शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वांग्यांला भाव नसल्यामुळे शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:03 IST

मेहकर तालुक्यातील कोराडी व पेनटाकळी प्रकल्प यासह तालुक्यातील इतर छोटे-मोठे तलाव पाण्याने १०० टक्के भरले आहेत. यामुळे जमिनीतील पाण्याची ...

मेहकर तालुक्यातील कोराडी व पेनटाकळी प्रकल्प यासह तालुक्यातील इतर छोटे-मोठे तलाव पाण्याने १०० टक्के भरले आहेत. यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी ही संतुलित असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर हंगामी फळबागासह भाजीपाला पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. यामध्ये कोबी, वांगी, टमाटा, मेथी, पालक यांसारख्या विविध भाजीपाल्याची लागवड केली आहे. गत वर्षी मार्च महिन्यात जिल्ह्यात लाॅकडाऊन जाहीर करण्यात आल्याने शेतकऱ्यांचे भाजीपाला व फळपिके विकण्यासाठी तारांबळ उडाली होती. काही कालावधीनंतर लाॅकडाऊन शिथिल करण्यात आले. त्यावेळेस शेतकऱ्यांना भाजीपाला स्वतः विकण्यासाठी प्रशासनाने परवानगी दिली होती. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी समोर येऊन स्वतः फळपिके व भाजीपाला विक्री करून होणारे नुकसान काही प्रमाणात टाळले. मात्र आता परत कोरोनाविषाणू रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्यात काहीअंशी लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. याचा थेट फटका भाजीपाला व फळपिके उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. आंध्रुड परिसरातील पंढरी वामनराव देशमुख व गजानन हसनराव देशमुख यांनी वांगी या भाजीपाला पिकाची लागवड केली होती. उत्पादन चांगल्या प्रमाणात निघत होते. मात्र आठवडी बाजार बंद झाल्याने आणि भाजीपाला हराशी काही अंशी बंद करण्यात आल्याने वांग्यांना भाव मिळेनासा झाला आहे. त्यामुळे सध्या वांगी शेतातच पडून आहेत. यामुळे लागवडीचा खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे.

शेतमाल विक्रीस अडचणी

मागील वर्षी लाॅकडाऊन झाले होते. त्या मध्ये शेतकऱ्यांना भाजीपाला, फळपिके विकण्यासाठी प्रशासनाने परवानगी दिली होती. याकरिता कृषी विभागाने पुढाकार घेत शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विक्री करण्यासाठी सहकार्य केले होते. मात्र सद्य:परिस्थितीत कृषी विभागाने पुन्हा या शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचा शेतमाल विक्री करण्याकरिता साहाय्य करणे गरजेचे आहे.