शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ई- पीक पाहणी ठरत आहे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:35 IST

महाराष्ट्र शासनाने टाटा ट्रस्टच्या सौजन्याने ई-पीक पाहणी हे अड्रॉईड मोबाईल ॲप तयार केले आहे. पीक पेरणी माहिती शेतकऱ्यांना सरकारकडे ...

महाराष्ट्र शासनाने टाटा ट्रस्टच्या सौजन्याने ई-पीक पाहणी हे अड्रॉईड मोबाईल ॲप तयार केले आहे. पीक पेरणी माहिती शेतकऱ्यांना सरकारकडे नोंदविता यावी यासाठी हे ॲप तयार केले आहे. गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन ई -पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड करून नोंदणी करावी लागत आहे. यामध्ये जमिनीचा गट क्रमांक, जमिनीचे एकूण क्षेत्र व पोट खराब याबाबत सर्व माहिती दर्शविलेली असते. तसेच हंगाम निवडीमध्ये खरीप किंवा संपूर्ण वर्ष यापैकी हंगाम निवडणे आवश्यक असते. यासह इतरही माहिती यामध्ये अपलोड करावी लागते. हा प्रकार शेतकऱ्यांसाठी वर-वर सोपा वाटत असला तितका अशिक्षित व अर्धअशिक्षित शेतकऱ्यांसाठी सोपा नसल्याने शेतकऱ्यांसाठी प्रचंड डोकेदुखी ठरत आहेत. आज अनेक शेतकऱ्यांकडे साधे किंवा अड्रॉईड मोबाईल नाही. काहींकडे आहेत त्यांचे रॅम कमी असल्याने ॲप डाऊनलोड होत नाही. काही शेतकऱ्यांना तर त्यांना आलेला कॉल घेणे फार तर कॉल लावणे यापेक्षा जास्त मोबाईलमध्ये समजत नाही. अशा शेतकऱ्यांनी ही ई-पीक पाहणी कसी नोंदवावी हा प्रश्न समोर येत आहे. त्यामुळे या ई-पीक पाहणी कार्यक्रमाला शेतकऱ्यांकडून विरोध होत असून, पूर्वीप्रमाणेच तलाठी यांच्यामार्फत पिकांची नोंद करण्यात यावी, अशी मागणी सुलतानपूरचे उपसरपंच प्रदीप सुरूशे, सदस्य सै. मुख्तार, जाकीर पठाण, भाजप किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मारोतराव सुरुशे, मन्नान पटेल, शे. आशक, संतोष शिंदे यांनी केली़ ग्रामसभेला उपस्थित असलेल्या ग्रामविकास अधिकारी संतोष क्षीरसागर, तलाठी प्रमोद दांदडे, कृषी सहायक देशमुख यांना निवेदन देत ई-पीक पाहणीला विरोध करणारा ठराव मंजूर करण्यात आला.

इंटरनेटचा खोळंबा आणि दोनशे रुपयांना चुना

काही शेतकऱ्यांकडे मोबाईल असतो फक्त बोलण्यापुरताच. त्यामध्ये इंटरनेट नसते. त्यासाठी दीडसे ते दोनसे रुपयांचे बॅलन्स अगोदर टाकावे लागते, तर ही ई-पीक पाहणी करण्यासाठी जमिनीचे लोकेशन महत्त्वाचे असल्याने त्यासाठी त्या शेताच्या गट नंबरमध्ये जाऊनच हे सर्व करावे लागते. यासाठी त्या ठिकाणी नेटवर्क असणे आवश्यक आहे. ते नसल्यावर ॲप ओपन होत नाही. अशा वेळी नेमके करायचे काय? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

शेतकऱ्यांना येणाऱ्या सर्व अडचणींचा आधीच विचार केला गेलेला आहे. ॲपच्या संदर्भातील सर्व माहिती तलाठी, मंडळाधिकारी यांच्यामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे सुरू आहे.

- सैफन नदाफ, तहसीलदार, लोणार.

शेतकऱ्यांकडून ई-पीक पाहणी भरून घेण्याचा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा करणे होय. तसे करायचेच झाल्यास प्रत्येक शेतकऱ्यास चांगल्या दर्जाचा मोबाईल व त्यामध्ये बॅलंस शासनाने द्यावे. शासनाने आपल्या कर्मचाऱ्यांमार्फतच पीक पाहणी करावी.

- दिलीपराव वाघ, जि. प. सदस्य