शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

ई-पॉस मशीन ठरणार डोकेदुखी

By admin | Updated: July 3, 2017 01:16 IST

स्वस्त धान्य दुकानदारांना योग्य प्रशिक्षण मिळाले नाही!

राजू पठाण। लोकमत न्यूज नेटवर्कसुलतानपूर : सार्वजनिक वितरण प्रणालीत पारदर्शकता यावी, या हेतूने शासनाने १ जुलैपासून प्रत्येक स्वस्त धान्य दुकानामध्ये बायो मेट्रिक पद्धतीचा वापर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी तालुक्यातील सर्वच धान्य दुकानदारांना ई-पॉस मशीनचे वाटप केले असले, तरी मशीन देत असताना ९० दुकानदारांना एकाच वेळी केवळ एक तास मशीन हाताळणीचे प्रशिक्षण दिले. हे अल्पावधीचे प्रशिक्षण अनेक दुकानदारांच्या डोक्यावरून गेल्याने, ई-पॉस मशीन त्यांची डोकेदुखी ठरणार असल्याचे दुकानदारांमध्ये बोलल्या जात आहे. मशीन हाताळण्याचे किमान दोन दिवसांचे तरी प्रशिक्षण दिले जावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्राधान्य कुटुंबापैकी १८ वर्षांवरील कोणत्याही सज्ञान सदस्याचा अंगठा टेकविल्यानंतरच धान्य मिळणार असून, अशा लाभार्थी कुटुंबातील व्यक्तीचा आधार क्रमांक जोडण्याची मुदत १५ जून असताना अनेक धान्य दुकानदारांनी टाळाटाळ केल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे अनेक धान्य लाभार्थींची पंचाईत होऊन त्यांच्यावर धान्य लाभापासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे. किंबहुना शासनाकडून दुकानदारांना मिळालेल्या आधार लिंकिंगच्या यादीनुसार काही कुटुंबांची किंवा कुटुंबातील व्यक्तीची नावे वगळली गेली, अशांची सुधारित यादी स्वस्त धान्य दुकानदारांनी संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे २ जानेवारी २०१७ रोजीच दिलेली असताना आजपर्यंतही धान्य दुकानदारांच्या यादीत तशी दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळेसुद्धा अशा लाभार्थींना धान्यापासून वंचित राहण्याची वेळ येऊन त्यांचा धान्य दुकानदारांवर रोष ओढावणार आहे. त्यामुळे सदर याद्या दुरुस्तीचे काम तत्काळ करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. दुकानदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्षशासकीय गोदामातून थेट धान्य दुकानापर्यंत माल पोहचविण्याची जबाबदारी शासनाची असताना तसे केल्या जात नाही. उलट अनेकवेळा गोदामातून दुकानदारांना आॅनस्टँडर्ड माल घेण्यास बाध्य केल्या जाते. तसेच धान्य दुकानदार हा शासन आणि सामान्य जनता यांना जोडणारा दुवा असताना ई-पॉस मशीनसारखा उपक्रम राबविण्यास त्यांच्यावर सक्ती करुन त्यांना मिळणारे धान्य मानधन व त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केले जाते, अशी माहिती अनेक दुकानदारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.