शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

विमा कंपनीकडे तक्रार करण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:39 IST

राहेरी बु : परिसरात गत काही दिवसांपासून झालेल्या जाेरदार पावसामुळे खरिपाच्या पिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ पिकाचे नुकसान ...

राहेरी बु : परिसरात गत काही दिवसांपासून झालेल्या जाेरदार पावसामुळे खरिपाच्या पिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ पिकाचे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत पीक विमा कंपनीकडे तक्रार करावी लागते; मात्र राहेरी परिसरातील अनेक शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे़ कंपनीने दिलेले ॲप चालत नाही तर हेल्पलाईनसाठी दिलेला फाेन लागत नाही़ त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे़

राहेरी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा याेजनेत सहभाग घेतला आहे़ गत काही दिवसांपासून राहेरी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन, कपाशी, मिरची, तूर आणि उडीद पिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ सततच्या पावसामुळे साेयाबीनच्या शेंगा भरण्यापूर्वीच पिवळी पडत आहेत़ काही शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे़ पीक विमा काढला असूनही तक्रार करता येत नसल्याने अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे़

हेल्पलाईन क्रमांक बंद

पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन क्रमांक दिला आहे; मात्र हा क्रमांक बंद असल्याने शेतकऱ्यांना संवाद साधता येत नाही़ तसेच क्रॉप इन्शुरन्स ॲप्ससुद्धा बरोबर चालत नाही.अशा वेळेस नुकसान झालेल्यांनी कुठे तक्रार करायची असा प्रश्न सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकऱ्यांना पडला आहे़

यावर्षी मुसळधार पावसामुळे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांनी कंपनीला माहिती देण्याचा प्रयत्न केला असता हेल्पलाईन क्रमांक बंद आहे़ तसेच ॲपही व्यवस्थित चालत नाही़ त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे़

सुभाषराव देशमुख राहेरी बु., उपसरपंच

माझ्याकडे अनेक शेतकऱ्यांनी साेयाबीन, कपाशी व इतर पिकाचा विमा काढलेला आहे़ सध्या पिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे़ याविषयी हेल्पलाईन क्रमांकावर माहिती देण्याचा प्रयत्न केला असता ताे क्रमांकच बंद आहे़ ॲपही व्यवस्थित नसल्याने नुकसानीची माहिती कशी द्यावी,असा प्रश्न पडला आहे़

मधुकर मगर, सीएसी केंद्र संचालक

ज्या शेतकऱ्याचे पुराच्या पाण्यामुळे किंवा शेतात पाणी थांबल्यामुळे पीक नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांनी हेल्पलाइन नंबर लागत नसेल तर किंवा ॲप्स बरोबर चालत नसेल तर तालुकास्तरावर कार्यालय सुरू झालेले आहे़ तिथे शेतकऱ्यांनी लेखी अर्ज द्यावेत़

वसंतराव राठोड, कृषी अधिकारी सिंदखेडराजा