शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

ठिबकवरील पिके ऑक्सीजनवर

By admin | Updated: June 28, 2014 22:40 IST

पावसाअभावी शेतकर्‍यांचे खरीप पिकांचे नियोजन संपूर्ण गडबडले असून, ठिबक वरील पेरण्यासुद्धा ऑक्सीजनवर असल्यामुळे शेतकर्‍यांचे तोंडचे पाणी पळाले आहे.

मोताळा : तालुक्यात मृगनक्षत्र कोरडा गेला असून अपेक्षाकृत पावसाचे आगमन न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. आद्रा नक्षत्रातही पावसाचा रूसवा कायम दिसत असून पेरणी योग्य पावसाअभावी शेतकर्‍यांचे खरीप पिकांचे नियोजन संपूर्ण गडबडले असून, ठिबक वरील पेरण्यासुद्धा ऑक्सीजनवर असल्यामुळे शेतकर्‍यांचे तोंडचे पाणी पळाले आहे.मागील काही वर्षापासूनचा पावसाचा लहरीपणा पाहता धूळ पेरणी जरी तालुकयात झाली नसली तरी मृगाच्या भरवश्यावर जवळपास ८ हजाराच्यावर शेतकर्‍यांनी ठिबक वर कापसाची लागवड केल्याचे समजते. मृगात हमखास पावसाचे आगमन होत असल्याच्या आशेने विहिरीमधील पाण्याच्या भरवश्यावर या भागातील शेतकरी वर्ग ठिबकवर कापासाची लागवड करतो. विहिरीचे पाणी संपेपर्यंत मृगाचा पाऊस येत असल्यामुळे कापासाची पेरणी चांगल्याप्रकारे साधून उत्पादनसुद्धा मोठय़ा प्रमाणात शेतकर्‍यांना मिळत आले आहे. मात्र यावेळेस मृग कोरडा गेल्यामुळे तालुकाभरातील विहिरीची पाण्याची पातळी खोल गेली असून, बर्‍याच विहिरी आटल्यामुळे शेतकर्‍यांना हजार ते पंधराशे रूपयांपर्यंत पाणी विकत घेवून पिक वाचविण्याचा केविलवाणा प्रकार करावा लागत आहे. बहुतांश ठिकाणी पावसाळी वातावरणाअभावी पिकांची वाढ होत नसल्याचे शेतकरी सांगत असल्यामुळे शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. तालुक्यात पावसाचा थेंबच पडला नसल्यामुळे कापसाच्या मुख्य पिकासह इतर पिकांचासुद्धा मौसम गेल्यामुळे शेतकरी येणार्‍या पावसावर शेतीचे नियोजन कसे करावे या चिंतेत शेतकरी पडला आहे. कापसाची लागवडीसाठी जूनचा पहिला आठवडा महत्वपूर्ण असून जेवढया लवकर लागवड होईल तेवढे या पिकासाठी फायदयाचे ठरते. जूूनच्या तीसर्‍या आठवडयापर्यंत केलेली कापसाची लागवड शेतकर्‍यांसाठी फायदयाची असते. कमी कालावधी मध्ये येणार्‍या पिकांसाठीसुद्धा हे वर्ष शेतकर्‍यांसाठी कठीण जात असून पावसाअभावी मुंग, उडीद, मटकी,चवळी आदीं पिकाची लागवड शेतकरी करू शकला नाही. १५ जून ते १५ जुलै या काळात या पिकांची पेरणी होणे आवश्यक असून अल्पकाळामधील हि पिके ६0 ते ७0 दिवसांमध्ये तयार होतात. मात्र या पिकांची पेरणी ३0 जूनच्या आतमध्ये होणे आवश्यक असल्याचे जाणकार सांगतात. मात्र या कालावधीनंतर या पिकांची पेरणी झाल्यास उत्पादन न होता फक्त नासाडी होते. पावसाच्या रूसव्यामुळे शेतकर्‍यांसह जनावरांच्या चारा-पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वत्र कोरडे वातावरण असल्यामुळे जनजीवनसुद्धा प्रभावीत झाले असून ठिबक वरील पिके शेवटच्या घटका मोजत आहेत.