शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
2
पाकिस्तानची वाटचाल लष्करी राजवटीच्या दिशेने...; असीम मुनीर बनले दुसरे फिल्ड मार्शल
3
पत्नी व्यभिचारी असल्यास तिला पोटगी मागण्याचा हक्क उरत नाही : उच्च न्यायालय
4
कलरफुल देश म्हणत ज्योती मल्होत्राचं पाकिस्तान प्रेम उफाळून आलं; डायरीत तिनं आणखी काय काय लिहिलं?
5
'या' शाही हॉटेल्सचा येतोय IPO, ग्रे मार्केटमध्येही घालतोय धुमाकूळ; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी!
6
सिंधू नदीच्या पाण्यावरुन पाकिस्तानमध्ये गोंधळ; लोकांनी मंत्र्यांचं घरच जाळलं
7
पाकिस्तानमध्ये धक्कादायक प्रकार! शाळेच्या बसवर दहशतवादी हल्ला, ४ लहान मुलांचा मृत्यू, ३८ जखमी
8
नागपूरची मराठमोळी लेक थेट कान्स फेस्टिव्हलमध्ये झळकली, ग्लॅमरस लूक करुन लुटली लाइमलाइट
9
'हेरा फेरी ३'च्या आधीही बाबूरावने अक्षय कुमारला दिलेला गुलीगत धोका; या सिनेमाला दिलेला नकार
10
“PM मोदी धाडसी नेतृत्व, पाकिस्तानाने भारतात समस्या निर्माण केली”; आफ्रिकेतील देशाचा पाठिंबा
11
१४,००० मुले उपाशी; २२ देशांचा इस्रायलवर दबाव, इस्रायलवर निर्बंध लागू करण्याचा दिला इशारा
12
Operation Sindoor : 'आधी जीव वाचवा, चौक्या नंतर बांधू'; भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानी कमांडर मशिदीत लपला होता
13
“PM मोदींची प्रशंसा, शरद पवार आता भाजपामय होताना दिसत आहेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्योतीने पाकिस्तानला पुरवली 'ही' माहिती; दानिशसोबत होती संपर्कात!
15
पाकचे गिरे तो भी टांग उपर; लष्करप्रमुख मुनीरचे प्रमोशन, फिल्ड मार्शल पदावर बढती; 
16
तरुणांना नोकरीची मोठी संधी! सुझुकी 'या' राज्यात उभारणार १२०० कोटी रुपयांचा प्लांट
17
Astrology: राहू केतूचे संक्रमण होणार, कोरोना परत थैमान घालणार? काय सांगते ग्रहस्थिती?
18
हृदयद्रावक! लग्नात आक्रित घडलं, खेळताना कारमध्ये लॉक झाली ४ मुलं; झाला मृत्यू, ६ तासांनंतर....
19
लग्न नको म्हणून तमन्नाशी केलं ब्रेकअप, आता अभिनेत्याने मुंबईत घेतला सी फेसिंग फ्लॅट
20
ओलाच्या रोडस्टर मोटरसायकलची डिलिव्हरी केव्हापासून? मालकाने जाहीर केली तारीख...

शेतकऱ्यांनी नाकारले विहीर अनुदान!

