध्ये कमी कालावधीत होणारे पिकाचे वाण घेवडा, वाल, उडीद, ...

परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीवर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे आपल्या भागामध्ये कमी कालावधीत होणारे पिकाचे वाण घेवडा, वाल, उडीद, मूग, भुईमूग, सोयाबीन यांचे फळबागेत आंतरपीक म्हणून घेतल्यास जमिनीची धूप कमी होते. आंतर पिकाच्या वाढणाऱ्या मुळांमुळे पाण्याचा निचरादेखील चांगल्या पद्धतीने होऊन जमीन लवकर वापशावर येते. हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये नत्र स्थिरीकरण करणारी पिके भुईमूग, उडीद, मूग, सोयाबीन, वाल याचा समावेश शेतकरी करीत आहेत. यामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि याचा अनुकूल परिणाम होतो. या उद्देशाने परिसरातील एका शेतकऱ्याने शेतातील फळबागेत वाल हे आंतर पीक म्हणून लागवड केली आहे. यासाठी अगोदर फळबागेत झाडांच्या बाजूने चहूबाजूने दीड फूट जागा सुटेल अशा पद्धतीने रोटाव्हेटरने जमीन भुसभुशीत करून घेतली आणि त्यामध्ये लाईन पद्धतीचा अवलंब करून ठिबक आच्छादन करून घेतले. ठिबकद्वारे पाणी सोडून जमीन ओली करून घेतली व आंतर पीक म्हणून वाल लागवड केली.

यामुळे शेतकऱ्याला आंतर पीक फायदेशीर ठरेल.

आंतर पिकाने जमिनीची धूप कमी होते.

सरासरीपेक्षा पाऊसमान कमी झाल्यास कमी कालावधीत येणारी आंतर पिके निश्चित फायदा देतात. सरासरीपेक्षा पाऊस जास्त झाल्यास किंवा अतिवृष्टी झाल्यास धूपरोधक आंतर पिके जमिनीची धूप कमी करतात. यामुळे पाण्याचा निचरा लवकर होतो. सरासरीपेक्षा कमी किंवा जास्त कोणत्याही प्रकारचा पाऊस असला तरी आंतर पीक पद्धतीमुळे शेतकऱ्यास हमखास उत्पादन येण्यास हमी असते. जमिनीचे क्षेत्रफळ कमी असणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात असे अंतर्गत पीक घेत आहेत.