शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
6
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
7
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
8
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
9
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
10
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
11
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
12
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
13
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
14
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
15
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
16
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
17
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

संपूर्ण कर्ज मुक्तीसाठी शेतकरी संघटनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 20:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतकºयांची संपूर्ण कर्जमुक्तीच्या व विजबिलमुक्तीच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने १ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चा गांधीभवन येथून निघून शहराच्या प्रमुख रस्त्यावरुन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.मोर्चामध्ये जिल्हाभरातून बहुसंख्य शेतकरी सामील झाले होते. तर महिलांचा लक्षणीय सहभाग होता. मोर्चा दरम्यान ...

ठळक मुद्दे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा मोर्चात जिल्ह्यातील शेतक-यांसह महिलांचा लक्षणीय सहभागसंपूर्ण कर्जमुक्तीसह विजबिल माफ करण्याची प्रमुख मागणीजिल्हाधिका-यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतकºयांची संपूर्ण कर्जमुक्तीच्या व विजबिलमुक्तीच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने १ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चा गांधीभवन येथून निघून शहराच्या प्रमुख रस्त्यावरुन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.मोर्चामध्ये जिल्हाभरातून बहुसंख्य शेतकरी सामील झाले होते. तर महिलांचा लक्षणीय सहभाग होता. मोर्चा दरम्यान संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे, विजबिल मुक्ती झालीच पाहिजे, स्वामिनाथन आयोग नको, शरद जोशी यांच्या कृषी कृती दलाचा अहवालाची अंमलबजावणी करा, शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, शेतमालाची आयात निर्यात धोरणात बदल करा, शेतातील सरकारी हस्तक्षेप बंद करा, अशा घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला. त्यानंतर शेतकºयांच्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. निवेदनामध्ये विशेषता शेतकरी कायम स्वरुपी कसा कर्जमुक्त होईल, याचा मसुदा मुख्यमंत्री व पंतप्रधानांना देण्यात आला. मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाल्यावर शेतकरी संघटनेचे डॉ.हासनराव देशमुख, नामदेवराव जाधव, सुरेश सोनुने, दामोधर शर्मा, कैलास गाढवे, समाधान कणखर यांनी मार्गदर्शन केले. तसेच दासा पाटील यांनी शेतकरी आंदोलनावर कविता सादर केली. यावेळी बोलताना नामदेवराव जाधव म्हणाले की, शासनाची कर्जमुक्ती फसवी असून शेतकºयांना संपूर्ण सरसगट कर्जमुक्ती हवी आहे. स्वामिनाथन आयोगापेक्षा शरद जोशीनी सादर केलेला कृषी दलाचा अहवाल लागू करण्यात यावा, जर सरकारने या मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन तिव्र करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. या मोर्चात एकनाथ पाटील थुट्टे, सुरेशदादा सोनुने, सुभाष गिरी, ज्ञानेश्वर जाधव, कौतीक जामदार, तेजराव मुंदे, तेजराव मुंढे, मधुकर देठे, बद्रीनाथ बुधवत, गजानन जाधव, संतोष राजपूत, शिवप्रसाद सारडा, शरद सावजी, रमेशसिंग चव्हाण, कमळाजी पाटील, सुगदेवराव नरोटे, विजयकुमार डागा, नाजीम बेग, दिनककराव टेकाळे, श्रीराम पाटील, हरिदास खांडेभराड, प्रकाश अंभोरे, मुरली महाराज येवले, तनवीर देशमुख, शिवाजी सवडे, राजु भगत, शिवाजी उबरहंडे, डॉ.बाबुराव पाटील, विजय जाधव, सुखदेवराव नरोटे, नामदेवराव म्हळसने, रमेश पागोरे, काशीनाथ मेहेत्रे, सादीक देशमुख, राजु शेटे, नरहरी थुट्टे आदी जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.