शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

अर्ध्या पावसाळ्यानंतरही प्रकल्पांमध्ये ३९ टक्केच जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:35 IST

बुलडाणा जिल्ह्यात ३ मोठे, सात मध्यम व ८१ लघू असे मिळून ९१ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता ...

बुलडाणा जिल्ह्यात ३ मोठे, सात मध्यम व ८१ लघू असे मिळून ९१ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता ही ५३३ द.ल.घ.मी. आहे. त्यापैकी वर्तमान स्थितीत प्रकल्पांमध्ये २०६.७० द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. यापैकी प्रत्यक्षात उपयुक्त पाणीसाठा हा १११.७० द.ल.घ.मी. असून त्याची टक्केवारी ही अवघी २१ टक्के आहे. मध्यम प्रकल्प असलेला कोराडी हा एकमेव प्रकल्प १०० टक्के भरलेला आहे. या प्रकल्पातून सध्या ३.०९ क्युसेकने अद्यापही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

- मोठ्या प्रकल्पांमध्ये २३ टक्के जलसाठा

नळगंगा, पेनटाकाळी आणि खडकपूर्णा या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये २३ टक्केच जलसाठा आहे. यापैकी खडकपूर्णा प्रकल्पामध्ये तर अवघा १२.१० टक्के जलसाठा आहे. पैनगंगा नदीचा पूर गेल्यामुळे पेनटाकाळी प्रकल्पात सध्या ३३ टक्के जलसाठा आहे.

- मध्यम प्रकल्पात ६८ टक्के पाणी

जिल्ह्यातील पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा, उतावळी या सात प्रकल्पांमध्ये ६८.४८ टक्के जलसाठा आहे. प्रामुख्याने कोराडी प्रकल्प १०० टक्के भरला आहे. उतावळी प्रकल्पातही ८७ टक्के, तर ज्ञानगंगा प्रकल्पात ७३ टक्के, मन प्रकल्पात ६६ टक्के आणि मस प्रकल्पामध्ये ५१ टक्के जलसाठा आहे.

- लघू प्रकल्पात ६३ द.ल.घ.मी. जलसाठा

जिल्ह्यातील ८१ लघू प्रकल्पांची एकूण साठवण क्षमता १७४.७६ द.ल.घ.मी. आहे. या प्रकल्पांमध्ये अद्याप निम्माही पाणीसाठा नाही. अवघा ६२.८५ द.ल.घ.मी. जलसाठा यामध्ये आहे. त्याची टक्केवारी ही ३६ टक्के आहे. प्रामुख्याने या प्रकल्पांवरूनच ग्रामीण भागातील पाणीपुरवठा होतो. त्यामुळे हे प्रकल्प येत्या काळात भरणे गरजेचे आहे.

- रब्बी सिंचनाचा प्रश्न

पावसाळ्याच्या दोन महिन्यांनंतरही जिल्ह्यातील प्रकल्प अद्यापही ६१ टक्के रिकामे आहेत. जुलै महिन्यातील प्रकल्पांची पाणी पातळी निश्चित मर्यादेत ठेवावी लागत असली तरी, मुळात प्रकल्पात अपेक्षित जलसाठाच झालेला नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील पाणी आरक्षणाचा प्रश्न, अशीच स्थिती येत्या काळात राहिली, तर उद्भवू शकतो. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात पाणी आरक्षणासंदर्भातील बैठक होईल.

- पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली

बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास २०० गावे, ११ पालिका व दोन नगरपंचायतींसाठी दरवर्षी साधारणत: ४० द.ल.घ.मी. पाणी हे पिण्यासाठी आरक्षित केले जाते. प्रकल्पांमध्ये उपयुक्त जलसाठा हा १११.७० द.ल.घ.मी. वर्तमान स्थितीत आहे. त्यामुळे तूर्तास तरी पिण्याच्या पाण्याची चिंता मिटलेली आहे.