शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

विमा कंपनीकडे तक्रार करण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:39 IST

राहेरी बु : परिसरात गत काही दिवसांपासून झालेल्या जाेरदार पावसामुळे खरिपाच्या पिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ पिकाचे नुकसान ...

राहेरी बु : परिसरात गत काही दिवसांपासून झालेल्या जाेरदार पावसामुळे खरिपाच्या पिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ पिकाचे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत पीक विमा कंपनीकडे तक्रार करावी लागते; मात्र राहेरी परिसरातील अनेक शेतकऱ्यांना तक्रार करण्यासाठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे़ कंपनीने दिलेले ॲप चालत नाही तर हेल्पलाईनसाठी दिलेला फाेन लागत नाही़ त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे़

राहेरी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा याेजनेत सहभाग घेतला आहे़ गत काही दिवसांपासून राहेरी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन, कपाशी, मिरची, तूर आणि उडीद पिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ सततच्या पावसामुळे साेयाबीनच्या शेंगा भरण्यापूर्वीच पिवळी पडत आहेत़ काही शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे़ पीक विमा काढला असूनही तक्रार करता येत नसल्याने अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे़

हेल्पलाईन क्रमांक बंद

पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन क्रमांक दिला आहे; मात्र हा क्रमांक बंद असल्याने शेतकऱ्यांना संवाद साधता येत नाही़ तसेच क्रॉप इन्शुरन्स ॲप्ससुद्धा बरोबर चालत नाही.अशा वेळेस नुकसान झालेल्यांनी कुठे तक्रार करायची असा प्रश्न सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकऱ्यांना पडला आहे़

यावर्षी मुसळधार पावसामुळे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांनी कंपनीला माहिती देण्याचा प्रयत्न केला असता हेल्पलाईन क्रमांक बंद आहे़ तसेच ॲपही व्यवस्थित चालत नाही़ त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे़

सुभाषराव देशमुख राहेरी बु., उपसरपंच

माझ्याकडे अनेक शेतकऱ्यांनी साेयाबीन, कपाशी व इतर पिकाचा विमा काढलेला आहे़ सध्या पिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे़ याविषयी हेल्पलाईन क्रमांकावर माहिती देण्याचा प्रयत्न केला असता ताे क्रमांकच बंद आहे़ ॲपही व्यवस्थित नसल्याने नुकसानीची माहिती कशी द्यावी,असा प्रश्न पडला आहे़

मधुकर मगर, सीएसी केंद्र संचालक

ज्या शेतकऱ्याचे पुराच्या पाण्यामुळे किंवा शेतात पाणी थांबल्यामुळे पीक नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांनी हेल्पलाइन नंबर लागत नसेल तर किंवा ॲप्स बरोबर चालत नसेल तर तालुकास्तरावर कार्यालय सुरू झालेले आहे़ तिथे शेतकऱ्यांनी लेखी अर्ज द्यावेत़

वसंतराव राठोड, कृषी अधिकारी सिंदखेडराजा