शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

ई- पीक पाहणी ठरत आहे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:35 IST

महाराष्ट्र शासनाने टाटा ट्रस्टच्या सौजन्याने ई-पीक पाहणी हे अड्रॉईड मोबाईल ॲप तयार केले आहे. पीक पेरणी माहिती शेतकऱ्यांना सरकारकडे ...

महाराष्ट्र शासनाने टाटा ट्रस्टच्या सौजन्याने ई-पीक पाहणी हे अड्रॉईड मोबाईल ॲप तयार केले आहे. पीक पेरणी माहिती शेतकऱ्यांना सरकारकडे नोंदविता यावी यासाठी हे ॲप तयार केले आहे. गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन ई -पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड करून नोंदणी करावी लागत आहे. यामध्ये जमिनीचा गट क्रमांक, जमिनीचे एकूण क्षेत्र व पोट खराब याबाबत सर्व माहिती दर्शविलेली असते. तसेच हंगाम निवडीमध्ये खरीप किंवा संपूर्ण वर्ष यापैकी हंगाम निवडणे आवश्यक असते. यासह इतरही माहिती यामध्ये अपलोड करावी लागते. हा प्रकार शेतकऱ्यांसाठी वर-वर सोपा वाटत असला तितका अशिक्षित व अर्धअशिक्षित शेतकऱ्यांसाठी सोपा नसल्याने शेतकऱ्यांसाठी प्रचंड डोकेदुखी ठरत आहेत. आज अनेक शेतकऱ्यांकडे साधे किंवा अड्रॉईड मोबाईल नाही. काहींकडे आहेत त्यांचे रॅम कमी असल्याने ॲप डाऊनलोड होत नाही. काही शेतकऱ्यांना तर त्यांना आलेला कॉल घेणे फार तर कॉल लावणे यापेक्षा जास्त मोबाईलमध्ये समजत नाही. अशा शेतकऱ्यांनी ही ई-पीक पाहणी कसी नोंदवावी हा प्रश्न समोर येत आहे. त्यामुळे या ई-पीक पाहणी कार्यक्रमाला शेतकऱ्यांकडून विरोध होत असून, पूर्वीप्रमाणेच तलाठी यांच्यामार्फत पिकांची नोंद करण्यात यावी, अशी मागणी सुलतानपूरचे उपसरपंच प्रदीप सुरूशे, सदस्य सै. मुख्तार, जाकीर पठाण, भाजप किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मारोतराव सुरुशे, मन्नान पटेल, शे. आशक, संतोष शिंदे यांनी केली़ ग्रामसभेला उपस्थित असलेल्या ग्रामविकास अधिकारी संतोष क्षीरसागर, तलाठी प्रमोद दांदडे, कृषी सहायक देशमुख यांना निवेदन देत ई-पीक पाहणीला विरोध करणारा ठराव मंजूर करण्यात आला.

इंटरनेटचा खोळंबा आणि दोनशे रुपयांना चुना

काही शेतकऱ्यांकडे मोबाईल असतो फक्त बोलण्यापुरताच. त्यामध्ये इंटरनेट नसते. त्यासाठी दीडसे ते दोनसे रुपयांचे बॅलन्स अगोदर टाकावे लागते, तर ही ई-पीक पाहणी करण्यासाठी जमिनीचे लोकेशन महत्त्वाचे असल्याने त्यासाठी त्या शेताच्या गट नंबरमध्ये जाऊनच हे सर्व करावे लागते. यासाठी त्या ठिकाणी नेटवर्क असणे आवश्यक आहे. ते नसल्यावर ॲप ओपन होत नाही. अशा वेळी नेमके करायचे काय? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

शेतकऱ्यांना येणाऱ्या सर्व अडचणींचा आधीच विचार केला गेलेला आहे. ॲपच्या संदर्भातील सर्व माहिती तलाठी, मंडळाधिकारी यांच्यामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे सुरू आहे.

- सैफन नदाफ, तहसीलदार, लोणार.

शेतकऱ्यांकडून ई-पीक पाहणी भरून घेण्याचा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा करणे होय. तसे करायचेच झाल्यास प्रत्येक शेतकऱ्यास चांगल्या दर्जाचा मोबाईल व त्यामध्ये बॅलंस शासनाने द्यावे. शासनाने आपल्या कर्मचाऱ्यांमार्फतच पीक पाहणी करावी.

- दिलीपराव वाघ, जि. प. सदस्य