By admin | Updated: April 13, 2017 01:10 IST

शेतकरी आर्थिक संकटात : गरज असतानाही विहीर खोदण्यात अडचणी

संदीप गावंडे ल्ल नांदुराराज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्याकरिता शेतीला सिंचन सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. याकरीता शासन विविध योजनांच्या माध्यमातून सिंचनात वाढ होण्यासाठी विहिरी, शेततळे इ.करीता अनुदानाच्या योजना राबविते. परंतु अनुदान देत असताना शेतकऱ्यांच्या अडचणी शासन जाणून घेत नसल्याने गरज असतानाही शेतकऱ्यांनी अनुदानातून विहिरी खोदणे टाळले आहे. केवळ नांदुरा तालुक्यातील लाभ मंजूर झालेल्या तब्बल १२५ शेतकऱ्यांनी विहीर खोदण्यास अनास्था दर्शविली आहे. तर यापैकी ४८ शेतकऱ्यांनी तसे लेखी सुध्दा दिले आहे. यामुळे सुमारे ३ कोटीचे अनुदान पडून आहे. तेव्हा शासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याची आवश्यकता खऱ्या अर्थाने दिसून येत आहे. शेतकरी आत्महत्यांमुळे चर्चेत असणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली असून कुटुंबांचे पालन पोषण व इतर खर्चामुळे शेतकरी वर्गात कमालीची चिंता वाढत आहे. शेती उत्पन्न वाढल्याशिवाय शेतकऱ्यांची स्थिती सुधारणार नाही. शेती उत्पादन व उत्पन्न वाढीसाठी शेतीच्या सिंचनाची सोय आवश्यक आहे. कोरडवाहू शेतीत फक्त खर्च निघत असल्याने व दर दोन-तीन वर्षातून दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.सिंचनाचे क्षेत्रात वाढ करून शेती उत्पन्न वाढवून शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येतात. अशाच अनुदानाच्या योजनांतर्गत धडक सिंचन विहिर योजनेतून नांदुरा तालुक्यात विहिरी मंजुर झाल्या आहेत. मात्र या योजने अंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सव्वाशे शेतकऱ्यांनी विविध कारणांमुळे विहिरी खोदण्यास संबंधित यंत्रणेकडे नकार दिला आहे. अडीच लाख रूपये प्रत्येकी सदर विहिरींकरीता अनुदान असून सव्वाशे पैकी अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांनी विहिर खोदण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तीसपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी शंभर फुटापर्यंत पाणी लागत नसल्याचे कारण पुढे करीत नकार दिला आहे तर जिगाव धरण क्षेत्रातील दादगाव, हिंगणा, इसापुर या गावातील शेतकऱ्यांचे क्षेत्र बुडीत क्षेत्रात येत आहे. मामुलवाडी, धाडी येथील शेतकऱ्यांनी खारपाणपट्टयाचे क्षेत्र असल्याचे कारण सांगितले आहे.शेतकरी आर्थिक तंगीत असूनही अडीच लाखाची अनुदानाची विहिर घेण्यास नकार देत आहे याचे कारण शासकीय दप्तरी काही जरी असले तरी आज विहिरींचे बिले निघेपर्यंतही खर्च लावायला शेतकऱ्यांजवळ पैसा नाही. काम झाल्यावर घरी पैशासाठी चकरा मारणारे कामगार व काम झाल्यावरही बिले काढण्यास शासकीय कार्यालयाकडून होत असलेला उशीर यामुळेही बरेच शेतकरी अनुदानीत विहिर घेण्यास धजावत नाहीत. अन्यथा कोरडवाहू क्षेत्र बागायत करण्यास कोण शेतकरी तयार होणार नाही. त्याचप्रमाणे योजनेसाठी अर्ज घेतांनाही योजना पुर्णपणे राबविण्याचे प्रतिज्ञापत्रही शेतकऱ्यांकडून घेणे जरुरी आहे. कारण बरेचजण अर्ज करायचा म्हणून करतात व नंतर योजना पूर्णत्वास नेत नाहीत. यामुळे ज्या शेतकऱ्यास खरी गरज आहे ते लाभापासून वंचीत राहतात. शिवाय शासनाचेही योजनेचे लक्षांक पूर्ण होत नाही. नांदुरा तालुक्यातील सदर सव्वाशे शेतकऱ्यांशी सर्व शासकीय कार्यालये प्रत्यक्ष संवाद साधत असून त्यांना विहिर खोदण्यासाठी प्रोत्साहीत करीत आहेत. यापैकी बरेच शेतकरी विहिर खोदण्यास तयार होत असून यानंतर ज्या शेतकऱ्यांनी विहिरी खोदण्यास नकार दिला त्यांच्या विहिरी कायमच्या रद्द होणार आहेत.धडक सिंचन विहिर योजनेतील विहिरींची कामे सुरू न केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यात येत असून त्यांना विहिर खोदण्यासाठी प्रोत्साहीत करीत आहोत. यामध्ये पंचायत समिती, कृषी विभाग, सिंचन विभाग, बांधकाम विभाग हे अधिकारी प्रत्यक्ष भेटी देत आहेत. यामुळे बरेच शेतकरी विहिरी खोदण्यास तयार होत आहेत.- वैशाली देवकर, तहसिलदार नांदुरा.