शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी पिके सुुकू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:39 IST

आश्विन सानप किनगाव राजा : गेल्या वीस दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे किनगाव राजा परिसरातील पिकांनी उन्ह धरली असून, पावसाअभावी ...

आश्विन सानप

किनगाव राजा : गेल्या वीस दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे किनगाव राजा परिसरातील पिकांनी उन्ह धरली असून, पावसाअभावी पिके सुकू लागली आहेत. कधी पाऊस पडणार, असा प्रश्न या परिसरातील बळीराजांना पडला असून, याकरिता आभाळाकडे आस लावून बसले आहेत.

किनगाव राजा व आजूबाजूला हिवरखेड, विझोरा ,पळसखेड ,पांगरी उगले, शेलगाव राऊत, पिंपळगाव परिसरात यंदा मान्सूनचे आगमन जूनमध्ये न होता तब्बल एक महिना उशिरा जुलैमध्ये झाले होते. तरीही येथील शेतकऱ्यांनी हिमतीने सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, ज्वारीची पेरणी केली. उगवून आलेल्या पिकांच्या वाढीसाठी आपापल्या पद्धतीने स्वतःजवळ असलेल्या ठिबक तसेच तुषार सिंचनाद्वारे विहिरीचे पाणीही दिले होते. दरम्यान, मध्यंतरी १३ जुलै रोजी या भागात दमदार पाऊस पडल्यामुळे पिकांना संजीवनी मिळाली होती. सध्याच्या परिस्थितीत सोयाबीनला शेंगा आल्या आहेत, तर मूग वाधीमध्ये आला आहे. परंतु १६ जुलैपासून पावसाने दडी मारली आहे. सोयाबीन तसेच मुगाच्या शेंगा दाण्याने भरण्यासाठी पावसाची नितांत आवश्यकता आहे. मुबलक प्रमाणात पाऊस पडला नसल्याने विहिरींचेही पाणी आटले आहे. त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांजवळ सध्या कुठलीच व्यवस्था नाही. हातातोंडाशी आलेले पीक पाण्यावाचून गमावले जाण्याची भीती शेतकऱ्यांच्या चेहेऱ्यावर दिसत आहे.

उत्पादन घटण्याची शक्यता

कोरोना महामारीमुळे अगोदरच आर्थिकदृष्ट्या बेजार झालेल्या किनगाव राजा व परिसरातील शेतकऱ्यांना यावर्षी तरी चांगला पाऊस पडून चार पैसे मिळेल अशी आशा होती; परंतु गेल्या वीस दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे चिंता व भीती निर्माण केली आहे. १७ ऑगस्टनंतर पाऊस पडणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पावसाने दांडी मारल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे.

अत्यल्प पावसात हिमतीने सोयाबीनची पेरणी केली. परंतु उगवून न आल्यामुळे दुबार पेरणी केली. सध्या पीक फुलात आहे; परंतु मागील वीस दिवसांपासून पाऊस न पडल्याने पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे.

गजानन मुंढे, शेतकरी

पळसखेड चक्का

सोयाबीन पिकासह भेंडी लावली आहे. महागडी औषधे आणि रासायनिक खते वापरली आहेत. खूप खर्च झाला आहे; परंतु ऐनवेळी पावसाने विश्रांती घेतल्याने शेतातील माल पावसाअभावी सुकू लागला आहे.

रामेश्वर काकड, शेतकरी, किनगाव राजा