शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
२३ वर्षांनी अमेरिकन पत्रकाराला मिळाला न्याय; भारतानं पाकिस्तानवर हल्ला करत घेतला बदला
3
सीमेपासून समुद्रापर्यंत... भारताचे नियोजन पाहून पाकिस्तानला भरली धडकी!
4
"शत्रूला त्याची जागा दाखवण्याची वेळ आली...", मधुगंधा कुलकर्णीची देशभक्तीवरील पोस्ट चर्चेत
5
मोठी बातमी! ट्रान्स-हार्बर लोकल ट्रेन सेवा अनिश्चित काळासाठी बंद, तुर्भेजवळ गर्डर पडण्याचा धोका
6
“पाकचा खात्मा करण्यास भारतीय सैन्याला यश मिळो”; गुवाहाटीत कामाख्या देवीला साकडे, विशेष पूजा
7
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची मित्रराष्ट्रांकडे मदतीची याचना, अधिकचं कर्ज मागितलं
8
Stock Market Today: मोठ्या घसरणीसह उघडल्यानंतर शेअर बाजार स्थिरावला, निफ्टीमध्येही २०० अंकांची घसरण
9
IMF Bailout Package to Pakistan : रात्रभर मिसाईल्सनं ठोकलं, आता पाकिस्तानला उपाशी मारण्याची तयारी; ११ हजार कोटींची खैरात मिळणार नाही?
10
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर; अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी
11
Operation Sindoor : राजनाथ सिंह घेणार मोठी बैठक, तिन्ही लष्करप्रमुख आणि सीडीएस राहणार उपस्थित!
12
India-Pakistan Conflict: बलुचिस्तान मुक्त झाला! भारताच्या कारवाईदरम्यान मोठा दावा; दिल्लीत दूतावास उघडण्याची मागणी
13
४१ वर्षीय मराठमोळा अभिनेता करतोय परिक्षेची तयारी, काही दिवसांनी आहेत पेपर, म्हणतो - "मला चांगलं करायचं आहे…"
14
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
15
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
16
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
17
Operation Sindoor: युद्धजन्य स्थिती, अस्वस्थ मनस्थिती; सैनिकांसाठी स्वामींना कळकळीने करा 'ही' प्रार्थना!
18
Mother's Day 2025: आईला द्या ५ स्कीममध्ये गुंतवणूक करुन गिफ्ट; लोकही म्हणतील, मुल असावं तर असं!
19
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्चिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
20
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या

रविवारी खामगावात ‘एल्गार’ सभा

By admin | Updated: July 15, 2017 00:07 IST

शेतकरी आंदोलनाची जोरदार तयारी; उपस्थित राहण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शासनाने शेतकऱ्यांना जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करीत शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने पुन्हा आंदोलन करण्याची जोरदार तयारी सुरु केलेली आहे. यासाठी रविवार, १६ जुलै रोजी खामगावात जिल्हाव्यापी शेतकरी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केले.स्थानिक विश्रामगृहामध्ये आयोजित पत्रपरिषदेत बुलडाणा जिल्हा सुुकाणू समितीचे निमंत्रक दादा रायपुरे, समन्वयक दिनकर दाभाडे, तसेच शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे, कालिदास आपेट, शेकापचे वानखडे, वासुदेवराव उन्हाळे, संतोष मिरगे, भारत कृषक समाजाचे डिगांबर टिकार, योगेश इंगळे, चंद्रकांत नेमाने, शिवाजीराव वानखडे, शेख लुकमान शेठ जितेंद्र चोपडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सरसकट कर्जमाफीबद्दलचा शब्द शासनाने फिरविल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करीत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी किसान क्रांती आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली. यामध्ये शेतकरी हितासाठी ५० संघटनांनी एकत्र येऊन सुकाणू समिती स्थापन केली आहे. या समितीत फूट पाडण्याचा प्रयत्न सरकारने केला; पण तो असफल राहिला. यातील एकाही संघटनेने सरकारच्या निर्णयाचे समर्थन केलेले नाही. सरसकट कर्जमाफीमध्ये शेतजमीन धारणक्षमता व कर्जाची रक्कम विचारात घेतली जाणार नसल्याचे आश्वासन सरकारने दिले होते, ते पाळले नाही. त्यामुळे संपूर्ण कर्जमुक्तीसह स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे या दोन प्रमुख मागण्यांसाठी किसान क्रांती आंदोलन उभारण्यात येणार आहे. याकरिता महाराष्ट्रात १३ ठिकाणी सभा घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यानुसार पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाईल. यामध्ये २३ जुलैला पुण्यात शेवटची सभा होणार असून, यावेळी आंदोलनाचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. नाशिक येथून सुरू झालेल्या या संघर्ष यात्रेत १६ जुलै रोजी खामगावात एल्गार सभा होणार आहे. या सभेस शेतकरी व युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.