शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

ई- पीक पाहणी ठरत आहे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:35 IST

महाराष्ट्र शासनाने टाटा ट्रस्टच्या सौजन्याने ई-पीक पाहणी हे अड्रॉईड मोबाईल ॲप तयार केले आहे. पीक पेरणी माहिती शेतकऱ्यांना सरकारकडे ...

महाराष्ट्र शासनाने टाटा ट्रस्टच्या सौजन्याने ई-पीक पाहणी हे अड्रॉईड मोबाईल ॲप तयार केले आहे. पीक पेरणी माहिती शेतकऱ्यांना सरकारकडे नोंदविता यावी यासाठी हे ॲप तयार केले आहे. गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन ई -पीक पाहणी मोबाईल ॲप डाऊनलोड करून नोंदणी करावी लागत आहे. यामध्ये जमिनीचा गट क्रमांक, जमिनीचे एकूण क्षेत्र व पोट खराब याबाबत सर्व माहिती दर्शविलेली असते. तसेच हंगाम निवडीमध्ये खरीप किंवा संपूर्ण वर्ष यापैकी हंगाम निवडणे आवश्यक असते. यासह इतरही माहिती यामध्ये अपलोड करावी लागते. हा प्रकार शेतकऱ्यांसाठी वर-वर सोपा वाटत असला तितका अशिक्षित व अर्धअशिक्षित शेतकऱ्यांसाठी सोपा नसल्याने शेतकऱ्यांसाठी प्रचंड डोकेदुखी ठरत आहेत. आज अनेक शेतकऱ्यांकडे साधे किंवा अड्रॉईड मोबाईल नाही. काहींकडे आहेत त्यांचे रॅम कमी असल्याने ॲप डाऊनलोड होत नाही. काही शेतकऱ्यांना तर त्यांना आलेला कॉल घेणे फार तर कॉल लावणे यापेक्षा जास्त मोबाईलमध्ये समजत नाही. अशा शेतकऱ्यांनी ही ई-पीक पाहणी कसी नोंदवावी हा प्रश्न समोर येत आहे. त्यामुळे या ई-पीक पाहणी कार्यक्रमाला शेतकऱ्यांकडून विरोध होत असून, पूर्वीप्रमाणेच तलाठी यांच्यामार्फत पिकांची नोंद करण्यात यावी, अशी मागणी सुलतानपूरचे उपसरपंच प्रदीप सुरूशे, सदस्य सै. मुख्तार, जाकीर पठाण, भाजप किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष मारोतराव सुरुशे, मन्नान पटेल, शे. आशक, संतोष शिंदे यांनी केली़ ग्रामसभेला उपस्थित असलेल्या ग्रामविकास अधिकारी संतोष क्षीरसागर, तलाठी प्रमोद दांदडे, कृषी सहायक देशमुख यांना निवेदन देत ई-पीक पाहणीला विरोध करणारा ठराव मंजूर करण्यात आला.

इंटरनेटचा खोळंबा आणि दोनशे रुपयांना चुना

काही शेतकऱ्यांकडे मोबाईल असतो फक्त बोलण्यापुरताच. त्यामध्ये इंटरनेट नसते. त्यासाठी दीडसे ते दोनसे रुपयांचे बॅलन्स अगोदर टाकावे लागते, तर ही ई-पीक पाहणी करण्यासाठी जमिनीचे लोकेशन महत्त्वाचे असल्याने त्यासाठी त्या शेताच्या गट नंबरमध्ये जाऊनच हे सर्व करावे लागते. यासाठी त्या ठिकाणी नेटवर्क असणे आवश्यक आहे. ते नसल्यावर ॲप ओपन होत नाही. अशा वेळी नेमके करायचे काय? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

शेतकऱ्यांना येणाऱ्या सर्व अडचणींचा आधीच विचार केला गेलेला आहे. ॲपच्या संदर्भातील सर्व माहिती तलाठी, मंडळाधिकारी यांच्यामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे सुरू आहे.

- सैफन नदाफ, तहसीलदार, लोणार.

शेतकऱ्यांकडून ई-पीक पाहणी भरून घेण्याचा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा करणे होय. तसे करायचेच झाल्यास प्रत्येक शेतकऱ्यास चांगल्या दर्जाचा मोबाईल व त्यामध्ये बॅलंस शासनाने द्यावे. शासनाने आपल्या कर्मचाऱ्यांमार्फतच पीक पाहणी करावी.

- दिलीपराव वाघ, जि. प. सदस्य