शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

आधुनिक युगातही पारंपरिक जात्यावर भरडाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:36 IST

धामणगाव धाड : आधुनिक युगातही तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाच्या वाढत्या वापराने मानवी जीवनशैली बदलत आहे. व्यक्ती आपले श्रम वाचविण्यासाठी विज्ञान ...

धामणगाव धाड : आधुनिक युगातही तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाच्या वाढत्या वापराने मानवी जीवनशैली बदलत आहे. व्यक्ती आपले श्रम वाचविण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करून सोयीसुविधा मिळवत आहे. पूर्वी ग्रामीण भागात पीठ तयार करणे, तसेच डाळ भरडाईसाठी दगडाच्या जात्यांचा वापर केला जायचा. शहरी भागातही ज्येष्ठ महिला त्याचा वापर करीत असत; परंतु कालांतराने शहरी भागातून जाते हद्दपार झाले. मात्र, ग्रामीण भागातील जात्याचा वापर अद्यापही कायम आहे. अद्यापही ज्येष्ठ महिला जात्यावर दळण अथवा भरडाईचे काम करताना दिसून येतात.

संयुक्त कुटुंब पद्धती कुटुंबाच्या विकासास पोषक होती. पहाटेपासूनच प्रत्येक सदस्य आपापली कामे करण्यास सुरुवात करायचा. दळण, कांडण यासह विविध कामे पहाटेपासूनच केली जात. महिला दळण व कांडणाचे काम करीत असत. यासाठी पारंपरिक जाते, उखळ असायचे. जाते जमिनीत अर्धवट गाडलेले असायचे, तर उखळ जमिनीत पूर्णपणे गाडलेले असायचे. जवळपास अर्धा ते एक फूट खोल जमिनीत ते असायचे. कालांतराने कांडण्यासाठी लोखंडी खल बाजारात आले. या खलाचाही मोठ्या प्रमाणावर वापर ग्रामीण भागात होताना दिसून येतो. लग्नसमारंभात मसाल्याचे अथवा अन्य पदार्थ कांडण्यासाठी या साहित्याचा वापर केला जातो.

दहा ते वीस वर्षांपूर्वी अनेक प्रकारचे पारंपरिक साहित्य वापरले जात होते; परंतु गावागावांत इलेक्ट्रॉनिक मिक्सर तसेच पीठगिरण्या, दालमिल यासारखी यंत्रे पोहोचल्याने पारंपरिक जाते व उखळ कालबाह्य झाले. जुन्या पिढीतील महिला आजही जाते, पाटे व उखळाचा वापर करतात; परंतु नव्या पिढीतील महिला पारंपरिक साहित्याचा वापर करीत नाहीत. त्या कमी श्रम व कमी वेळेत अधिक काम करण्यावर भर देतात. काही महिला श्रम वाचविण्यासाठी गिरणीवर पीठ दळतात, तसेच दालमिलवर भरडाई करतात. शहरी भागात तर याला बगलच दिली जाते.

महिला रेडिमेड वस्तू खरेदीवर अधिक भर देतात. असे असले तरी आजही ग्रामीण भागात पारंपरिक साधनांवर दळण व भरडाईचे काम सुरू आहे. शहरातील नव्या पिढीला ही साधने माहीत नाहीत. त्यांना केवळ चित्र दाखवावे लागते; परंतु ग्रामीण भागात लहान मुलांना त्या साधनांविषयी आपसूकच माहिती मिळते. त्यांना याबाबत विशेष शिक्षण घेण्याची गरज नाही. स्वावलंबनाचे तत्त्व स्वीकारून महिला आजही जात्यावर दळण व भरडाईचे काम करीत आहेत. उन्हाळ्यात तर विविध पदार्थ तयार करण्याकरिता जाते, पाटे व उखळ आदी पारंपरिक साधनांचाच वापर केला जातो.

गीतांची मिळत हाेती साथ

महिला पारंपरिक गीते, गवळणी, लोकगीते, हास्यगीते त्याचप्रमाणे पाळणे गाऊन दळण व कांडणकचे काम करीत असत. गीत गायनामुळे महिलांना एक प्रकारची स्फूर्ती मिळायची, तसेच कामाला वेग यायचा. या काळात अजूनही अनेक पारंपरिक साहित्य जतन केले जाते. त्यामध्ये पाटा-वरवंटा, शेर, पायली, कुडव, मुसळाचा समावेश होता.