शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

अर्ध्या पावसाळ्यानंतरही प्रकल्पांमध्ये ३९ टक्केच जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:35 IST

बुलडाणा जिल्ह्यात ३ मोठे, सात मध्यम व ८१ लघू असे मिळून ९१ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता ...

बुलडाणा जिल्ह्यात ३ मोठे, सात मध्यम व ८१ लघू असे मिळून ९१ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता ही ५३३ द.ल.घ.मी. आहे. त्यापैकी वर्तमान स्थितीत प्रकल्पांमध्ये २०६.७० द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. यापैकी प्रत्यक्षात उपयुक्त पाणीसाठा हा १११.७० द.ल.घ.मी. असून त्याची टक्केवारी ही अवघी २१ टक्के आहे. मध्यम प्रकल्प असलेला कोराडी हा एकमेव प्रकल्प १०० टक्के भरलेला आहे. या प्रकल्पातून सध्या ३.०९ क्युसेकने अद्यापही पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

- मोठ्या प्रकल्पांमध्ये २३ टक्के जलसाठा

नळगंगा, पेनटाकाळी आणि खडकपूर्णा या तीन मोठ्या प्रकल्पांमध्ये २३ टक्केच जलसाठा आहे. यापैकी खडकपूर्णा प्रकल्पामध्ये तर अवघा १२.१० टक्के जलसाठा आहे. पैनगंगा नदीचा पूर गेल्यामुळे पेनटाकाळी प्रकल्पात सध्या ३३ टक्के जलसाठा आहे.

- मध्यम प्रकल्पात ६८ टक्के पाणी

जिल्ह्यातील पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा, उतावळी या सात प्रकल्पांमध्ये ६८.४८ टक्के जलसाठा आहे. प्रामुख्याने कोराडी प्रकल्प १०० टक्के भरला आहे. उतावळी प्रकल्पातही ८७ टक्के, तर ज्ञानगंगा प्रकल्पात ७३ टक्के, मन प्रकल्पात ६६ टक्के आणि मस प्रकल्पामध्ये ५१ टक्के जलसाठा आहे.

- लघू प्रकल्पात ६३ द.ल.घ.मी. जलसाठा

जिल्ह्यातील ८१ लघू प्रकल्पांची एकूण साठवण क्षमता १७४.७६ द.ल.घ.मी. आहे. या प्रकल्पांमध्ये अद्याप निम्माही पाणीसाठा नाही. अवघा ६२.८५ द.ल.घ.मी. जलसाठा यामध्ये आहे. त्याची टक्केवारी ही ३६ टक्के आहे. प्रामुख्याने या प्रकल्पांवरूनच ग्रामीण भागातील पाणीपुरवठा होतो. त्यामुळे हे प्रकल्प येत्या काळात भरणे गरजेचे आहे.

- रब्बी सिंचनाचा प्रश्न

पावसाळ्याच्या दोन महिन्यांनंतरही जिल्ह्यातील प्रकल्प अद्यापही ६१ टक्के रिकामे आहेत. जुलै महिन्यातील प्रकल्पांची पाणी पातळी निश्चित मर्यादेत ठेवावी लागत असली तरी, मुळात प्रकल्पात अपेक्षित जलसाठाच झालेला नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील पाणी आरक्षणाचा प्रश्न, अशीच स्थिती येत्या काळात राहिली, तर उद्भवू शकतो. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात पाणी आरक्षणासंदर्भातील बैठक होईल.

- पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली

बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास २०० गावे, ११ पालिका व दोन नगरपंचायतींसाठी दरवर्षी साधारणत: ४० द.ल.घ.मी. पाणी हे पिण्यासाठी आरक्षित केले जाते. प्रकल्पांमध्ये उपयुक्त जलसाठा हा १११.७० द.ल.घ.मी. वर्तमान स्थितीत आहे. त्यामुळे तूर्तास तरी पिण्याच्या पाण्याची चिंता मिटलेली आहे.