शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

योजनेच्या लाभासाठी निराधारांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:52 IST

श्रावण बाळ, संजग गांधी व इंदिरा गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षाच्या शेवटी हयातीचा दाखला जमा करावा लागतो. त्यासाठी नोव्हेंबपर्यंत ...

श्रावण बाळ, संजग गांधी व इंदिरा गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षाच्या शेवटी हयातीचा दाखला जमा करावा लागतो. त्यासाठी नोव्हेंबपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यात आता मुदत वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यातील बँकांमध्ये तहसील कार्यालयांकडून येणाऱ्या यादीनुसार आलेल्या निधीनुसार श्रावण बाळ, संजग गांधी व इंदिरा गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांचा लाभ देण्यात येतो. परंतु वर्षाच्या शेवटी लागणारे हयातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी या लाभार्थ्यांना एकप्रकारची कसरत करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे ही प्रक्रिया लांबली आहे.

हयातीचा दाखला सादर करण्यास मुदतवाढ

बुलडाणा : निवृत्तिवेतन नियमित मिळण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबरमध्ये जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने संबंधित बँकेच्यामार्फत हयातीचा फॉर्म भरून घेतल्या जातो. मात्र यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याकारणाने हयातीचा दाखला सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता निवृत्तिवेतनधारक २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत संबंधित बँक शाखेत हयातीचा दाखल सादर करू शकतात. सर्व निवृत्तिवेतनधारकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

निराधारांना द्यावा लागणाऱ्या हयातीच्या दाखल्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. हयातीचा दाखला तलाठ्याकडे जमा करावा लागतो. निराधारांना मिळणारे त्यांच्या योजनेचे पैसे बँकेकडे जमा होताच, बँकेतून तातडीने लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जातात.

- नरेश हेडाऊ, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक, बुलडाणा.

प्रशासनाकडून हयातीच्या दाखल्यासाठी नवीन अर्ज दिलेला नाही. हयातीच्या दाखल्यांबाबत कुठलाही नवीन बदल झालेला नाही. लाभार्थ्यांना दिलेले जाणारे अनुदानही वेळेवर देण्यात येत आहे. बँकेनेही शासकीय योजनेचा येणारा लाभ तत्काळ द्यावा.

- अश्विनी जाधव, तहसीलदार, संजय गांधी निराधार योजना