शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
4
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
7
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
8
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
9
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
10
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
11
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
12
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
13
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
14
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
15
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
16
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
17
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
18
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
19
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली

रविवारी खामगावात ‘एल्गार’ सभा

By admin | Updated: July 15, 2017 00:07 IST

शेतकरी आंदोलनाची जोरदार तयारी; उपस्थित राहण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शासनाने शेतकऱ्यांना जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करीत शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने पुन्हा आंदोलन करण्याची जोरदार तयारी सुरु केलेली आहे. यासाठी रविवार, १६ जुलै रोजी खामगावात जिल्हाव्यापी शेतकरी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केले.स्थानिक विश्रामगृहामध्ये आयोजित पत्रपरिषदेत बुलडाणा जिल्हा सुुकाणू समितीचे निमंत्रक दादा रायपुरे, समन्वयक दिनकर दाभाडे, तसेच शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे, कालिदास आपेट, शेकापचे वानखडे, वासुदेवराव उन्हाळे, संतोष मिरगे, भारत कृषक समाजाचे डिगांबर टिकार, योगेश इंगळे, चंद्रकांत नेमाने, शिवाजीराव वानखडे, शेख लुकमान शेठ जितेंद्र चोपडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सरसकट कर्जमाफीबद्दलचा शब्द शासनाने फिरविल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करीत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी किसान क्रांती आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली. यामध्ये शेतकरी हितासाठी ५० संघटनांनी एकत्र येऊन सुकाणू समिती स्थापन केली आहे. या समितीत फूट पाडण्याचा प्रयत्न सरकारने केला; पण तो असफल राहिला. यातील एकाही संघटनेने सरकारच्या निर्णयाचे समर्थन केलेले नाही. सरसकट कर्जमाफीमध्ये शेतजमीन धारणक्षमता व कर्जाची रक्कम विचारात घेतली जाणार नसल्याचे आश्वासन सरकारने दिले होते, ते पाळले नाही. त्यामुळे संपूर्ण कर्जमुक्तीसह स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करणे या दोन प्रमुख मागण्यांसाठी किसान क्रांती आंदोलन उभारण्यात येणार आहे. याकरिता महाराष्ट्रात १३ ठिकाणी सभा घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यानुसार पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाईल. यामध्ये २३ जुलैला पुण्यात शेवटची सभा होणार असून, यावेळी आंदोलनाचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. नाशिक येथून सुरू झालेल्या या संघर्ष यात्रेत १६ जुलै रोजी खामगावात एल्गार सभा होणार आहे. या सभेस शेतकरी व युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.