शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ठिबकवरील पिके ऑक्सीजनवर

By admin | Updated: June 28, 2014 22:40 IST

पावसाअभावी शेतकर्‍यांचे खरीप पिकांचे नियोजन संपूर्ण गडबडले असून, ठिबक वरील पेरण्यासुद्धा ऑक्सीजनवर असल्यामुळे शेतकर्‍यांचे तोंडचे पाणी पळाले आहे.

मोताळा : तालुक्यात मृगनक्षत्र कोरडा गेला असून अपेक्षाकृत पावसाचे आगमन न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. आद्रा नक्षत्रातही पावसाचा रूसवा कायम दिसत असून पेरणी योग्य पावसाअभावी शेतकर्‍यांचे खरीप पिकांचे नियोजन संपूर्ण गडबडले असून, ठिबक वरील पेरण्यासुद्धा ऑक्सीजनवर असल्यामुळे शेतकर्‍यांचे तोंडचे पाणी पळाले आहे.मागील काही वर्षापासूनचा पावसाचा लहरीपणा पाहता धूळ पेरणी जरी तालुकयात झाली नसली तरी मृगाच्या भरवश्यावर जवळपास ८ हजाराच्यावर शेतकर्‍यांनी ठिबक वर कापसाची लागवड केल्याचे समजते. मृगात हमखास पावसाचे आगमन होत असल्याच्या आशेने विहिरीमधील पाण्याच्या भरवश्यावर या भागातील शेतकरी वर्ग ठिबकवर कापासाची लागवड करतो. विहिरीचे पाणी संपेपर्यंत मृगाचा पाऊस येत असल्यामुळे कापासाची पेरणी चांगल्याप्रकारे साधून उत्पादनसुद्धा मोठय़ा प्रमाणात शेतकर्‍यांना मिळत आले आहे. मात्र यावेळेस मृग कोरडा गेल्यामुळे तालुकाभरातील विहिरीची पाण्याची पातळी खोल गेली असून, बर्‍याच विहिरी आटल्यामुळे शेतकर्‍यांना हजार ते पंधराशे रूपयांपर्यंत पाणी विकत घेवून पिक वाचविण्याचा केविलवाणा प्रकार करावा लागत आहे. बहुतांश ठिकाणी पावसाळी वातावरणाअभावी पिकांची वाढ होत नसल्याचे शेतकरी सांगत असल्यामुळे शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. तालुक्यात पावसाचा थेंबच पडला नसल्यामुळे कापसाच्या मुख्य पिकासह इतर पिकांचासुद्धा मौसम गेल्यामुळे शेतकरी येणार्‍या पावसावर शेतीचे नियोजन कसे करावे या चिंतेत शेतकरी पडला आहे. कापसाची लागवडीसाठी जूनचा पहिला आठवडा महत्वपूर्ण असून जेवढया लवकर लागवड होईल तेवढे या पिकासाठी फायदयाचे ठरते. जूूनच्या तीसर्‍या आठवडयापर्यंत केलेली कापसाची लागवड शेतकर्‍यांसाठी फायदयाची असते. कमी कालावधी मध्ये येणार्‍या पिकांसाठीसुद्धा हे वर्ष शेतकर्‍यांसाठी कठीण जात असून पावसाअभावी मुंग, उडीद, मटकी,चवळी आदीं पिकाची लागवड शेतकरी करू शकला नाही. १५ जून ते १५ जुलै या काळात या पिकांची पेरणी होणे आवश्यक असून अल्पकाळामधील हि पिके ६0 ते ७0 दिवसांमध्ये तयार होतात. मात्र या पिकांची पेरणी ३0 जूनच्या आतमध्ये होणे आवश्यक असल्याचे जाणकार सांगतात. मात्र या कालावधीनंतर या पिकांची पेरणी झाल्यास उत्पादन न होता फक्त नासाडी होते. पावसाच्या रूसव्यामुळे शेतकर्‍यांसह जनावरांच्या चारा-पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वत्र कोरडे वातावरण असल्यामुळे जनजीवनसुद्धा प्रभावीत झाले असून ठिबक वरील पिके शेवटच्या घटका मोजत आहेत.