शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

संपूर्ण कर्ज मुक्तीसाठी शेतकरी संघटनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 20:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतकºयांची संपूर्ण कर्जमुक्तीच्या व विजबिलमुक्तीच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने १ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चा गांधीभवन येथून निघून शहराच्या प्रमुख रस्त्यावरुन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.मोर्चामध्ये जिल्हाभरातून बहुसंख्य शेतकरी सामील झाले होते. तर महिलांचा लक्षणीय सहभाग होता. मोर्चा दरम्यान ...

ठळक मुद्दे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा मोर्चात जिल्ह्यातील शेतक-यांसह महिलांचा लक्षणीय सहभागसंपूर्ण कर्जमुक्तीसह विजबिल माफ करण्याची प्रमुख मागणीजिल्हाधिका-यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतकºयांची संपूर्ण कर्जमुक्तीच्या व विजबिलमुक्तीच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने १ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सदर मोर्चा गांधीभवन येथून निघून शहराच्या प्रमुख रस्त्यावरुन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.मोर्चामध्ये जिल्हाभरातून बहुसंख्य शेतकरी सामील झाले होते. तर महिलांचा लक्षणीय सहभाग होता. मोर्चा दरम्यान संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे, विजबिल मुक्ती झालीच पाहिजे, स्वामिनाथन आयोग नको, शरद जोशी यांच्या कृषी कृती दलाचा अहवालाची अंमलबजावणी करा, शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, शेतमालाची आयात निर्यात धोरणात बदल करा, शेतातील सरकारी हस्तक्षेप बंद करा, अशा घोषणा देत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला. त्यानंतर शेतकºयांच्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. निवेदनामध्ये विशेषता शेतकरी कायम स्वरुपी कसा कर्जमुक्त होईल, याचा मसुदा मुख्यमंत्री व पंतप्रधानांना देण्यात आला. मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाल्यावर शेतकरी संघटनेचे डॉ.हासनराव देशमुख, नामदेवराव जाधव, सुरेश सोनुने, दामोधर शर्मा, कैलास गाढवे, समाधान कणखर यांनी मार्गदर्शन केले. तसेच दासा पाटील यांनी शेतकरी आंदोलनावर कविता सादर केली. यावेळी बोलताना नामदेवराव जाधव म्हणाले की, शासनाची कर्जमुक्ती फसवी असून शेतकºयांना संपूर्ण सरसगट कर्जमुक्ती हवी आहे. स्वामिनाथन आयोगापेक्षा शरद जोशीनी सादर केलेला कृषी दलाचा अहवाल लागू करण्यात यावा, जर सरकारने या मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन तिव्र करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. या मोर्चात एकनाथ पाटील थुट्टे, सुरेशदादा सोनुने, सुभाष गिरी, ज्ञानेश्वर जाधव, कौतीक जामदार, तेजराव मुंदे, तेजराव मुंढे, मधुकर देठे, बद्रीनाथ बुधवत, गजानन जाधव, संतोष राजपूत, शिवप्रसाद सारडा, शरद सावजी, रमेशसिंग चव्हाण, कमळाजी पाटील, सुगदेवराव नरोटे, विजयकुमार डागा, नाजीम बेग, दिनककराव टेकाळे, श्रीराम पाटील, हरिदास खांडेभराड, प्रकाश अंभोरे, मुरली महाराज येवले, तनवीर देशमुख, शिवाजी सवडे, राजु भगत, शिवाजी उबरहंडे, डॉ.बाबुराव पाटील, विजय जाधव, सुखदेवराव नरोटे, नामदेवराव म्हळसने, रमेश पागोरे, काशीनाथ मेहेत्रे, सादीक देशमुख, राजु शेटे, नरहरी थुट्टे आदी जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.