शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

महाविद्यालयांमध्ये स्थापन हाेणार निवडणूक साक्षरता मंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:36 IST

बुलडाणा : भारत निवडणूक आयाेगाच्या मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व निवडणूक सहभाग या कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती ...

बुलडाणा : भारत निवडणूक आयाेगाच्या मतदारांचे पद्धतशीर शिक्षण व निवडणूक सहभाग या कार्यक्रमांतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती व्हावी, लाेकशाही विषयी जागृती निर्माण व्हावी, या हेतून राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळ स्थापन करण्यात येणार आहे़ याविषयीचे शासनादेश २३ जुलै राेजी जारी करण्यात आला आहे़

विद्यापीठाने आणि प्रत्येक महाविद्यालयाने विद्यार्थ्यांशी संपर्क साधून एक निवडणूक साक्षरता मंडळ स्थापन करावे. या मंडळासाठी नाेडल अधिकारी व मार्गदर्शक म्हणून एका शिक्षकाची नियुक्ती करावी. महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी हे सदस्य राहणार आहेत. तसेच प्रत्येक वर्गातील प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांमधून निवडलेली समिती या मंडळाचे कामकाज पाहणार आहे.

आभासी व्याख्यानमालांचे आयाेजन हाेणार

मतदानाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, या हेतूने हे मंडळ स्थापन करण्यात येणार आहे़ सध्या महाविद्यालये बंद असल्याने व्हाॅट्स ॲप, टेलिग्राम ग्रुपवर या मंडळाविषयी माहिती द्यावी़ तसेच आभासी व्याखानमालेचे आयाेजन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, असेही आदेशात म्हटले आहे़

१५ ऑगस्टपर्यंत मुदत

महाविद्यालयांनी येत्या १५ ऑगस्टपर्यंत आपल्या महाविद्यालयात निवडणूक साक्षरता मंडळ स्थापन करावे लागणार आहे़ तसेच महाविद्यालयातील नाेडल अधिकारी आणि विद्यार्थी प्रमुख यांचे माेबाईल क्रमांक आणि ईमेल मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांना ३१ ऑगस्टपर्यंत पाठवावे लागणार आहेत़ मतदान नाेंदणीसाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयांनी प्राेत्साहन द्यावे, निकाल देताना त्यांनी नाेंदणी केली आहे किंवा नाही, याची माहिती घ्यावी लागणार आहे़ तसेच लाेकशाही विषयावर विविध स्पर्धांचे आयाेजनही करावे लागणार आहे़