शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

मुदतबाह्य खाद्य पदार्थांची विक्री!

By admin | Updated: April 28, 2017 00:47 IST

खामगाव : शहर व परिसरात मुदतबाह्य खाद्यपदार्थांची विक्री सर्रास सुरुअसून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत आहे. लोकमतने केलेल्या स्टींग आॅपरेशनमध्ये सदर प्रकार उघड झाला.

नागरिकांच्या आरोग्याशी सुरु आहे खेळखामगाव : शहर व परिसरात मुदतबाह्य खाद्यपदार्थांची विक्री सर्रास सुरुअसून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत आहे. लोकमतने गुरुवार २७ एप्रिल रोजी केलेल्या स्टींग आॅपरेशनमध्ये सदर प्रकार उघड झाला. सध्याच्या धावपळीच्या काळामध्ये खाण्यापिण्याचे विविध पदार्थ स्वत: च्या घरी तयार करुन घ्यायला बहुतांश नागरिकांकडे वेळ नाही. महिला सुध्दा नोकरी करु लागल्याने अनेक पदार्थ हे घरी तयार करण्याऐवजी रेडीमेड विकत घेण्याकडे कल वाढलेला आहे. यात लहान मुलांच्या खाऊपासून गव्हाच्या पिठापर्यंत अनेक पदार्थ रेडीमेड व पाकिटबंद स्वरुपात विकत घेतले जातात. नागरिकांची गरज लक्षात घेता पापड, लोणचे, चटणी यासह चिवडा, शेव, पापडी, गाठीया, आलू चिप्स, असे कितीतरी खाद्यपदार्थ आज बाजारात पाकिटबंद स्वरुपात विकायला आलेले आहेत. तसेच विविध शितपेय, लहान मुलांकरिता विविध प्रकारचे चॉकलेट्स व चटकदार पदार्थ सुध्दा जागोजागी दिसतात. या खाद्यपदार्थांची मुदत निघून गेल्यावरही संबंधित विक्रेते आपले स्वत:चे नुकसान टाळण्यासाठी ते ग्राहकांना विकून मोकळे होतात. याबाबत लोकमतच्या चमूने गुरुवारी शहरातील विविध भागात जावून काही खाद्यपदार्थांची खरेदी केली असता या प्रकारात बरेच तथ्य आढळून आले. मुदतबाह्य पदार्थांची विक्री केल्यानंतर सदर बाब लक्षात आणून दिली असता काहींनी पाकिटे बदलून दिली तर काहींनी तारीख निघून गेली तरी काही फरक पडत नाही असे म्हणून चक्क त्यास नकार दिला. असे झाले स्टिंग आॅपरेशन गुरुवार २७ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता स्टिंग आॅपरेशन करण्यासाठी लोकमतची चमू गठीत करण्यात आली. यामध्ये संपादकीय विभागातील सहकाऱ्यांसह वार्ताहर आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे मिळून तीन पथक तयार करण्यात आले. या पथकांनी मेनरोडवरील काही दुकाने, बसस्थानक परिसर, नांदुरा रोड आदी भागात जावून खाद्य पदार्थांची पाहणी व प्रत्यक्ष खरेदी करुन मुदतबाह्य पदार्थ विक्री होत असल्याची खात्री केली. काही हॉटेलांमध्ये सुध्दा कित्येक दिवसाच्या शिळ्या पदार्थांची विक्री केली जात असल्याचे दिसून आले.कमवत्या महिलांचा खरेदीकडे कलमुलांकरिता घरीच काहीतरी पौष्टीक पदार्थ तयार करुन खाऊ घालायला कमवत्या महिलांकडे वेळ नाही. त्यामुळे अशी खरेदी करण्याकडे त्यांचा अधिक कल असतो. परंतु असे खाद्यपदार्थ जास्त काळ सुस्थितीत राहत नाहीत. त्यांची मुदत ( एक्सपायरी डेट) फार कमी असते. बरेचदा ती निघून गेल्यावरही उत्पादक आणि दुकानदार आपले नुकसान टाळण्यासाठी ग्राहकांना विकून मोकळे होतात. यात मुदतीकडे लक्ष न देणाऱ्या ग्राहकांच्या आरोग्यावर त्याचा नकळत विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे तयार खाद्यपदार्थांची खरेदी करताना ग्राहकांनी जागरुक राहण्याची गरज आहे.