शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्या पावसाळ्यानंतरही प्रकल्पांमध्ये ३९ टक्केच जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:35 IST

बुलडाणा जिल्ह्यात ३ मोठे, सात मध्यम व ८१ लघू असे मिळून ९१ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता ...

बुलडाणा जिल्ह्यात ३ मोठे, सात मध्यम व ८१ लघू असे मिळून ९१ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता ही ५३३ द.ल.घ.मी. आहे. त्यापैकी वर्तमान स्थितीत प्रकल्पांमध्ये २०६.७० द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. यापैकी प्रत्यक्षात उपयुक्त पाणीसाठा हा १११.७० द.ल.घ.मी. असून त्याची टक्केवारी ही अवघी २१ टक्के आहे. मध्यम प्रकल्प असलेला कोराडी हा एकमेव प्रकल्प १०० टक्के भरलेला आहे. या प्रकल्पातून सध्या ३.०९ क्युसेकने अद्यापही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

- मोठ्या प्रकल्पांमध्ये २३ टक्के जलसाठा

नळगंगा, पेनटाकाळी आणि खडकपूर्णा या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये २३ टक्केच जलसाठा आहे. यापैकी खडकपूर्णा प्रकल्पामध्ये तर अवघा १२.१० टक्के जलसाठा आहे. पैनगंगा नदीचा पूर गेल्यामुळे पेनटाकाळी प्रकल्पात सध्या ३३ टक्के जलसाठा आहे.

- मध्यम प्रकल्पात ६८ टक्के पाणी

जिल्ह्यातील पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा, उतावळी या सात प्रकल्पांमध्ये ६८.४८ टक्के जलसाठा आहे. प्रामुख्याने कोराडी प्रकल्प १०० टक्के भरला आहे. उतावळी प्रकल्पातही ८७ टक्के, तर ज्ञानगंगा प्रकल्पात ७३ टक्के, मन प्रकल्पात ६६ टक्के आणि मस प्रकल्पामध्ये ५१ टक्के जलसाठा आहे.

- लघू प्रकल्पात ६३ द.ल.घ.मी. जलसाठा

जिल्ह्यातील ८१ लघू प्रकल्पांची एकूण साठवण क्षमता १७४.७६ द.ल.घ.मी. आहे. या प्रकल्पांमध्ये अद्याप निम्माही पाणीसाठा नाही. अवघा ६२.८५ द.ल.घ.मी. जलसाठा यामध्ये आहे. त्याची टक्केवारी ही ३६ टक्के आहे. प्रामुख्याने या प्रकल्पांवरूनच ग्रामीण भागातील पाणीपुरवठा होतो. त्यामुळे हे प्रकल्प येत्या काळात भरणे गरजेचे आहे.

- रब्बी सिंचनाचा प्रश्न

पावसाळ्याच्या दोन महिन्यांनंतरही जिल्ह्यातील प्रकल्प अद्यापही ६१ टक्के रिकामे आहेत. जुलै महिन्यातील प्रकल्पांची पाणी पातळी निश्चित मर्यादेत ठेवावी लागत असली तरी, मुळात प्रकल्पात अपेक्षित जलसाठाच झालेला नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील पाणी आरक्षणाचा प्रश्न, अशीच स्थिती येत्या काळात राहिली, तर उद्भवू शकतो. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात पाणी आरक्षणासंदर्भातील बैठक होईल.

- पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली

बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास २०० गावे, ११ पालिका व दोन नगरपंचायतींसाठी दरवर्षी साधारणत: ४० द.ल.घ.मी. पाणी हे पिण्यासाठी आरक्षित केले जाते. प्रकल्पांमध्ये उपयुक्त जलसाठा हा १११.७० द.ल.घ.मी. वर्तमान स्थितीत आहे. त्यामुळे तूर्तास तरी पिण्याच्या पाण्याची चिंता मिटलेली आहे.