शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

अवर्षणाचा रब्बीला फटका!

By admin | Updated: December 6, 2015 02:34 IST

रब्बी हंगामाचे नियोजन कोलमडले, केवळ २७ टक्के क्षेत्रावरच रब्बीचा पेरा.

खामगाव : सातत्यपूर्ण अवर्षणाच्या परिस्थितीमुळे खामगाव तालुक्यातील रब्बी हंगामही यावर्षी धोक्यात आला असून, नियोजित क्षेत्राच्या अवघ्या २७ टक्के क्षेत्रावरच प्रत्यक्ष पेरा झाला आहे. परिणामी, यावर्षी खरिपापाठोपाठ रब्बीच्या उत्पादनातही मोठी घट होण्याची साधार भीती कृषी क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत. खामगाव तालुक्यात १९ हजार ५५0 हेक्टरवर रब्बी पिकांचे नियोजन कृषी विभागाने केले होते; मात्र प्रत्यक्षात पाच डिसेंबरपर्यंत अवघे पाच हजार ३0९ हेक्टरवरच पेरणी झाली आहे, त्यामुळे तालुक्यात रब्बीचे उत्पादनही मोठय़ा प्रमाणावर घटण्याची भीती व्यक्त होत आहे. तालुक्याचा गेल्या तीन ते चार हंगामाचा विचार करता निसर्गाच्या अवकृपेमुळे खरीप व रब्बीचे हंगाम शेतकर्‍याच्या हातून गेले आहेत. परिस्थिती बदलेल, या अपेक्षेत शेतकरी होते; मात्र सलग दोन वर्षे अवर्षणाची स्थिती आल्याने आता तालुक्यातील कृषी क्षेत्रात त्याचे दृष्य परिणाम समोर येत आहेत. नाही म्हणायला खामगाव तालुक्यात मेहकर तालुक्यानंतरचे सर्वाधिक क्षेत्र हे सिंचनाखाली येते. तालुक्यात १२ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे; पण प्रकल्पातील जलसाठय़ात पाण्याची पातळी झपाट्याने घटत असल्याने सिंचनाचीही समस्या निर्माण होत आहे. परिणाम स्वरूप नऊ हजार हेक्टरवर असलेले गहू पिकाचे नियोजन प्रत्यक्षात एक हजार ३४५ हेक्टरपर्यंंतच झाले आहे. हरभराही कसाबसा एक हजार ९७३ हेक्टरवर पोहोचला आहे. हरभर्‍याचेही नियोजन नऊ हजार ५२0 हेक्टरवर करण्यात आले होते; मात्र तेही कमी झाले आहे. हीच परिस्थिती मका, सूर्यफूल, करडई, कांदा व अन्य पिकांसंदर्भात दिसून येत आहे. एकीकडे महागाईचा वाढता डोंगर पाहता अवर्षणाच्या स्थितीमुळे अन्नधान्याचे उत्पादनही जिल्ह्यात कमी होण्याची भीती आहे. त्यामुळे महागाई येत्या काळात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातील ११ महसुली मंडळात हीच स्थिती असून, ५५ हजार ४६0 शेतकरी तालुक्यात असून, एक लाख २0 हजार १७२ हेक्टर जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र असून, त्यापैकी ८३ हजार ६२१ हेक्टर क्षेत्र हे वहितीखाली आहे; पण रब्बीचे नियोजन हे फक्त १९ हजार ५५0 हेक्टवर करण्यात आले होते. त्यापैकी फक्त २७ टक्के क्षेत्रावरच रब्बीचा पेरा झाला आहे.